शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अनवाणी प्रवासातून साकारलेली 'सोल'फुल जोडी

By अोंकार करंबेळकर | Updated: August 23, 2017 16:52 IST

फेकून दिलेल्या बुटांमधून अनवाणी चालणाऱ्या मुलांसाठी नव्या चपला तयार करण्याची अनोखी किमया मुंबईच्या श्रीयांश आणि रमेश या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे.

ठळक मुद्देभारतभरातून जुने चपला-बूट त्यांच्याकडे येतात. त्यांचे सोल प्रथम वेगळे केले जातात. मग ते सोल व्यवस्थित धुवून निर्जंतूक केले जातात या सोलवर नवे कापडाचे किंवा चामड्याचे आवरण चढवतात. मग चपलाचे वरचे भाग (अप्पर) त्यावर लावून मस्त नव्याकोऱ्या चपला ते बनवतात.

मुंबई, दि.23- नव्या चपला किंवा बूट घेतले की थोड्या वापरानंतर त्या नकोशा वाटायला लागतात, बऱ्याचदा ते वापरायोग्यही असतात पण केवळ जुने झाले, रंग फिका झाला म्हणून त्यांचं वापरणं बंद होतं. चप्पल-बुटांचे असे जोड थोडे दिवस घरात लोळत पडले की मग त्यांची अडचण व्हायला लागते, शेवटी त्यांची रवानगी घराबाहेर कचऱ्यात होते. असे फेकून दिलेले जोड आपल्याला नेहमी दिसत असतात. कचऱ्यात, नाल्यात, नदीत किंवा समुद्रातून पुन्हा किनाऱ्यावर फेकले गेलेले चप्पल-बुटांचे जोड पाहणं फारसं नवीन नसतं. पण या चप्पल बुटांचा उपयोग करुन त्यातून अनवाणी चालणाऱ्या मुलांसाठी नव्या चपला तयार करण्याची अनोखी किमया मुंबईच्या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे. ग्रीनसोल नावाची कंपनीच या दोघांनी स्थापन केली आहे.

हे दोघे आहेत श्रीयांश भंडारी आणि रमेश धामी. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसासारखे हे दोघेही काहीतरी वेगळं करुन दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आले. श्रीयांश आहे मुळचा उदयपूरचा, शिक्षणासाठी त्यानं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. तर रमेशची गोष्ट एखाद्या सिनेमात शोभावी अशी आहे. काहीतरी चांगलं करायचं असं त्याला लहानपणापासून वाटायचं. उत्तराखंडमधल्या लहानशा गावात आपल्याला काही करणं शक्य नाही असं वाटून त्यानं वयाच्या दहाव्या वर्षी गाव सोडलं आणि लहानसहान कामं करत उत्तर भारतात भटकत राहिला. मग सिनेमात करायची इच्छा मनात घेऊन त्यानं एकदा मुंबईत प्रवेश केला. इथेही काही दिवस छोटीमोठी कामं केल्यानंतर त्याला कोठेच आसरा मिळत नव्हता. शेवटी त्याला साथी नावाच्या एनजीओने आसरा दिला. साथीच्या संपर्कात आल्यावर त्याची राहण्या-खाण्याची आणि शिक्षणाची सुरुवात झाली. इथंच तो वाचायला-लिहायला शिकला. संस्थेत राहात असताना त्याच्या मनामध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची इच्छा झाली. 2008 साली त्यानं 1 तास 31 मिनिटांमध्ये अर्ध मॅरेथॉन पूर्ण केलं. आपण चांगले धावपटू होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलं मग रमेशने प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आणि त्याला बक्षिसंही मिळू लागली.

