शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गोविंद पानसरे हत्येतील फरारी आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:01 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासंबंधी आढावा बैठक झाली. यावेळी तपास अधिकारी व सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते.पानसरे हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या तपासाचा तात्पुरता अधिकार इचलकरंजी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्याकडे सोपविण्यात आला. पूर्णवेळ काम करणारा अधिकारी लवकर द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.हत्येचा छडा कधी लागणार; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुंबई : नरेंद्र्र दाभोलकर यांच्या हत्येला ५२ महिने पूर्ण होत आहेत. गोंविद पानसरे यांच्या हत्येला ३६ महिने पूर्ण होत आहेत. २३ महिन्यांपूर्वी प्रा.कलबुर्गी यांची हत्या झाली. एवढे महिने उलटूनही मारेकºयांना अटक करण्यात आली नाही. परिणामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संताप व्यक्त करत काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.सनातनावर संस्थेवर बंदी यावी, असा प्रस्ताव २०११ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना करण्यात आला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेला भेट देऊनही याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शासनाने सनातनवरील कारवाईविषयी भूमिका जाहीर करावी अशी मागणीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर