शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

कोल्हापुरातील एकमेव कसोटीपटू एस.आर.पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 15:30 IST

ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय ८७, रा. रूईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसिद्धी दिली होती.

ठळक मुद्दे कोल्हापुरातील एकमेव कसोटीपटू एस.आर.पाटील यांचे निधन इंग्लंडमधील क्‍लबकडून तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार

कोल्हापूर- ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय ८७, रा. रूईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसिद्धी दिली होती.

पाटील मूळचे कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील रहिवासी. त्यांचा १० ऑक्‍टोबर १९३३ ला जन्म झाला. वडील रावजी पाटील यांना मुलाने क्रिकेटमध्ये कोल्हापूरचे नाव उचंवावे, अशी इच्छा होती. पाटील यांनी वडिलांच्या इच्छेसाठी क्रिकेटचा कसून सराव केला. त्यांचे न्यू हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाले. ते इंग्लंडमधील लंकेशायर, नॉर्थस्टॅण्पोर्डशायर व नॅन्टविच क्‍लबकडून खेळले.

क्‍लबकडून खेळताना त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीची आकडेवारी थक्क करणारी ठरली. इंग्लंडमधील माध्यमांनी त्याची दखल घेत त्याला प्रसिद्धी दिली. इंग्लंडमध्ये त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. तसेच उत्कृष्ट व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली.न्यूझीलंडविरूद्धच्या एकमेव कसोटीत त्यांची निवड झाली होती. कर्णधार पॉली उम्रीगर यांच्या नेतृत्त्वाखाली ही कसोटी भारतीय संघाने जिंकली.सदाशिव रावजी पाटील यांनी एकमेव कसोटीत बावीसाव्या वर्षी १९५५ मधे झालेल्या न्यूझीलंडविरूध्दच्या दुसऱ्या मुंबईतील ब्रेबाँर्नवर कसोटीत पदार्पण केले. या कसोटीत त्यानी नाबाद १४ धावा केल्या तर दोन्ही डावात जाँन रीडला बाद केले होते.

पहिल्या डावात १४-३-३६-१ व दुसऱ्या डावात ९-४-१५-१ अशी गोलंदाजी केली. दुदैवाने त्याना परत कसोटीत संधी मिळाली नाही. प्रथम श्रेणीच्या सामन्यातही त्यांनी अष्टपैलू खेळ केला. ते १९५२ ते १९६४ दरम्यान महाराष्ट्र संघाकडून खेळले. त्यात त्यांनी ३६ सामन्यात तीन अर्धशतकांसह ८६६ धावा केल्या. गोलंदाजीत ३०.६६ च्या सरासरीने ८३ गडी बाद करत वेगळा ठसा उमटवला. प्रथम श्रेणीत ३८ धावांत पाच गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

एस आर पाटील हे जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये ३६ वर्षे कार्यरत होते. जे. आर. डी. टाटा यांचा त्यांच्या गोलंदाजीवर जबरदस्त आत्मविश्‍वास होता. त्यांना श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांचे प्रोत्साहन, तर जतचे राजे डफळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. क्रिकेट वर्तुळात डी. आर पाटील, एम. आर. पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांचे हे बंधू होत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर