शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मनमोकळेपणाने बोलले, तरी राष्ट्रद्रोहाचे आरोप : कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:42 IST

देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी

पुणे : देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बदलत्या काळाच्या ओघात युक्रांदच नव्हे, तर अनेक सामाजिक चळवळी निस्तेज झाल्या आहेत. या सर्वाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आता केवळ समाजवादी नेते राहिले असून त्यांचे अनुयायी आहेत तरी कुठे, असा सवालही उपस्थित केला. प्रा. विजय दर्प यांनी लिहिलेल्या ‘युक्रांदचे दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, कॉँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. अंजली सोमण, पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘युक्रांदने राज्यात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवनार्चे काम केले आहे. युक्रांदने युवक-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन केले आहे. आंदोलने उभारून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. मात्र, कालांतराने युक्रांदच नव्हे, तर अनेक चळवळी नाहीशा झाल्या. त्यामुळे सध्या या चळवळींचा शोध घेतला पाहिजे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रद्रोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदसारख्या चळवळीची आवश्यकता आहे. त्यातून येणाऱ्या पिढीला नैतिकतेच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल. तसेच त्यातून नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहण्यासाठी उपयोग होईल.’’डॉ. सोमण यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. प्रा. दर्प यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)> सध्या देशात मोठ्या प्रमाणात जातीयता आहे. त्याला कारणीभूत माणसाच्या विचारातील तीव्र स्मृतिघटक आहेत. हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्म यांत संबंध नाही. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करणे हा काही लोकांसाठी सत्ता मिळविण्याचा मार्ग झाला आहे. सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना हिंदू धर्म माहीत नसून, ते आणि त्यांच्याशी संबंधित राजकीय संस्था केवळ सत्ता हाती असल्याने सामाजात धिंगाणा घालत असतात.- डॉ. कुमार सप्तर्षी