शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

वादाच्या ‘शोले’नंतर सलोख्याचे वृक्षारोपण

By admin | Updated: July 2, 2016 04:44 IST

वादाचे ‘शोले’ भडकलेले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलोख्याचे वृक्षारोपण केले.

मुंबई : राज्यातील सत्तारूढ भाजपा-शिवसेनेत गेले काही दिवस वादाचे ‘शोले’ भडकलेले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलोख्याचे वृक्षारोपण केले. ‘उद्धव यांनी लावलेल्या झाडाला मी माती आणि पाणी घातलं, यातून योग्य तो संदेश जाईल,’ असे सूचक विधान करून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांतील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला.राज्यात एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्याच्या उपक्रमानिमित्त माहीमच्या निसर्ग उद्यानातील समारंभात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव या वेळी मुख्य अतिथी होते. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. गेले काही दिवस सेना-भाजपातील नेते मंडळी एकमेकांना निजामाचा बाप, असरानी, गब्बर अशी एकाहून एक सरस विशेषणे लावत शरसंधानाची एकही संधी सोडत नसताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले फडणवीस आणि उद्धव यांनी व्यासपीठावर एकमेकांशी बराच वेळ कानगोष्टी केल्या. ‘जिथे गरज असेल तिथे मी खांद्याला खांदा लावून उभा राहीन. अपशकुन करणार नाही. ज्याची सुरुवात चांगली होते, त्याला यशही मिळतेच, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे ठाकरे यांनी कौतुक केले. तर आम्ही लावलेल्या रोपाचा वटवृक्ष होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाशी आलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्नच यानिमित्ताने केला. (विशेष प्रतिनिधी)>ट्री क्रे डिट द्यामराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तेथे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली. वन विभागाने ‘ट्री क्रे डिट-ग्रीन सर्टिफिकेट’सारखी योजना राबवावी. ज्या व्यक्ती किंवा कॉर्पोरेट हाउसेस वृक्ष लावू इच्छितात पण त्यांच्याकडे वेळ नाही अशांसाठी वन विभागाने मोबाइल अ‍ॅप विकसित करावे व त्याद्वारे पैसे भरून त्यांच्या वतीने वृक्षलागवडीची यंत्रणा निर्माण करावी.यासाठी राज्यातील पडीक जमिनी बेरोजगार युवकांच्या ताब्यात द्याव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विक्रमी वृक्षारोपणवनमहोत्सवानिमित्त केलेला २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास गेला असून,राज्यभरातील ६५,६७४ ठिकाणी १ जुलैच्या सायंकाळपर्यंत २ कोटी २२ लाख ८२ हजार १३० वृक्षांची लागवड झाली, अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.पंतप्रधान मोदींचे टिष्ट्वटमहाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला पुढाकार घेत विक्रमी वृक्षारोपण केले. लोकांनी उत्स्फूर्त योगदान दिले. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, असे टिष्ट्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृक्षारोपण ही लोकचळवळ झाल्याची भावना टिष्ट्वटरवर व्यक्त केली.