शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

कोकण रेल्वेतील प्रश्न सोडवा

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

उमेश गाळवणकर : भानू तायल यांच्यावर केले गंभीर आरोप

कुडाळ : देशात नावलौकीक मिळविलेल्या कोकण रेल्वे महामंडळाला अधोगतीच्या मार्गाला नेण्याचे काम भानू तायल यांनी केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवासी तिकीट काढून जीव धोक्यात घालून प्रवास करत असून, याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन केआरसी एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केले आहे.गेल्या दहा वर्षांत नोव्हेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेचा वेग वाढविण्यात आला आहे. परंतु, यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाला गाड्यांचा वेग पूर्णपणे वाढविणे शक्य झाले नाही, याची जबाबदारी भानू तायल यांनी घेणे अपेक्षित होते. मात्र, असे झाले नाही. गेल्या चार वर्षात कोकण रेल्वेच्या ट्रॅकचा मेंटनन्स झालेला नाही. अपघात झाल्यास स्थानिक गँगमन, पीडब्लूआर यांच्यावर आरोपपत्र दाखल करुन त्यांना निलंबित करण्याचे काम तायल यांनी केले आहे. मात्र, अपघात होण्यास जबाबदार व्यक्ती म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांचा बळी देत भानू तायल यांनी ‘कुठे नेऊन ठेवलीय कोकण रेल्वे आमची’ असा सवालही गाळवणकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कोकणातील नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा रेल्वेच्या अपघातात झालेली जीवितहानी पाहण्याव्यतिरिक्त काहीही करु शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले असल्याचे गावळवणकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे.कोकण रेल्वेच्या या ट्रॅकवरील अनेक प्रश्नांची उजळणी वेलेवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात अले मात्र आता हे सो बस्स झाले यापुढे कोकण रेल्वेच्या संदर्भातले विविध प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण शांत रहाणार नाही असे आज गाशवणकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्यात भानू तायल जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टॅक व्यवस्थापन, गाडीचा वेग. कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे गाळवणकरांची मागणी.दहा वर्षात रेल्वे मार्गावरील वेग वाढविल्याची माहिती.यावर्षी वेग वाढविण्यात आले अपयश. तायल जबाबदारी झटकताहेत. गेल्या चार वर्षात साधा ट्रॅकही व्यवस्थित राखता आला नाही.विविध मागण्यांसाठी गाळवणकर यांची मागणी. मतभेदाची उजळणी करीत राहण्यापेक्षा एकत्र येऊन प्रयन करणे गरजेचे.