शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त मतदान

By admin | Updated: February 22, 2017 04:44 IST

राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात

मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेना, हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने यावेळी उमेदवारांची संख्याही वाढली. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. तसेच, निवडणूक आयोग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जागृतीमुळे यावेळी मतदार घराबाहेर पडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने निवडणुकीचा पारा चढला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३,२१० जागांसाठी १७,३३१ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेकांची नावे गायब होती. शिवाय, मतदान केंद्र शोधण्यासाठीही बरीच धावपळ करावी लागली. यावेळी मुंबई वगळता अन्यत्र, महापालिका निवडणूक प्रभागानुसार असल्याने प्रारंभी मतदारांचा गोंधळ उडाला. (प्रतिनिधी)भाजपाचे उमेदवार पोलिसांच्या ताब्यातसोलापूर : सोलापूर महापालिका मतदानावेळी भाजपा उमेदवाराची पोलिसांशी झालेली बाचाबाची आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेली ६३ हजाराची रोकड वगळता शांततेत मतदान झाले.प्रभाग २५ मध्ये भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर एआयएमआयएमचे उमेदवार तौफिक शेख हे फरार असल्याने त्यांनी मतदान केले नाहे. माजी उपमहापौर हारुण सय्यद हे दोन दिवसापूर्वी झालेल्या मारामारी प्रकरणी पोलीस कोठडीत असले तरी न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.तिघांचा मृत्यूरत्नागिरी/सातारा : साताऱ्याजवळील नायगाव (ता.खंडाळा) येथील केंद्रावर मतदानासाठी आलेल्या ठकूबाई एकनाथ नेवसे (वय ८३) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रत्नागिरी जिल्ह्यात सुकिवली (ता.खेड) येथे महादेव शिवराम चाळके (वय ६४) यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी मुंबईहून खेडकडे येताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराने मृत्यूसोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील मानकरी गंगाधर शटे (वय७५ ) हे मतदानासाठी आले असता मतदान केंद्राच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.