शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

प्लॅस्टिक वापराविरोधात विशेष टास्क फोर्स, राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:24 IST

राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी प्लॅस्टिक उत्पादक संघटना, तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचे विशेष टास्क फोर्स नेमण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

मुंबई : राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी प्लॅस्टिक उत्पादक संघटना, तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांचे विशेष टास्क फोर्स नेमण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.२३ मार्चला रोजी राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या उत्पादनावर, विक्री व खरेदीवर बंदी घातली. थर्माकोल, पीईटी आणि पीईटीई बाटल्या, बॅग, चमचे यांसारख्या वस्तूंवर राज्य सरकारने बंदी घातली. बंदी घातलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादक, विक्रेते यांना तीन महिन्यांची मुदत दिली. तर घरातील वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी लावण्यासाठी केवळ एका महिन्याची मुदत दिली. सरकारच्या बंदीच्या अधिसूचनेला प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी २२ जूनला आहे.शुक्रवारच्या सुनावणीत राज्य सरकारने न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर आळा बसावा, यासाठी दोन समित्या नेमल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ती ही समिती प्लॅस्टिक उत्पादकांच्या निवेदनावर विचार करून निर्णय घेईल. दुसरी अंमलबजावणी समिती आहे. राज्य सरकारने विशेष टास्क फोर्स नियुक्त केले असून यामध्ये प्लॅस्टिक उत्पादक संघटना, वेगवेगळ्या संस्थेचे तज्ज्ञ, संबंधित सरकारी अधिकारी असतील. असेल. प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटसंबंधी हे पथक कृती आराखडा तयार करेल, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी