शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महिलांविरोधी गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथके कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 02:47 IST

महिलांविरोधी गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व अशा गुन्ह्यांतील शिक्षेचे अल्प प्रमाण यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने २१ जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार ठरविलेल्या महिलांविरोधी गुन्ह्यांसाठीच्या विशेष पथकाची निर्मिती राज्यात अद्यापि झालेलीच नाही.

- डॉ. खुशालचंद बाहेतीमुंबई : महिलांविरोधी गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व अशा गुन्ह्यांतील शिक्षेचे अल्प प्रमाण यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने २१ जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार ठरविलेल्या महिलांविरोधी गुन्ह्यांसाठीच्या विशेष पथकाची निर्मिती राज्यात अद्यापि झालेलीच नाही.भारत सरकारने २०१६ मध्ये सर्व राज्यांना ३१ मार्च २०१६ पर्यंत इन्व्हेस्टिगेशन युनिट फॉर क्राईम अगेन्स्ट वूमन (कवउअह) तयार करावेत, असे निर्देश दिले होते. गुन्ह्यातील पीडित महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना तक्रारी नोंदविण्यास प्रवृत्त करणे व दाखल गुन्ह्यांचा तपास करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे, या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. देशभरात ५६४ जिल्ह्यांमध्ये अशी विशेष तपास पथके निर्माण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ६० जिल्ह्यांत, मध्यप्रदेशात ४०, बिहार ३२, तर दिल्लीमध्ये ९ पथके असावीत, असे सुचविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांत, प्रत्येक जिल्ह्यात ४ याप्रमाणे १२० विशेष तपास पथके बनवावीत, असे निर्देश आहेत.ही सर्व पथके पोलीस उपायुक्त किंवा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असतील. प्रत्येक जिल्ह्यात २ पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी त्यावर देखरेख करतील. प्रत्यक्ष तपास करण्यासाठी ४ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक व १५ कर्मचारी असावेत आणि यामध्ये किमान ३० टक्के महिला असाव्यात, असे निश्चित करण्यात आले आहे. या नवीन पदांसाठी केंद्र सरकार २ वर्षांपर्यंत ५० टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. मात्र, खर्चाचे हे अनुदान मिळण्यासाठी तपास पथकातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची नवीन पदे निर्माण करावीत, अशी अट घालण्यात आली आहे. उपलब्ध मनुष्यबळ या तपासपथकांसाठी वापरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण ३० टक्केमहिलांविरोधी गुन्ह्यांतील दोषसिद्धीचे प्रमाण २०१६ मध्ये १८.९ टक्के असून, हे प्रमाण गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहे.एक लाख महिलांमागे अशा गुन्ह्यांचे प्रमाण २०१२ मध्ये ४१.७ टक्के होते, ते २०१६ मध्ये ५२.२ टक्के झाले.महिला अत्याचाराचे गुन्हे घडण्याच्या प्रमाणात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण साधारणपणे ३० टक्के.मागील १० वर्षांत महिलांविरोधी गुन्ह्यांचे प्रमाण ८३ टक्क्यांनी वाढले. यात बलात्काराच्या गुन्ह्यांत ८८ टक्के, विनयभंगाच्या गुन्ह्यांत ११९ टक्के, तर कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांत ४५ टक्के वाढ झाली.

टॅग्स :Crimeगुन्हा