शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

सोयाबीनवर किडींचे आक्रमण!

By admin | Updated: August 3, 2015 00:19 IST

पावसाने फिरवली पाठ, तापमान वाढले; शेतकरी हतबल.

अकोला : सोयाबीन पिकावर विविध किडींनी आक्रमण केले असून, ही कीड सोयाबीनच्या पानांची चाळणी करीत असल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सव्वा महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले होते. परंतु दोन दिवसातच पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने किडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भात जवळपास १६ लाख हेक्टरच्यावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे; पण लगेच पावसाने दडी मारल्याने जवळपास ७0 टक्के पीक हातचे गेले असून, शेकडो शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला. पावसाचे पुनरागमन झाल्याने उर्वरित ३0 टक्के पिके तरतील, अशी आशा निर्माण झाली होती. तथापि पावसाने गत आठवड्यापासून दडी मारल्याने किडींना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्यातरी ही हिरवी अळी असल्याचे कृषी तज्ज्ञांमार्फत सांगितले जात असले तरी झाडांची होणारी चाळणी बघता हिरवी उंटअळी किंवा तंबाखूची पाने खाणारी ही अळी असावी, असा कयास लावला जात असल्याने शेतकरी आणखीच धास्तावला आहे. अकोला व अमरावती जिल्हय़ातील काही भागातील सोयाबीन पिवळे पडले असून, पिवळा मोझ्ॉक या रोगामुळे या भागातील सोयाबीनची पाने पिवळी झाली आहेत. नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्ये कमी झाल्याने पाने पिवळी पडतात. मात्र पानाच्या शिरा हिरव्या राहतात. पण, अकोला जिल्हय़ातील बोंदरखेड शिवारातील सोयाबीनच्या पानांची पूर्णत: चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी हिरवी उंट अळी निदर्शनात आली आहे. या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च करावा लागणार आहे. परंतु शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने शेतकरी कीटकनाशकांवर खर्च करणे टाळत असल्याचे चित्र आहे.