शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

कोकण रेल्वेतील प्रश्न सोडवा

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

उमेश गाळवणकर : भानू तायल यांच्यावर केले गंभीर आरोप

कुडाळ : देशात नावलौकीक मिळविलेल्या कोकण रेल्वे महामंडळाला अधोगतीच्या मार्गाला नेण्याचे काम भानू तायल यांनी केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवासी तिकीट काढून जीव धोक्यात घालून प्रवास करत असून, याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन केआरसी एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केले आहे.गेल्या दहा वर्षांत नोव्हेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेचा वेग वाढविण्यात आला आहे. परंतु, यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाला गाड्यांचा वेग पूर्णपणे वाढविणे शक्य झाले नाही, याची जबाबदारी भानू तायल यांनी घेणे अपेक्षित होते. मात्र, असे झाले नाही. गेल्या चार वर्षात कोकण रेल्वेच्या ट्रॅकचा मेंटनन्स झालेला नाही. अपघात झाल्यास स्थानिक गँगमन, पीडब्लूआर यांच्यावर आरोपपत्र दाखल करुन त्यांना निलंबित करण्याचे काम तायल यांनी केले आहे. मात्र, अपघात होण्यास जबाबदार व्यक्ती म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांचा बळी देत भानू तायल यांनी ‘कुठे नेऊन ठेवलीय कोकण रेल्वे आमची’ असा सवालही गाळवणकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कोकणातील नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा रेल्वेच्या अपघातात झालेली जीवितहानी पाहण्याव्यतिरिक्त काहीही करु शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले असल्याचे गावळवणकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे.कोकण रेल्वेच्या या ट्रॅकवरील अनेक प्रश्नांची उजळणी वेलेवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात अले मात्र आता हे सो बस्स झाले यापुढे कोकण रेल्वेच्या संदर्भातले विविध प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण शांत रहाणार नाही असे आज गाशवणकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्यात भानू तायल जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टॅक व्यवस्थापन, गाडीचा वेग. कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे गाळवणकरांची मागणी.दहा वर्षात रेल्वे मार्गावरील वेग वाढविल्याची माहिती.यावर्षी वेग वाढविण्यात आले अपयश. तायल जबाबदारी झटकताहेत. गेल्या चार वर्षात साधा ट्रॅकही व्यवस्थित राखता आला नाही.विविध मागण्यांसाठी गाळवणकर यांची मागणी. मतभेदाची उजळणी करीत राहण्यापेक्षा एकत्र येऊन प्रयन करणे गरजेचे.