शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

अक्षयतृतीयेपूर्वी हापूस गडगडला, मुंबई बाजार समितीत आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:26 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस आंब्याचे भाव अक्षय तृतीयेपूर्वीच गडगडले असून, १०० ते ५०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत आहे

नवी मुंबई/रत्नागिरी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस आंब्याचे भाव अक्षय तृतीयेपूर्वीच गडगडले असून, १०० ते ५०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत आहे. बाजार समितीमध्ये शुक्रवारी १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे यंदा आंब्याचे बाजारभाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल अखेरपर्यंत समाधानकारक आवक होत नव्हती. दोन दिवसांपासून आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी कोकणामधून ७५ हजार ५५५ पेट्या व इतर राज्यांमधून ४१ हजार ५९१ पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी आला. हंगामामध्ये प्रथमच १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात हापूस आंबा २०० ते ८०० रुपये डझन दराने विकला जात होता.

कर्नाटक हापूस ६० ते १०० रुपये किलोने विकला जात होता. त्याचे दरही कमी होऊन ४० ते ६० रुपये किलो झाले आहेत. बदामी ३५ ते ६५ रुपये किलो व लालबाग १५ ते ३५ रुपये किलो दराने विकला जात आहे. देवगड हापूसचा हंगाम पुढील पंधरा दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई बाजार समितीत दर कोसळल्याने कोकणातील बागायतदार निवडक आंबा मुंबईत पाठवित असून, उर्वरित आंबा कॅनिंगसाठी पाठवत आहेत. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे हापूसचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे.या वर्षी लांबलेली थंडी, अवेळी पावसाने वातावरण बदल झाल्याने मोहोर जळून गेला. त्यामुळे हापूस आंब्याला फटका बसला. दर्जेदार आंब्याच्या ७ ते ४ डझनाच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित लहान आकाराचा आंबा किलोप्रमाणे विकला जात आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कॅनिंग सुरू झाले असून, एका किलोला २५ रुपये इतका दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात आंबा कमी असूनही दर फार न वाढल्याने बागायतदार नाराज दिसत आहेत.

मुंबईमध्ये शुक्रवारी कोकण व दक्षिणेकडील राज्यांमधून १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून, ग्राहकांना आंबा खरेदीसाठी हीच चांगली वेळ आहे. - संजय पानसरे, आंबा व्यापारी.

टॅग्स :Mangoआंबा