शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

मनमोकळेपणाने बोलले, तरी राष्ट्रद्रोहाचे आरोप : कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:42 IST

देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी

पुणे : देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बदलत्या काळाच्या ओघात युक्रांदच नव्हे, तर अनेक सामाजिक चळवळी निस्तेज झाल्या आहेत. या सर्वाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आता केवळ समाजवादी नेते राहिले असून त्यांचे अनुयायी आहेत तरी कुठे, असा सवालही उपस्थित केला. प्रा. विजय दर्प यांनी लिहिलेल्या ‘युक्रांदचे दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, कॉँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. अंजली सोमण, पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘युक्रांदने राज्यात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवनार्चे काम केले आहे. युक्रांदने युवक-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन केले आहे. आंदोलने उभारून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. मात्र, कालांतराने युक्रांदच नव्हे, तर अनेक चळवळी नाहीशा झाल्या. त्यामुळे सध्या या चळवळींचा शोध घेतला पाहिजे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रद्रोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदसारख्या चळवळीची आवश्यकता आहे. त्यातून येणाऱ्या पिढीला नैतिकतेच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल. तसेच त्यातून नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहण्यासाठी उपयोग होईल.’’डॉ. सोमण यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. प्रा. दर्प यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)> सध्या देशात मोठ्या प्रमाणात जातीयता आहे. त्याला कारणीभूत माणसाच्या विचारातील तीव्र स्मृतिघटक आहेत. हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्म यांत संबंध नाही. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करणे हा काही लोकांसाठी सत्ता मिळविण्याचा मार्ग झाला आहे. सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना हिंदू धर्म माहीत नसून, ते आणि त्यांच्याशी संबंधित राजकीय संस्था केवळ सत्ता हाती असल्याने सामाजात धिंगाणा घालत असतात.- डॉ. कुमार सप्तर्षी