शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हक्काच्या जागेवर एसआरए प्रकल्पाचा डल्ला

By admin | Updated: June 25, 2015 02:17 IST

पोलिसांची हक्काची जागा बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवणाऱ्या विकासकाने जमिनीचा इवलासा तुकडा देऊन पोलीस खात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेतर्फे

डिप्पी वांकाणी, मुंबईपोलिसांची हक्काची जागा बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवणाऱ्या विकासकाने जमिनीचा इवलासा तुकडा देऊन पोलीस खात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मुंबईतील ताडदेव भागातील ‘एसआरए’च्या संबंधित प्रकल्पात सरकारचे किती नुकसान झाले हे शोधण्यासाठी चौकशीची मागणी करणाऱ्या या पत्रावर पोलीस गृहनिर्माणचे महासंचालक अरूप पटनाईक यांची स्वाक्षरी आहे. नऊ मे रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्राची एक प्रत लोकमतला उपलब्ध झाली आहे. शापूरजी पालनजी व धर्मेश ठाकर यांचे संयुक्त प्रतिष्ठान (एसडी कॉर्पोरेशन) ताडदेव प्रकल्पाचे विकासक आहेत. याच जागेवर इम्पेरिअर टॉवर्स उभे राहिले आहेत. सरकारने झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी मंजूर केलेल्या ४२ हजार ६०० चौरस मीटर जागेचा ताबा एस डी कॉर्पोरेशनने स्वत:कडे ठेवला असल्याचे या पत्रातील मजकुरावरून दिसते. या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतर त्यातील ९,५०० चौरस मीटर एवढी जागा मुंबई पोलिसांना द्यावयाची होती. मात्र,विकसकांनी तसे केले नाही. या पत्रात म्हटले आहे की, ताडदेव येथील भूमापन क्रमांक ७२५ मधील जागा मुंबई पोलिसांच्या मालकीची आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८७ हजार ३१९ चौरस मीटर असून त्यातील ४२ हजार ६०० चौरस मीटर जागेवर झोपडपट्टीवासियांचे अतिक्रमण झाले होते. १९८९ मध्ये महसूल विभागाने एम पी मील म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या जागेच्या पुनर्विकासाचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमित जागेपैकी ३३,१०० चौरस मीटर जागा पुनर्वसनासाठी वापरल्यानंतर उर्वरित ९५०० चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त करून ती जमीन मालक अर्थात मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करावयाची होती. पण मंजूर करण्यात आलेली ४२ हजार ६०० चौरस मीटर जागा आपल्याच ताब्यात ठेवून तेथे दोन टोलेजंग इमारती उभ्या करणाऱ्या विकसकाने एकही खुला भूखंड पोलीस विभागाला दिला नाही.अतिक्रमण, पोलिस गृहनिर्माणसाठी राखीव असलेला भूखंड हस्तांतरित न करणे आणि ठरल्यापेक्षा कमी जागा किंवा बांधीव जागा पोलिस विभागाला देणे यामुळे सरकारचे काही नुकसान झाले किंवा काय हे हुडकून काढण्यासाठी आर्थिक गुन्हे विभागामार्फत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे या पत्रातील सातव्या मुद्यात म्हटले आहे. महसूल विभागाने ९५०० चौरस मीटर क्षेत्र पोलिसांना हस्तांतरित केले जावे, असे सांगितले होते. मात्र, २००५ मधील इरादापत्रात महसूल विभागाच्या आदेशावरून ९,१०० चौरस मीटर जागेच्या बदल्यात ३०२५.७५ चौरस मीटर बांधीव क्षेत्र पोलिसांना देण्यात यावे, असे निर्देश एसआरएला देण्यात आले. हा बदल गृहनिर्माण विभागासाठी धक्का ठरला. ९५०० चौरस मीटरचे ९१०० चौरस मीटर कसे झाले आणि ४०० चौरस मीटर जागा कुठे गडप झाली हे स्पष्ट झाले नाही. प्रत्यक्षात ९५०० चौरस मीटर जागेऐवजी मुंबई पोलिसांना केवळ २५ टक्के जागा मिळाली. ‘मी सरकारला सर्व संबंधितांची याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली आहे. माझ्यासाठी पोलिस गृहनिर्माण हा अत्यंत जिव्हाळ््याचा विषय आहे. त्यांना संपूर्ण ९५०० चौरस मीटर क्षेत्र मिळायलाच हवे. हे क्षेत्र प्र्राधान्याने ताडदेवमध्ये असावे मात्र तेथे जागा उपलब्ध नसेल तर वडाळा किंवा अन्य ठिकाणचे पर्याय आम्ही सुचवू शकतो आणि विकसकाने तेव्हढी जागा बांधून द्यायला हवी. त्याने नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाईल, असे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांनी सांगितले. हा अत्यंत जुना विषय असून तेव्हा एसआरए नव्हते. तेव्हा हा निर्णय झाल्यानंतर जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आली. हे खरे आहे की, ९५०० चौरस मीटर खुली जागा पोलिसांना हस्तांतरित करण्यात यायला हवी होती. मात्र, दरम्यानच्या काळात सरकारने मंजूर केलेल्या नियमांमुळे ही जागा घटून केवळ २५ टक्के झाली. विकसक एस. डी. कॉर्पोरेशनने काहीही चूक केलेली नाही. हे प्रतिष्ठान सरकारकडून मिळालेल्या परवानगीनुसारच काम करत आहे, असेही ते म्हणाले. एसआरएचे सचिव एस. एस. भिसे म्हणाले की, हे सरकारने १९९५ मध्ये मंजूर केलेल्या नियमानुसारच आहे. १ जानेवारी १९९५ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशात १९९५ पूर्वीच्या झोपडपट्टीधारकांना संरक्षण देऊन त्यांचे त्याच जागेवर पुनर्वसन करावे, असे म्हटले होते. या प्रक्रियेचा भाग म्हणून जमिन मालकाला केवळ २५ टक्केच जागा द्यायची होती. त्यामुळे मुंबई पोलिसांना ३०२५ चौरस मीटर जागा मंजूर करण्यात आली, असे भिसे म्हणाले. पोलिसांमुळेच विलंब होत आहे. ते गेल्या तीन ते चार वर्षांपासून नकाशांना मंजूरी देत नाहीत. याबाबत पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.