शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

'अर्थ खात्याकडून कधी कधी एसटी महामंडळाला वेळेवर पैसे मिळत नाही, त्यामुळे...'; सरनाईकांनी सांगितली अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:55 IST

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्याकडून एसटी महामंडळाला वेळेवर पैसे मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. त्यांनी अजित पवारांकडे विनंतीही केली आहे.

Ajit Pawar Pratap Sarnaik: राज्य सरकारकडून एसटी प्रवासात सवलत देणाऱ्या अनेक योजना राबवल्या जात आहे. यात महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजनेचा वाटा मोठा असून, या माध्यमातून एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून प्रतिपूर्ती म्हणून पैसे दिले जातात. या सवलत योजनांचे पैसे अर्थ खात्याकडून वेळेवर मिळत नसल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाला सरकारकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याने अडचणी निर्माण होतात, असे सांगितले.  

अजित पवारांना सरनाईकांनी केली विनंती

"प्रवासी संख्या आमची वाढली आहे, परंतू जे पैसे आम्हाला शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात. ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही नफ्यात जाऊ. कधी कधी ते पैसे अर्थ खात्याकडून वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कधी कधी अडचणी निर्माण होतात. मी अर्थ खात्याचे प्रमुख अजित पवारांना विनंती केली आहे की, आम्हाला अर्थ खात्यातर्फे योग्य सहकार्य मिळालं पाहिजे", असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

पालघर शिवसेनेचाच बालेकिल्ला 

पालघर जिल्ह्यातील जनता दरबाराबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, "नाईकांचा दरबार, सरनाईकांचा दरबार अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. हे बरोबर नाही. शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. बहुमत आम्हाला दिलेलं आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कामं करायची आहेत, त्या जिल्ह्यात आम्ही पोहोचतो." 

वाचा >तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

"पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पालघर जिल्ह्यावर आनंद दिघेंचं विशेष प्रेम होतं. त्यांनी रात्री-बेरात्री फिरून संघटना रूजवली. पालघरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही विशेष प्रेम होतं. पक्षाचे नेते एकनाथ शिंदेंनी या जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. शिवसैनिक कामाला लागले आहेत", असे सरनाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले.