शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सोफिया वीज प्रकल्पाने थकविले १७२ कोटी

By admin | Updated: June 13, 2014 03:15 IST

इंडिया बुल्स कंपनीच्या अमरावती येथील सोफिया वीज प्रकल्पाने जलसंपदा विभागाची १७२ कोटी रुपयांची रक्कम थकविली असल्याची बाब गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात समोर आली

मुंबई : इंडिया बुल्स कंपनीच्या अमरावती येथील सोफिया वीज प्रकल्पाने जलसंपदा विभागाची १७२ कोटी रुपयांची रक्कम थकविली असल्याची बाब गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात समोर आली. तथापि, या थकबाकीला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, कंपनीविरुद्ध कारवाई करण्यास न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्याची हतबलता जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दर्शविली.भाजपाचे डॉ. खुशाल बोपचे यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. पुनर्स्थापना खर्चापोटी एकरी एक लाख रुपये याप्रमाणे कंपनीने २३२ कोटी १८ लाख रुपये करारानुसार जलसंपदा विभागाकडे भरावयाचे होते. त्यातील ११६ कोटी रुपयांचे दोन हप्ते कंपनीने भरले; पण तिसरा हप्ता भरण्याआधी पुनर्स्थापना खर्च एकरी ५० हजार रुपयेच आकारायला हवा, या मुद्द्यावर ते न्यायालयात गेले.मात्र एक लाख रुपयांप्रमाणेच कंपनीने पैसे भरायला हवेत आणि आता दंड व व्याजाचीही रक्कम द्यावी, अशी शासनाची भूमिका असून, ती न्यायालयात मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची पाण्याची थकबाकी असली की त्याचे पाणी कापता, मग कंपनीविरुद्ध कारवाई का केली नाही, असा सवाल ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी केला. त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अडचण तटकरे यांनी सांगितली. बाळा नांदगावकर, प्रशांत बंब यांनीही प्रश्न उपस्थित केले. कंपनी काळ्या यादीतचोपडा तालुक्यातील (जि. जळगाव) काही शेतकऱ्यांना केळीची बनावट रोपे पुरविणाऱ्या मावळ येथील गार्गी कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचे सर्व परवाने रद्द करण्यात येतील, असे आश्वासन फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.नुकसान झालेल्या १९ शेतकऱ्यांना २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले आहे, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली. चिखली तांडा (ता. दारव्हा) येथे अडाण सिंचन प्रकल्पाच्या कालव्याची गळती कायमस्वरूपी रोखण्यासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येतील, असे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिले. शिवसेनेचे संजय राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच रामगाव ते धामणगाव मार्गावरील पूल आणि रस्ता दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती केली जाईल, असे मुळक म्हणाले.कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे एक महिन्यांच्या आत भरण्यात येतील. कोल्हापूरमध्ये प्राध्यापकांचे १, सहयोगी प्राध्यापकांची ३, सहायक प्राध्यापकांची ४ अशी एकूण ८ पदे मंजूर असून, त्यातील ६ रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाऐवजी राज्यातील अशी पदे थेट भरण्याची परवानगी राज्य शासनाकडून मागितली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश हळवणकर यांच्या प्रश्नात सांगितले. (विशेष प्रतिनिधी)