शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

गृहविभागात लवकरच मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:30 IST

राज्याच्या गृहविभागात मोठे फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस असून त्याअंतर्गत सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे.

यदु जोशी  मुंबई : राज्याच्या गृहविभागात मोठे फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस असून त्याअंतर्गत सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे.राज्यात एकीकडे अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता असताना श्रीवास्तव यांना गृह विभागातून हलविले जाऊ शकते, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.श्रीवास्तव हे मध्यंतरी मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते. डी. के. जैन, मेधा गाडगीळ यांच्यासोबत त्यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. तथापि डी. के. जैन यांच्या नावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पसंती दिली.त्यामुळे नाराज झालेले गाडगीळ व श्रीवास्तव रजेवर गेले होते. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, श्रीवास्तव यांना पर्यावरण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पाठवले जाईल व सोबतच प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मंडळाचे अध्यक्षपद हे विज्ञानविषयक शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाच मंडळाचे देता येते. श्रीवास्तव यांनी केमिकल इंजिनिअरींग केले आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती उत्तम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री आता श्रीवास्तव यांच्या जागी कुणाची नियुक्ती करतात, याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे नाव चर्चेत आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गृहविभागाची घडी नीट बसविण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर असेल.श्रीवास्तव हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. वित्त विभागाची सूत्रे त्यांनी दीर्घकाळ यशस्वीरित्या सांभाळली आहेत. असे असले तरीही गृह विभागाचा बाज वेगळा असतो, म्हणून अन्य नावांचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस