शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

जिल्ह्यात बाप्पांना भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 2, 2014 23:14 IST

ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 52 हजार 795 बाप्पांना विधिवत व ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून भर पावसात निरोप देण्यात आला.

ठाणो : पाच दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर मंगळवारी ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या  ग्रामीण भागात सुमारे 52 हजार 795 बाप्पांना विधिवत व ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून भर पावसात निरोप देण्यात आला. यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ठाण्यासह, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका सुध्दा यासाठी सज्ज होती.  अनेक ठिकाणी अनुचित घटना टिपण्यासाठी सीसी टिव्ही कॅमेरेही लावण्यात आले होत़े तर पाऊस असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता़
ठाणो पोलीस आयुक्तालायासह, ठाणो शहरात मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना जल्लोषात निरोप देण्यात आला. ठाणो महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांसह विसजर्न घाटावर खाजगी सुरक्षा रक्षकांसह, महापालिकेचे कर्मचारी तैनात होते. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमे:यांचा वॉच ठेवण्यात आला होता. 
सायंकाळी चार वाजल्यापासून येथे गणराला ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलाल उधळीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा नारा देऊन गणरायाला विधिवत निरोप देण्यात आला. पालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसजर्न महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटय़ा गणोश मूर्तीबरोबरच पाच फुट आणि त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या गणोश मुर्तीचे विसजर्न करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय रायलादेवी येथे दोन कृत्रीम तलावांची, तर उपवन निळकंठ वुड्स - टिकुजिनीवाडी, बाळकुम - रेवाळे तलाव, खारेगांव येथेही कृत्रीम तलावांची निर्मिती करुन त्याठिकाणी पालिकेने कर्मचा:यांसह खाजगी संस्थांच्या मदतनीस तैनात ठेवले होते. तसेच विसजर्न घाट अथवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्रींच्या मूर्तीचे विसजर्न करता येणो शक्य नाही. त्यांच्यासाठी पालिकेने मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदिर, चिंरजीवी हॉस्पीटल, पोखरण रोड नं.2, वागळे इस्टेट रोड नं.16, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्रींच्या मुर्ती स्वीकार केंद्रे उभारली होती. 
दरम्यान ठाणो पोलीस आयुक्तालयातील ठाणो परिमंडळात सुमारे सार्वजनिक 11, खाजगी 5841, भिवंडी सार्वजनिक 19, खाजगी 3495, कल्याण सार्वजनिक 48, खाजगी 9275, उल्हासनगर सार्वजनिक 18, खाजगी 7क्65 आणि वागळे परिमंडळात सार्वजनिक 28, खाजगी 7523 बाप्पांना निरोप देण्यात आला.  (प्रतिनिधी)
 
4मीरा-भाईंदर शहरातील पाच दिवसांच्या सुमारे साडेपाच हजार गणोशमूर्तीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. त्यात सुमारे साडेचार हजार घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या सुमारे 1 हजार गणोश मूर्तीचा समावेश होता. मागील दीड व दोन दिवसांच्या गणोश मूर्तीच्या विसर्जनावेळी सुरुवात झालेल्या पावसाचे आगमन पाचव्या दिवशीही झाल्याने विसर्जनावर विरजण आले होते. परंतु, आपल्या लाडक्या गणोशाला निरोप देताना पावसाची तमा न बाळगता भक्तांनी वाजत-गाजत गणरायाला भक्तीभावाने निरोप दिला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी विसर्जन घाटासह विसर्जनाच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 
 
7 हजार गणपतीना निरोप
उल्हासनगर परिमंडळात पाच दिवसाच्या 7 हजार 84  घरगुती तर सार्वजनिक मंडळाच्या 18  गणपती बाप्पान्ां भावपूर्ण निरोप देण्यात आला होता.  विसजर्नस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
रेल्वे स्टेशनजवळील कृत्रिम तलाव, बोटक्लबच्या तलावासह हिराघाट येथील वालधुनीनदीसह, अंबरनाथचे शिवमंदिर, शहाड येथील उल्हासनदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. 
 
महापालिकेने गणोश मंडळाबाहेर कचरा कुंडीत टाका, घंटागाडीची वाट पाहा आदी बॅनर्सद्बारे जनजागृती केल्याची माहिती उपायुक्त देविदास पवार यांनी दिली़