शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनाला चळवळीचं बळ देणारा लढवय्या

By admin | Updated: February 15, 2015 23:49 IST

विश्वंभर चौधरी आज सांगलीत : ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त व्याख्यान

सांगली : प्रस्थापित राजकारण्यांच्या पर्यावरणविरोधी, समाजविरोधी धोरणांना विरोध करताना, प्रबोधनाला चळवळीचे बळ देऊन गेल्या अनेक वर्षांपासून एक लढवय्या महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करीत आहे. परिवर्तनाच्या वाऱ्याला वादळाचे स्वरूप देऊन पर्यावरण संवर्धनासह, पर्यावरणाइतकेच स्वच्छ राजकारण आणि समाजकारण अस्तित्वात आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी वाटचाल करणाऱ्या या लढवय्याचे नाव आहे डॉ. विश्वंभर चौधरी. ‘लोकमत’ सांगली आवृत्तीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विश्वंभर चौधरी सोमवारी सांगलीत येत आहेत. ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.केवळ प्रबोधन करून परिवर्तनाचे स्वप्न साकारता येत नसल्याने, एक मोठी चळवळ उभारून सातत्याने त्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते म्हणून पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांची ओळख देशभर आहे. पर्यावरणासह भारतीय राजकारणाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे विश्लेषण करण्याची हातोटीही त्यांच्याकडे असल्याने, राजकीय विश्लेषक म्हणून जनमानसात त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. परभणी जिल्ह्यातील वालूर हे त्यांचे मूळ गाव. १८ जून १९७१ रोजी जन्मलेल्या विश्वंभर चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण सेलू (जि. परभणी) येथे झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी ‘पर्यावरण आघात मूल्यांकन’ या विषयावर पीएच.डी. केली. पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून त्यासंदर्भातील चळवळ उभी केली. पश्चिम घाटांच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रबोधन आणि चळवळीची सांगड घातली. संरक्षित वनक्षेत्र व वनराई हटवून त्याठिकाणी प्रस्तावित केलेल्या लवासा सिटीसारख्या प्रकल्पास आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विरोध दर्शविला. न्यायालयीन लढाईतसुद्धा ते उतरले. पर्यावरण संरक्षणाच्या विषयावर विपुल लेखन करतानाच चळवळही उभारली. त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एन्व्हायरमेंटल क्लब आॅफ इंडिया यांच्यावतीने त्यांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे पुण्यात वास्तव्य आहे. तेथेच त्यांनी पर्यावरणविषयक सल्ला संस्था सुरू केली. मेधा पाटकरप्रणित ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’ या संघटनेत सात वर्षांपासून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सापळी धरण संघर्ष, लवासाविरोधी आंदोलनातही ते सहभागी झाले. पाणी परिषद, सिंचन, भू-संपादन कायदा, लोकपाल आदी विषयांवरील महाराष्ट्रातील अनेक परिसंवादात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व अन्य २२ संघटनांनी पुकारलेल्या ‘लोकपाल’ आंदोलनात ते सक्रिय झाले होते. राजकारण, समाजकारण, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, विविध मतवाद, राष्ट्रवाद आदी विषयांवर त्यांनी चिंतन आणि तटस्थपणे लेखन केले आहे. (प्रतिनिधी)लढ्याचा वारसाचौधरी यांचे वडील हनुमंतराव चौधरी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते. लढ्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. लढ्याचे स्वरूप वेगळे असले तरी, विश्वंभर चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात परिवर्तनाचा लढा सुरू ठेवला आहे. लोकांचे प्रबोधन, लोकचळवळ, लेखन अशा विविध माध्यमातून त्यांचा लढा सुरू आहे.