शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ने मोटर वाहन कायदा बसविला धाब्यावर

By admin | Updated: September 2, 2016 18:06 IST

काटकसरीचे धोरण राबविताना ‘एसटी’ महामंडळाने कायदा धाब्यावर बसविला आहे. वाहकांशिवाय बसेस मार्गावर धावत आहे

- विलास गावंडे / ऑनलाइन लोकमत
विनावाहक फे-या : काटकसरीच्या धोरणात प्रवाशांची गैरसोय 
यवतमाळ, दि. 2 - काटकसरीचे धोरण राबविताना ‘एसटी’ महामंडळाने कायदा धाब्यावर बसविला आहे. वाहकांशिवाय बसेस मार्गावर धावत आहे. या धोरणात प्रवाशांचीही गैरसोय होत आहे, रोजगार निर्मितीच्या संकल्पनेलाही मूठमाती दिली जात आहे. हा सर्व प्रकार ‘एसटी’ची खासगीकरणाकडे वाटचाल तर नसावी, या शंकेला जन्म देणारी ठरत आहे. तसा एसटी कामगारांचाही सूर आहे. 
 
प्रवासी वाहतुकीसाठी तज्ज्ञ चालक आणि वाहकांची अनिवार्यता मोटर वाहन कायद्यात नमूद करण्यात आली आहे. एसटी आणि खासगी वाहतुकीलाही हा नियम लागू आहे. खासगी वाहनांमध्ये तज्ज्ञ वाहकच राहात नाही. एसटी महामंडळाने तर वाहकाला बाद केले आहे. साधारणत: १५० किलोमीटरपर्यंतच्या फेरीसाठी विनावाहक बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. विदर्भात ७० ते ८० बसेस वाहकांशिवाय धावतात. 
 
अश्वमेघ, शिवनेरी या बसेसचे लोण लाल डबा, हिरकणीपर्यंत पोहोचले आहेत. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी विभागांनी ही कास धरली आहे. विनावाहक बसेसमधून पैशाची बचत होत आहे काय, प्रवासी वाढून उत्पन्नात उन्नती होत आहे काय, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय नक्कीच सुरू आहे. बसमध्ये वाहक नसल्याने ब्रेकडाऊनमध्ये किंवा अपघातप्रसंगी चालकाला कुणाचाही आधार नसतो. एकाकी पडलेल्या चालकाला प्रवाशांची मदत घ्यावी लागते. 
 
विनावाहक वाहतुकीमुळे थांबे कमी झाले आहेत. तालुका बसस्थानकावरही या बसेस थांबत नाही. बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने, प्रवासी एसटीपासून दूर जात आहे. महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाने खासगी वाहतुकदारांना प्रोत्साहन देऊन भविष्यात महामंडळाचे खासगीकरण तर करणार नाही ना, अशी शंका कामगारांमधून उपस्थित केली जात आहे. शिवाय महामंडळाच्या रोजगार निर्मितीच्या संकल्पनेलाही ठेच पोहोचत आहे. विनावाहक बस धावत असल्याने आपसुकच वाहकांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे या पदासाठीची भरतीही अपवादानेच होणार आहे. 
 
विनावाहक बस ही महामंडळाची कृती मोटर वाहन कायद्याचा भंग करणारी आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिलेल्या प्रवासी वाहतुकीच्या परमीटमध्ये नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन करणारी आहे. शिवाय महामंडळाच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे कुठलीही बस विनावाहक धावू नये, अशी अपेक्षा आहे. 
- एम.आर. बैस, विभागीय कार्याध्यक्ष, राज्य परिवहन चालक, वाहक, यांत्रिक कामगार मित्र संघटना, यवतमाळ