शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

‘शाहू विचारांचा प्रसार हेच मिशन’

By admin | Updated: December 30, 2016 01:52 IST

महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शाहूचरित्र जगभरात पोहोचावे, यासाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ. जयसिंगराव पवार हे शुक्रवारी अमृतमहोत्सवी वर्षात

कोल्हापूर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शाहूचरित्र जगभरात पोहोचावे, यासाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ. जयसिंगराव पवार हे शुक्रवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत शाहू विचारांचा जगभर प्रसार हेच मिशन म्हणून काम करत राहणार, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझा जन्म जरी सांगली जिल्ह्यात झाला असला, तरी कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. जुन्या अकरावीनंतर मी कोल्हापुरात आलो. राजाराम महाविद्यालयात शिकत होतो. माझे शिक्षण झाले ते कर्मवीर अण्णा पाटील, माझे वडील आणि शाहू महाराजांमुळे. त्यांनी जर आमच्यासारख्या मुलांसाठी वसतिगृहे काढली नसती, तर आम्हाला शिकायला मिळाले नसते. त्यामुळे मी या सर्वांचे ॠण मानतो. व्ही. टी. पाटील यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला ठेवली होती. पत्नी वसुधा यांच्या आग्रहामुळे मी तिथे गेलो, तर पुरंदरेंनी तुमच्याच कोल्हापुरात एक तरुण इतिहास संशोधक चांगले काम करतोय, अशी माझी ओळख करून दिली, तेव्हा मी प्रेक्षकात होतो आणि तिसऱ्या दिवशी व्ही. टी. पाटील यांनी मला व्यासपीठावर बोलावून घेतले आणि महाराणी ताराराणी यांच्यावर पुस्तक लिहिण्याची सूचना केली व पुरंदरे यांच्याच हस्ते १९७५ साली पुस्तकाचे प्रकाशन झाले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.(प्रतिनिधी)आत्मचरित्र लिहिणारआजपर्यंत शाहू चरित्र ग्रंथाच्या १५ हजार प्रती संपल्या. देशी-विदेशी भाषांमध्ये शाहू चरित्र गेले. गुजराती, सिंधी आता तयार आहे. शाहू चरित्राची तिसरी आवृत्ती, ताराराणी यांच्या सुधारित चरित्राचे प्रकाशन केले जाणार आहे. शिवाजी महाराजांवर विश्लेषणात्मक पद्धतीने ग्रंथ लिहिणार आहे, तसा ‘शब्द’ मी गोविंद पानसरे यांना दिला होता. आत्मचरित्रही लिहायचे आहे. त्याही कामाला आता सुरुवात करणार आहे.