शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त मतदान

By admin | Updated: February 22, 2017 04:44 IST

राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात

मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेना, हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने यावेळी उमेदवारांची संख्याही वाढली. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. तसेच, निवडणूक आयोग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जागृतीमुळे यावेळी मतदार घराबाहेर पडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने निवडणुकीचा पारा चढला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३,२१० जागांसाठी १७,३३१ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेकांची नावे गायब होती. शिवाय, मतदान केंद्र शोधण्यासाठीही बरीच धावपळ करावी लागली. यावेळी मुंबई वगळता अन्यत्र, महापालिका निवडणूक प्रभागानुसार असल्याने प्रारंभी मतदारांचा गोंधळ उडाला. (प्रतिनिधी)भाजपाचे उमेदवार पोलिसांच्या ताब्यातसोलापूर : सोलापूर महापालिका मतदानावेळी भाजपा उमेदवाराची पोलिसांशी झालेली बाचाबाची आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेली ६३ हजाराची रोकड वगळता शांततेत मतदान झाले.प्रभाग २५ मध्ये भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर एआयएमआयएमचे उमेदवार तौफिक शेख हे फरार असल्याने त्यांनी मतदान केले नाहे. माजी उपमहापौर हारुण सय्यद हे दोन दिवसापूर्वी झालेल्या मारामारी प्रकरणी पोलीस कोठडीत असले तरी न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.तिघांचा मृत्यूरत्नागिरी/सातारा : साताऱ्याजवळील नायगाव (ता.खंडाळा) येथील केंद्रावर मतदानासाठी आलेल्या ठकूबाई एकनाथ नेवसे (वय ८३) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रत्नागिरी जिल्ह्यात सुकिवली (ता.खेड) येथे महादेव शिवराम चाळके (वय ६४) यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी मुंबईहून खेडकडे येताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराने मृत्यूसोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील मानकरी गंगाधर शटे (वय७५ ) हे मतदानासाठी आले असता मतदान केंद्राच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.