शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

पावसाअभावी वऱ्हाडात पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: June 30, 2015 02:40 IST

पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता; तथापि सध्या पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये खरिपाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ८३ हजार ८०० हेक्टर असून, २९ जूनपर्यंत १६ लाख हेक्टरच्यावर पेरणी पोहोचल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी यंदाही सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनचे क्षेत्र या विभागात सहा लाख हेक्टरवर पोहोचले आहे.सोयाबीनचा पेरा वाढलापाच जिल्ह्यांत सुरुवातीला कपाशीने आघाडी घेतली होती. आता सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, शुक्रवारपर्यंत ६ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयबीनचा पेरा केला. कापसाचे क्षेत्रही ४ लाख ८८ हजार १०० हेक्टरच्यावर पोहोचले आहे. मूग २८,९००, उडीद १ लाख ८७ हजार, तर तुरीची १ लाख २५ हजार ७०० हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे. पाऊस असमान पाच जिल्ह्यांत १ ते २६ जूनपर्यंत १७८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ११८.२ मि.मी., अकोला जिल्हा ११२.७ मि.मी., वाशिम जिल्हा १४२.१ मि.मी., अमरावती जिल्ह्यात १२६.५ मि.मी., तर यवतमाळ जिल्ह्यात १५२.२ एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.