शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त मतदान

By admin | Updated: February 22, 2017 04:44 IST

राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात

मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेना, हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने यावेळी उमेदवारांची संख्याही वाढली. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. तसेच, निवडणूक आयोग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जागृतीमुळे यावेळी मतदार घराबाहेर पडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने निवडणुकीचा पारा चढला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३,२१० जागांसाठी १७,३३१ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेकांची नावे गायब होती. शिवाय, मतदान केंद्र शोधण्यासाठीही बरीच धावपळ करावी लागली. यावेळी मुंबई वगळता अन्यत्र, महापालिका निवडणूक प्रभागानुसार असल्याने प्रारंभी मतदारांचा गोंधळ उडाला. (प्रतिनिधी)भाजपाचे उमेदवार पोलिसांच्या ताब्यातसोलापूर : सोलापूर महापालिका मतदानावेळी भाजपा उमेदवाराची पोलिसांशी झालेली बाचाबाची आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेली ६३ हजाराची रोकड वगळता शांततेत मतदान झाले.प्रभाग २५ मध्ये भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर एआयएमआयएमचे उमेदवार तौफिक शेख हे फरार असल्याने त्यांनी मतदान केले नाहे. माजी उपमहापौर हारुण सय्यद हे दोन दिवसापूर्वी झालेल्या मारामारी प्रकरणी पोलीस कोठडीत असले तरी न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.तिघांचा मृत्यूरत्नागिरी/सातारा : साताऱ्याजवळील नायगाव (ता.खंडाळा) येथील केंद्रावर मतदानासाठी आलेल्या ठकूबाई एकनाथ नेवसे (वय ८३) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रत्नागिरी जिल्ह्यात सुकिवली (ता.खेड) येथे महादेव शिवराम चाळके (वय ६४) यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी मुंबईहून खेडकडे येताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराने मृत्यूसोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील मानकरी गंगाधर शटे (वय७५ ) हे मतदानासाठी आले असता मतदान केंद्राच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.