शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

प्लॅस्टिक वापराविरोधात विशेष टास्क फोर्स, राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:24 IST

राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी प्लॅस्टिक उत्पादक संघटना, तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचे विशेष टास्क फोर्स नेमण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

मुंबई : राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी प्लॅस्टिक उत्पादक संघटना, तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचे विशेष टास्क फोर्स नेमण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.२३ मार्चला रोजी राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या उत्पादनावर, विक्री व खरेदीवर बंदी घातली. थर्माकोल, पीईटी आणि पीईटीई बाटल्या, बॅग, चमचे यांसारख्या वस्तूंवर राज्य सरकारने बंदी घातली. बंदी घातलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादक, विक्रेते यांना तीन महिन्यांची मुदत दिली. तर घरातील वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी लावण्यासाठी केवळ एका महिन्याची मुदत दिली. सरकारच्या बंदीच्या अधिसूचनेला प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी २२ जूनला आहे.शुक्रवारच्या सुनावणीत राज्य सरकारने न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी दोन समित्या नेमल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ती ही समिती प्लॅस्टिक उत्पादकांच्या निवेदनावर विचार करून निर्णय घेईल. दुसरी अंमलबजावणी समिती आहे. राज्य सरकारने विशेष टास्क फोर्स नियुक्त केले असून यामध्ये प्लॅस्टिक उत्पादक संघटना, वेगवेगळ्या संस्थेचे तज्ज्ञ, संबंधित सरकारी अधिकारी असतील. असेल. प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटसंबंधी हे पथक कृती आराखडा तयार करेल, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी