शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आठवलेंच्या रिपाइंला हवा दक्षिण मध्य किंवा ईशान्य मुंबई मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:01 IST

युतीतील घटक पक्षांचे रुसवे-फुगवे : रासपला हव्यात पाच जागा

मुंबई : शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता घटक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंसाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडावा. तसेच, सोलापूर, लातूर आणि रामटेक या तीनपैकी एक जागा सोडावी, अशी मागणी रिपाइने केली आहे. सोमवारी वांद्रे येथे रिपाइं नेते, पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता घटक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्री महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) पाच तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंसाठी दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही एनडीएसोबत राहू, मात्र शिवसेना आणि भाजपाने त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाइंसाठी सोडावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात युतीतील जागावाटपाची घोषणा झाली. या जागावाटपानुसार शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढविणार आहे. युतीच्या या जागावाटपावर रामदास आठवले यांनी आक्षेप घेतला आहे. सोमवारी वांद्रे येथे रिपाइं नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंसाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडावा. तसेच, सोलापूर, लातूर आणि रामटेक या तीनपैकी एक जागा सोडावी, असा प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

रिपाइंने दोन जागांची मागणी केली असताना रासपने भाजपा-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. येत्या ५ मार्चला रासपने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत या मेळाव्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे रासपने स्पष्ट केले.एनडीएतच राहण्याचा निर्णययुतीचा निर्णय घेताना विश्वासात घेण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश गेला आहे. नाराजी असली तरी स्वबळावर अथवा तिसºया, चौथ्या आघाडीच्या पर्यायांचा विचार न करता एनडीएत राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :mumbai-south-central-pcमुंबई दक्षिण मध्यLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले