शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’

By admin | Updated: November 15, 2014 01:38 IST

‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

चेतन ननावरे - मुंबई 
‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ लागलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गेल्या काही महिन्यांपासून मैदान थंडावले होते. मात्र नवनिर्वाचित सरकारच्या कानावर मागण्या पोहोचवण्यासाठी कामगार संघटनांच्या तोफा पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संघटित आघाडी सरकारचा पायउतार झाल्याने आता भारतीय जनता पक्षप्रणीत नवनिर्वाचित सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे याआधी विरोधी बाकावर असताना भाजपाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी काही संघटना मोर्चा काढणार आहेत. तर आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी काही संघटना नव्या सरकारवर दबाव तंत्रचा वापर करण्यासाठी आक्रमक पवित्र घेताना दिसतील. त्यात प्रामुख्याने घरेलू कामगार, नाका कामगार, बांधकाम कामगार आणि कंत्रटी कामगार अशा असंघटित कामगारांचा समावेश आहे. शिवाय गिरणी कामगार, महापालिका आणि राज्य शासन कर्मचारी व अधिकारी या संघटित कामगार संघटनाही दिसतील. आझाद मैदानापुढे मोर्चे नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आंदोलक भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीबाग येथून मोर्चे घेऊन मैदानावर धडकतात. त्याआधी मोर्चाचे नेतृत्व करणा:या व्यक्तीकडून बंधपत्र भरून घेतले जाते. जेणोकरून आंदोलकांनी कोणतेही गैरवर्तन केल्यास बंधपत्र भरणा:या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. याउलट परवानगी नसताना मोर्चा काढणा:यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात.
 
ऑक्टोबर 2क्14 र्पयत 2क्क् हून कमी आंदोलने झाल्याचा दावा आझाद मैदान पोलिसांनी केला आहे. या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे यंदा आंदोलनांची संख्या घटल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
मराठा आरक्षण, एलबीटी, दलित हत्याकांडाच्या वाढत्या घटना, इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणो या ज्वलंत मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी त्या-त्या समाजाच्या प्रमुख संघटना आझाद मैदानावर धडकण्याची शक्यता आहे.
 
एमएमआरडीएची दोन घरे एकत्रित करून गिरणी कामगारांना येत्या सहा महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय मालकांच्या ताब्यातील गिरण्या ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम सुरू करण्याची मागणी करण्यासाठी लवकरच आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी मंगळवारी गिरणी कामगारांच्या पाच प्रमुख संघटनांची बैठक आयोजित केली आहे. मोर्चाची तारीखही त्याच बैठकीत निश्चित केली जाईल.
- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते
 
देशव्यापी बंद केल्यानंतर जॉइंट ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भायखळा येथील राणीबागहून धडक मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. त्यात असंघटित कामगारांना किमान वेतन मिळण्याचा कायदा करण्याची मागणी करण्यासाठी सीटू, इंटक अशा विविध केंद्रीय कामगार संघटना एकत्र येणार आहेत.
- शुभा शमीम, सामाजिक कार्यकत्र्या
 
पाथर्डी हत्याकांडापाठोपाठ राज्यात विविध दलित वस्त्यांवर आणि कुटुंबांवर जातीय हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर धडक मोर्चा काढणार आहे.
- ज्योती बडेकर, सामाजिक कार्यकत्र्या