शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बोरिवली येथील पूल बांधण्याच्या खर्चात ३०० टक्क्यांनी वाढ; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकाम खर्चात तब्बल तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकाम खर्चात तब्बल तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कार्यादेश देताना १६१ कोटी रुपये मंजूर केलेला खर्च आता ६५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र स्थायी समितीने या बांधकामासाठी नव्याने निविदा काढून हे काम करुन घेण्याचे निर्देश देत वाढीव खर्चाचा प्रस्ताव बुधवारी फेटाळला.

बोरीवली, कोराकेंद्र येथे आर.एम.भट्टड व स्वामी विवेकानंद मार्ग या जंक्शनवरील कल्पना चावला चौकात नोव्हेंबर २०१८ पासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कालांतराने या पुलाच्या बांधकामात काही बदल करण्यात आले. परंतु, त्यासाठी निविदा न मागवता त्याच ठेकेदाराला पालिकेने काम देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा खर्च १६१ कोटी रुपयांवरुन ६५१ कोटींवर पोहोचला. या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मांडण्यात आला होता.

सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबधित प्रस्ताव फेटाळण्याची उपसुचना मांडली. यास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठींबा दिला. या कामासाठी नव्याने निविदा का काढल्या नाहीत? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तीनशे टक्क्यांचा वाढीव खर्च निविदा न मागता करण्यामागे प्रशासनाची भूमिका काय ? असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. 

प्रस्ताव रद्द...

या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नव्याने निविदा मागवून त्वरित कामाला सुरुवात करा, अशी सुचना भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा असा वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. 

यामुळे वाढला खर्च..

भारतीय मानंक कोडमध्ये नव्या सुधारणा लागू झाल्यामुळे पुलाच्या सुरक्षेसाठी बेअरिंगमध्ये सुधारणा करण्यात आल्या. तसेच, पुलाची लांबी वाढविण्याचेही प्रस्तावित आहे. चर्चेच्यावेळी दरवाढीबाबत कोणतेही धोरण ठरविले नव्हते. आतापर्यंत ६० टक्क्यांपर्यंतच्या दरवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्थायी समितीला सांगितले.

वाहतूक कोंडीची अडचण...

दोन वर्षे या प्रस्तावाचे कागदी घोडे नाचण्यात आले. या कामासाठी नव्याने निविदा मागवाव्या लागणार आहेत. त्यात किमान चार - पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईborivali-acबोरिवली