शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

मतदारांचा टक्के वाढविण्यासाठी विशेष मोहीम

By admin | Updated: July 8, 2016 19:42 IST

त्येक निवडणुकीला जनजागृती करुनही मतदान सरासरी ५० टक्केच आहे़ तसेच मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटली असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ :  प्रत्येक निवडणुकीला जनजागृती करुनही मतदान सरासरी ५० टक्केच आहे़ तसेच मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटली असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे़ त्यानुसार महाविद्यालयात मतदार नोंदणी अर्ज वाटणे, निवडणुकीसंदर्भात शाळांमध्ये स्पर्धा आणि प्रसिद्ध अभिनेत्यांमार्फत संदेश देण्याचा कार्यक्रम महापालिकेने आखला आहे़ महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मतदार यादी १ जानेवारी २०१७ नंतर जाहीर करण्याची शक्यता आहे़ त्यापूर्वी नवीन मतदार, मतदार यादीतून नाव गायब असलेले मतदार, स्थालांतरीत झालेले मतदार अशा सर्वांना आपले नाव मतदार यादीत २० डिसेंबरपर्यंत नोंदविता किंवा अद्ययावत करता येणार आहे़

यासाठी असलेल्या केंद्राची यादीच महापालिकेने जाहीर केली आहे़ ५० टक्केच मुंबईकर करतात मतदान एक कोटी २४ लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईत ६२ टक्के मतदार असणे अपेक्षित आहे़ मात्र प्रत्येक महापालिका निवडणुकीत मतदानाचा आकडा ५० टक्क्यांवरच अडकला आहे़ मतदारांची यादी अद्ययावत केली असता २०१२ नंतर एक कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ मतदारांची संख्येत घट होऊन आजच्या घडीला ९१ लाख ८७ हजार २७८ मतदार उरले आहेत़ उपनगरांची लोकसंख्या वाढली शहर भागातील महागडी जीवनशैली परवडत नसल्याने बहुतांशी मुंबईकर उपनगरांकडे वळत असल्याचे यापूर्वीच उजेडात आले आहे़ मात्र आकडेवारीनुसार शहराच्या लोकसंख्येत तीन टक्के घट तर उपनगरांच्या लोकसंख्येत आठ टक्के वाढ झाले असल्याचे आता समोर आले आहे़

पुढच्या वर्षी सुजाण होणारेही मतदार १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मतदार होता येणार आहे़ यासाठी सप्टेंबरपासून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणी मोहीम सुरु होणार आहे़ तेव्हा या मतदारांना आपल्या वयाचा पुरावा देऊन वयाची १८ वर्षे पूर्ण व्हायचा दोन महिन्याआधीच आपले नाव नोंदविता येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले़ आरक्षण वाढणार सरासरी ५० ते ५५ हजार मतदारांचा एक वॉर्ड असतो़ प्रत्येक वॉर्डाची फेररचना होणार आहे़ अनुसूचित जाती व जमातीच्या व इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे आरक्षित वॉर्डांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़

 

तरीही वॉर्डांची संख्ये २२७ च राहणार आहे़ जनजागृतीसाठी अभिनेते मैदानात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्यांना मैदानात उतरविण्यात आले आहे़ या मोहिमेला मराठी अभिनेते अशोक सराफ, प्रशांत दामले आणि स्वप्नील जोशी यांनी प्रतिसाद दिला आहे़ त्यानुसार मतदार नोंदणाचे संदेश देणाऱ्या पोस्टर्स व जाहितरातींमध्ये हे कलाकार झळकणार आहेत़ लोकसंख्येत चढउतार २०१२ मध्ये एक कोटी १९ लाख ७८ हजार ४५० लोकसंख्या होती़ यापैकी १ कोटी दोन लाख ८६ हजार ५७९ मतदार होते़ २०१७ मध्ये लोकसंख्येत वाढ होऊन एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ झाली आहे़ तर मतदार मात्र ९१ लाख ८७ हजार २७८ उरले आहेत़

मतदान केंद्र पहिल्यांदाच वाढणार २०१२ च्या पालिका निवडणुकीत ७६३९ मतदान केंद्रे होती़ मतदारांची घटणारी संख्ये पाहता दूरवरच्या मतदान केंद्रावर मतदार फिरकत नसल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे एक कि़मी़हून कमी अंतरावर मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे़ त्यानुसार नऊ हजारांहून अधिक मतदान केंद्रे यावेळीस असणार आहेत़ मात्र एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांची मर्यादा घालण्यात येणार आहे़

अशी होणार मतदारांची नोंदणी

टोल फ्री हेल्पलाईन १८००२२१९५० यावर मतदार नोंदणीविषयी माहिती उपलब्ध आहे़ तर www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी अर्ज व माहिती उपलब्ध आहे़ तसेच महाविद्यालयांमध्येही अर्ज वाटण्यात येणार आहेत़ त्याचबरोबर नावात बदल, नावाचा समावेश, मृत मतदाराचे नाव वगळणे, स्थलांतर, नावात दुरुस्ती व नोंदणीसाठी उपनगरांमध्ये २६ केंद्र आहेत़ ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहील़ या सर्वांची माहिती संकेतस्थळावर आहे़