शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

अक्षयतृतीयेपूर्वी हापूस गडगडला, मुंबई बाजार समितीत आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 3:53 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस आंब्याचे भाव अक्षय तृतीयेपूर्वीच गडगडले असून, १०० ते ५०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत आहे

नवी मुंबई/रत्नागिरी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस आंब्याचे भाव अक्षय तृतीयेपूर्वीच गडगडले असून, १०० ते ५०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत आहे. बाजार समितीमध्ये शुक्रवारी १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे यंदा आंब्याचे बाजारभाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल अखेरपर्यंत समाधानकारक आवक होत नव्हती. दोन दिवसांपासून आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी कोकणामधून ७५ हजार ५५५ पेट्या व इतर राज्यांमधून ४१ हजार ५९१ पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी आला. हंगामामध्ये प्रथमच १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात हापूस आंबा २०० ते ८०० रुपये डझन दराने विकला जात होता.

कर्नाटक हापूस ६० ते १०० रुपये किलोने विकला जात होता. त्याचे दरही कमी होऊन ४० ते ६० रुपये किलो झाले आहेत. बदामी ३५ ते ६५ रुपये किलो व लालबाग १५ ते ३५ रुपये किलो दराने विकला जात आहे. देवगड हापूसचा हंगाम पुढील पंधरा दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई बाजार समितीत दर कोसळल्याने कोकणातील बागायतदार निवडक आंबा मुंबईत पाठवित असून, उर्वरित आंबा कॅनिंगसाठी पाठवत आहेत. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे हापूसचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे.या वर्षी लांबलेली थंडी, अवेळी पावसाने वातावरण बदल झाल्याने मोहोर जळून गेला. त्यामुळे हापूस आंब्याला फटका बसला. दर्जेदार आंब्याच्या ७ ते ४ डझनाच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित लहान आकाराचा आंबा किलोप्रमाणे विकला जात आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कॅनिंग सुरू झाले असून, एका किलोला २५ रुपये इतका दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात आंबा कमी असूनही दर फार न वाढल्याने बागायतदार नाराज दिसत आहेत.

मुंबईमध्ये शुक्रवारी कोकण व दक्षिणेकडील राज्यांमधून १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून, ग्राहकांना आंबा खरेदीसाठी हीच चांगली वेळ आहे. - संजय पानसरे, आंबा व्यापारी.

टॅग्स :Mangoआंबा