शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोरिवली येथील पूल बांधण्याच्या खर्चात ३०० टक्क्यांनी वाढ; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकाम खर्चात तब्बल तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकाम खर्चात तब्बल तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कार्यादेश देताना १६१ कोटी रुपये मंजूर केलेला खर्च आता ६५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र स्थायी समितीने या बांधकामासाठी नव्याने निविदा काढून हे काम करुन घेण्याचे निर्देश देत वाढीव खर्चाचा प्रस्ताव बुधवारी फेटाळला.

बोरीवली, कोराकेंद्र येथे आर.एम.भट्टड व स्वामी विवेकानंद मार्ग या जंक्शनवरील कल्पना चावला चौकात नोव्हेंबर २०१८ पासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कालांतराने या पुलाच्या बांधकामात काही बदल करण्यात आले. परंतु, त्यासाठी निविदा न मागवता त्याच ठेकेदाराला पालिकेने काम देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा खर्च १६१ कोटी रुपयांवरुन ६५१ कोटींवर पोहोचला. या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मांडण्यात आला होता.

सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबधित प्रस्ताव फेटाळण्याची उपसुचना मांडली. यास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठींबा दिला. या कामासाठी नव्याने निविदा का काढल्या नाहीत? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तीनशे टक्क्यांचा वाढीव खर्च निविदा न मागता करण्यामागे प्रशासनाची भूमिका काय ? असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. 

प्रस्ताव रद्द...

या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नव्याने निविदा मागवून त्वरित कामाला सुरुवात करा, अशी सुचना भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा असा वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. 

यामुळे वाढला खर्च..

भारतीय मानंक कोडमध्ये नव्या सुधारणा लागू झाल्यामुळे पुलाच्या सुरक्षेसाठी बेअरिंगमध्ये सुधारणा करण्यात आल्या. तसेच, पुलाची लांबी वाढविण्याचेही प्रस्तावित आहे. चर्चेच्यावेळी दरवाढीबाबत कोणतेही धोरण ठरविले नव्हते. आतापर्यंत ६० टक्क्यांपर्यंतच्या दरवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्थायी समितीला सांगितले.

वाहतूक कोंडीची अडचण...

दोन वर्षे या प्रस्तावाचे कागदी घोडे नाचण्यात आले. या कामासाठी नव्याने निविदा मागवाव्या लागणार आहेत. त्यात किमान चार - पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईborivali-acबोरिवली