शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’

By admin | Updated: November 15, 2014 01:38 IST

‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

चेतन ननावरे - मुंबई 
‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ लागलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गेल्या काही महिन्यांपासून मैदान थंडावले होते. मात्र नवनिर्वाचित सरकारच्या कानावर मागण्या पोहोचवण्यासाठी कामगार संघटनांच्या तोफा पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संघटित आघाडी सरकारचा पायउतार झाल्याने आता भारतीय जनता पक्षप्रणीत नवनिर्वाचित सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे याआधी विरोधी बाकावर असताना भाजपाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी काही संघटना मोर्चा काढणार आहेत. तर आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी काही संघटना नव्या सरकारवर दबाव तंत्रचा वापर करण्यासाठी आक्रमक पवित्र घेताना दिसतील. त्यात प्रामुख्याने घरेलू कामगार, नाका कामगार, बांधकाम कामगार आणि कंत्रटी कामगार अशा असंघटित कामगारांचा समावेश आहे. शिवाय गिरणी कामगार, महापालिका आणि राज्य शासन कर्मचारी व अधिकारी या संघटित कामगार संघटनाही दिसतील. आझाद मैदानापुढे मोर्चे नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आंदोलक भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीबाग येथून मोर्चे घेऊन मैदानावर धडकतात. त्याआधी मोर्चाचे नेतृत्व करणा:या व्यक्तीकडून बंधपत्र भरून घेतले जाते. जेणोकरून आंदोलकांनी कोणतेही गैरवर्तन केल्यास बंधपत्र भरणा:या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. याउलट परवानगी नसताना मोर्चा काढणा:यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात.
 
ऑक्टोबर 2क्14 र्पयत 2क्क् हून कमी आंदोलने झाल्याचा दावा आझाद मैदान पोलिसांनी केला आहे. या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे यंदा आंदोलनांची संख्या घटल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
मराठा आरक्षण, एलबीटी, दलित हत्याकांडाच्या वाढत्या घटना, इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणो या ज्वलंत मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी त्या-त्या समाजाच्या प्रमुख संघटना आझाद मैदानावर धडकण्याची शक्यता आहे.
 
एमएमआरडीएची दोन घरे एकत्रित करून गिरणी कामगारांना येत्या सहा महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय मालकांच्या ताब्यातील गिरण्या ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम सुरू करण्याची मागणी करण्यासाठी लवकरच आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी मंगळवारी गिरणी कामगारांच्या पाच प्रमुख संघटनांची बैठक आयोजित केली आहे. मोर्चाची तारीखही त्याच बैठकीत निश्चित केली जाईल.
- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते
 
देशव्यापी बंद केल्यानंतर जॉइंट ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भायखळा येथील राणीबागहून धडक मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. त्यात असंघटित कामगारांना किमान वेतन मिळण्याचा कायदा करण्याची मागणी करण्यासाठी सीटू, इंटक अशा विविध केंद्रीय कामगार संघटना एकत्र येणार आहेत.
- शुभा शमीम, सामाजिक कार्यकत्र्या
 
पाथर्डी हत्याकांडापाठोपाठ राज्यात विविध दलित वस्त्यांवर आणि कुटुंबांवर जातीय हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर धडक मोर्चा काढणार आहे.
- ज्योती बडेकर, सामाजिक कार्यकत्र्या