प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी सरसावले पवईतील तरुण

या धावण्याच्या आवडीनंच रमेश आणि श्रीयांश यांना एकत्र आणलं. हे दोघेही मुंबईच्या प्रियदर्शनी पार्कमध्ये धावण्याचा सराव करायचे. सरावाच्या वेळेस त्यांची ओळख झाली आणि मग त्यांची घट्ट मैत्रीच झाली. रोज वेगवेगळ्या विषयांवर गप्पाही होऊ लागल्या. सरावाच्यावेळेस त्यांच्या लक्षात यायचं आपले बूट कितीही चांगले असले तरी काही महिन्यांतच त्यांची अवस्था खराब होते. पण त्यांचे तळवे म्हणजे सोल मात्र मजबूत असतात. त्यांच्याप्रमाणेच इतरही लोक तळवे मजबूत असणारे पण वरती फाटलेले बूट फेकून देत होते. या सोलचा उपयोग करुन नव्या चपलाच केल्या तर किती मस्त होईल, आपण अनवाणी चालणाऱ्या पोरांना मदत करु शकू असं त्या दोघांच्या मनात आलं. झालं.... दोघेही सोलपासून नव्या चपला कशा करायच्या हे शोधायच्या मागे लागले. सुरुवातीला त्यांनी असे सोल गोळा केले आणि त्याला वादीसारख्या नायलॉनचा अंगठा आणि घोट्याजवळ एक पट्टी लावून साधी चप्पल तयार केली. इंटरनेटच्या मदतीने त्यांनी एकेक नवे डिझाइन तयार करायला सुरुवात केली. एकेदिवशी त्यांना समजल मुंबईत कुर्ल्याजवळ ठक्करबाप्पा वसाहतीमध्ये अशा चपला तयार करणारे कारागिर आहेत. मग या दोघांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. तिथल्या कारागिरांकडून या उद्योगाची सगळी माहिती करुन घेतली. बूट-चप्पल कारखान्यांना विनंती करणारी पत्रे पाठवून जागेची मागणी केली. शेवटी त्यांना महापे इथं एका कंपनीनं जागा दिली. या जागेत बसून दोन कामगारांच्या मदतीने या दोघांनी नव्या चपला बूट तयार करायला सुरुवात केली. 

तर ही मुलं करतात तरी काय... भारतभरातून जुने चपला-बूट त्यांच्याकडे येतात. त्यांचे सोल प्रथम वेगळे केले जातात. मग ते सोल व्यवस्थित धुवून निर्जंतूक केले जातात. या सोलवर नवे कापडाचे किंवा चामड्याचे आवरण चढवतात मग नवे आणलेले चपलाचे वरचे भाग (ज्याला अप्पर म्हणतात) त्यावर लावून मस्त नव्याकोऱ्या चपला ते बनवतात. हे अप्पर म्हणजे वरच्या पट्ट्या, चपलाचे अंगठे सुद्धा काही कंपन्या त्यांना मदत म्हणून पाठवतात. ट्रेकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य नियमांनूसार काही वर्षांनी फेकून द्यावे लागते. जरी फेकावे लागले असले तरी त्या साहित्याचा वापर कमी झालेला असतो तसेच ते अत्यंत मजबूतही असते. या साहित्यातील दोऱ्या, वाद्या, नायलॉनचे भाग यांच्यापासूनही अप्पर तयार केले जातात. खेड्यात राहणाऱ्या मुलांना, डोंगराळ प्रदेशातील मुलांना या मजबूत चपलांचा चांगलाच फायदा होतो. वेगवेगळ्या आकारांच्या चपला तयार झाल्या की भारतभरात लहानलहान खेड्यापाड्यांमध्ये या चपला पाठवल्या जातात. आजवर पन्नास हजार मुलांना यांच्या ग्रीनसोल कंपनीमुळे चपला मिळालेल्या आहेत. रमेश आणि श्रीयांश म्हणतात, त्यांच्या कामाची माहिती लोकांना समजल्यावर खेड्यापाड्यातूंन, आदिवासी भागातून त्यांच्या चपलांसाठी मागणी नोंदवली जाऊ लागली, ही मागणी काही लाखांच्या घरात आहे. यावरुन चपलांची गरज किती आहे ते समजतं असं रमेश सांगतो. 

(तलासरी येथील शाळेतील मुलांना चपलांचे वाटप झाल्यावर... सर्व छायाचित्रे- श्रीयांश भंडारी)

आता सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणायचं कसं? हा सर्वत्र असणारा प्रश्न या दोघांच्या डोळ्यांसमोर होताच. चपलांपासून पुन्हा चपला करायच्या, त्या मुलांमध्ये वाटायच्या तेही फुकट. हा असला धंदा करायचा तर मागे कोणाचेतरी हात असायलाच हवेत. पण या दोघांना सुदैवाने मदतीचे हात मिळाले. अनेक कंपन्यांनी त्यांच्या सीएसआरफंडातून यांना मदत केली. आर्थिक मदत, वाहतुकीचा खर्च उचलणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे या दोघांची कल्पना सत्यात उतरली आणि ते अनवाणी मुलांना चपला देऊ शकले. एकेकाळी स्वतः अनवाणी फिरणाऱ्या रमेशला या सगळ्या कामामध्ये भरपूर आनंद मिळतो. सिनेमात जाऊ शकलो नाही पण हे असं समाजासाठी भारी काम करायला मिळालं यातला आनंद शब्दांमध्ये सांगता येणार नाही असं तो सांगतो.

 

टॅग्स :Indiaभारत