शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

चालकांपुढे एसटी महामंडळ हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:16 IST

एसटी महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवशाहीच्या वाढत्या तक्रारी’ सध्या राज्यातील प्रवाशांच्या चर्चेचा विषय आहे. कंत्राटी शिवशाहीवरील चालक हा कंत्राटदाराचा असून

महेश चेमटेमुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवशाहीच्या वाढत्या तक्रारी’ सध्या राज्यातील प्रवाशांच्या चर्चेचा विषय आहे. कंत्राटी शिवशाहीवरील चालक हा कंत्राटदाराचा असून, वाहक महामंडळाचा आहे. ‘खासगी’ चालकांकडून बेदरकारपणे आणि दारू पिऊन बस चालवण्याचा प्रकार घडतात. अशा चालकवर्गाच्या प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर महामंडळाला थेट कारवाई करण्याचे अधिकार नाही. यामुळे महामंडळाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते. परिणामी, महामंडळ कंत्राटदाराच्या चालकांसमोर हतबल झाले असल्याचे चित्र आहे.राज्यातील शिवशाहीचालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे अनेक प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणले आहेत. औरंगाबाद-चंद्रपूर शिवशाहीचा चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले, यावर महामंडळाने चालकाला ५० हजारांचा दंड आकारला. खासगी कंपनीने संबंधित चालकाला अन्य आगारात नियुक्त केले. तसेच ठाणे-दापोली शिवशाहीच्या मद्यधुंद चालकाला प्रवाशांनी हाकलवून लावले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेतत्त्वावरील खासगी वातानुकूलित शिवशाही राज्यभर धावत आहेत. कंत्राटी शिवशाही बसमध्ये चालक हा कंत्राटदारांचा असून, वाहक हा महामंडळाचा आहे. यामुळे चालकांच्या अरेरावीपुढे महामंडळ हतबल झाले आहे.पुणे-नाशिक, औरंगाबाद-चांदूर, सावंतवाडी-पुणे, लातूर-औरंगाबाद, पुणे-अंबेजोगाई (टायर फुटून), नांदेड-लोहा शिवशाही थेट बसस्थानकावरील फलाटावर चढवल्यामुळे शिवशाहीला नुकसान, कोल्हापूर-स्वारगेट शिवशाही अपघातानंतर चालक बस घेऊन फरार, अशा प्रकारे राज्यातील बहुतांशी मार्गावरील शिवशाही काही महिन्यांच्या काळातच अपघातग्रस्त झाल्या आहेत.मुख्यालयात माहिती उपलब्ध नाहीशिवशाहीबाबत तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मुभा आगार व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारीनुसार आगार व्यवस्थापक कारवाई करत आहेत. कारवाईबाबत करारात योग्य तरतूद आहे. खासगी चालकाबाबत तक्रार आल्यास संबंधित चालकाला आगारातून काढण्याची कारवाई करण्यात येते. आगारातून कारवाई होत असल्यामुळे मुख्यालयाकडे केलेल्या कारवाईची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, शिवशाहीप्रवासी ‘अ’सुरक्षिततेसाठी!प्रवासी तक्रारीनुसार महामंडळ संबंधित कंत्राटदाराला केवळ नोटीस बजावते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर, संबंधित चालकांची बदली या आगारातून त्या आगारात केली जाते. यामुळे महामंडळाच्या ‘प्रवासी सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याला धक्का लागल्याचे महामंडळातील ‘जुने-जाणते’ अधिकारी खासगीत मान्य करतात.