शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

Abu Azmi on Raj Thackeray: “गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”; अबू आझमींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 11:31 IST

Abu Azmi on Raj Thackeray: शिवाजी पार्क शांतता क्षेत्र असून, राज ठाकरेंच्या सभेवेळी किती ध्वनिप्रदूषण झाले, याची तपासणी करून पोलिसांनी कारवाई करावी, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथील मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार तोफ डागली. यावेळी मशिदींवरील भोंग्याबाबतही राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडत आक्षेप घेतला. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्युत्तरही दिले. तर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. यात आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी उडी घेतली असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मांडल्याने मनसेतील मुस्लिम पदाधिकारी नाराज झाल्याचे सांगितले जात असून, पुण्यातील पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. यानंतर आता मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?

मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का, असा सवाल करत, पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. तसेच मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे. 

ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही

वेगवेगळे उत्सव व विवाह समारंभातील डीजेंमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही. शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नाही, असे अबू आझमी यांनी सांगितले. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण