शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पावसाअभावी पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 27, 2016 01:18 IST

भोर तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

भोर : भोर तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पश्चिम भागातील धूळवाफेवर पेरलेल्या बियांची चांगली उगवण झाली आहे. वीसगाव खोऱ्यातील रखडलेल्या भातासह इतर बियाण्यांच्या पेरणीला सुरुवात झाली. पूर्व भागातील महामार्गासह आजूबाजूच्या गावातील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी व पेरलेल्या बियांसाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे. भोर तालुक्याच्या पश्चिम भागात धूळवाफेवर भाताचे बी पेरून काही भागात एक महिना झाला आहे. काही ठिकाणच्या बियांची चांगली उगवण झाली आहे. मात्र जून महिना संपायला चार दिवस राहिले तरी पावसाने दडी मारल्याने भातासह इतर बी पेरण्यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून झालेल्या रिमझिम पावसामुळे भाटघर व नीरा देवघर धरणभागात भाताच्या पेरण्या होऊन एक महिना झाला असून पेरलेली भाताची रोपे उगवली आहेत. पावसामुळे रोपे चांगली उगवण्यास मदत होणार आहे. वीसगाव व आंबवडे खोऱ्यात रिमझिम पावसामुळे भातासह इतर पिकांच्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. मात्र पूर्व भागातील महामार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे करून ठेवली असून, शेतकरी दमदार पासवाची वाट पाहात आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतरच बियांची पेरणी करतात. मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील पेरण्या रखडल्या आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात वळवाचे तीन, चार दमदार पाऊस झाल्यावर रोहिणी नक्षत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवर भाताच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र या वेळी एप्रिल आणि मे महिन्यात वळवाचा पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या एक महिना पुढे गेल्या आहेत. नीरा देवघर भागात वळवाचा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताच्या धूळवाफेवरील पेरण्या रखडल्या होत्या. यामुळे बळीराजा चिंतेत असून आकाशाकडे डोळे लावून पावसाची अतुरतेने वाट पाहात आहे.>भोर तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. बागायती क्षेत्र ७३३४ हेक्टर तर जिरायती क्षेत्र ३०,३०८ हेक्टर आहे. भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात सर्वाधिक पश्चिम भागातील हिर्डोशी, भुतोंडे, वेळवंड आणी महुडे खोऱ्याचा समावेश आहे. या भागाला भाताचे आगार समजतात. नाचणी १५०० हेक्टर, मका ८००, बाजरी २००, ज्वारी १००, भुईमूग ४००० हेक्टर, कारळ ४००, सोयाबीन ३००, कडधान्य १ हजार हेक्टर तर तृणधान्य १०९००, असा एकूण अन्नधान्य ११,९०० हेक्टरवर घेतले जाते. मात्र पावसाअभावी पेरण्याच रखडल्याने भातासह इतर पिकांच्या पेरण्या एक महिना पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो, असे कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.>वेल्ह्यात भातरोपे तरारली; तर पर्यटकांची गर्दी वाढलीमार्गासनी : वेल्हे तालुक्यात पावसाने हळुवारपणे हजेरी लावली असली तरी या पावसाने भातरोपे तरारली असून, तालुक्यात निसर्गसौंदर्य खुलले असल्याने पर्यटकांनी सुट्टीच्या दिवशी गर्दी केली आहे. हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून तुरळक हलक्या तर कधी मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वेल्ह्यातील शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातरोपांची १०० टक्के पेरणी झाली असून, पावसाच्या पाण्याने भातरोपे तरारली आहेत, तर तालुक्यात मुख्य पीक भातरोपाबरोबर सोयाबिन, भुईमूग,नाचणी,यांचीदेखील पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली.