शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनाला चळवळीचं बळ देणारा लढवय्या

By admin | Updated: February 15, 2015 23:49 IST

विश्वंभर चौधरी आज सांगलीत : ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त व्याख्यान

सांगली : प्रस्थापित राजकारण्यांच्या पर्यावरणविरोधी, समाजविरोधी धोरणांना विरोध करताना, प्रबोधनाला चळवळीचे बळ देऊन गेल्या अनेक वर्षांपासून एक लढवय्या महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करीत आहे. परिवर्तनाच्या वाऱ्याला वादळाचे स्वरूप देऊन पर्यावरण संवर्धनासह, पर्यावरणाइतकेच स्वच्छ राजकारण आणि समाजकारण अस्तित्वात आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी वाटचाल करणाऱ्या या लढवय्याचे नाव आहे डॉ. विश्वंभर चौधरी. ‘लोकमत’ सांगली आवृत्तीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विश्वंभर चौधरी सोमवारी सांगलीत येत आहेत. ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.केवळ प्रबोधन करून परिवर्तनाचे स्वप्न साकारता येत नसल्याने, एक मोठी चळवळ उभारून सातत्याने त्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते म्हणून पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांची ओळख देशभर आहे. पर्यावरणासह भारतीय राजकारणाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे विश्लेषण करण्याची हातोटीही त्यांच्याकडे असल्याने, राजकीय विश्लेषक म्हणून जनमानसात त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. परभणी जिल्ह्यातील वालूर हे त्यांचे मूळ गाव. १८ जून १९७१ रोजी जन्मलेल्या विश्वंभर चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण सेलू (जि. परभणी) येथे झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी ‘पर्यावरण आघात मूल्यांकन’ या विषयावर पीएच.डी. केली. पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून त्यासंदर्भातील चळवळ उभी केली. पश्चिम घाटांच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रबोधन आणि चळवळीची सांगड घातली. संरक्षित वनक्षेत्र व वनराई हटवून त्याठिकाणी प्रस्तावित केलेल्या लवासा सिटीसारख्या प्रकल्पास आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विरोध दर्शविला. न्यायालयीन लढाईतसुद्धा ते उतरले. पर्यावरण संरक्षणाच्या विषयावर विपुल लेखन करतानाच चळवळही उभारली. त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एन्व्हायरमेंटल क्लब आॅफ इंडिया यांच्यावतीने त्यांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे पुण्यात वास्तव्य आहे. तेथेच त्यांनी पर्यावरणविषयक सल्ला संस्था सुरू केली. मेधा पाटकरप्रणित ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’ या संघटनेत सात वर्षांपासून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सापळी धरण संघर्ष, लवासाविरोधी आंदोलनातही ते सहभागी झाले. पाणी परिषद, सिंचन, भू-संपादन कायदा, लोकपाल आदी विषयांवरील महाराष्ट्रातील अनेक परिसंवादात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व अन्य २२ संघटनांनी पुकारलेल्या ‘लोकपाल’ आंदोलनात ते सक्रिय झाले होते. राजकारण, समाजकारण, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, विविध मतवाद, राष्ट्रवाद आदी विषयांवर त्यांनी चिंतन आणि तटस्थपणे लेखन केले आहे. (प्रतिनिधी)लढ्याचा वारसाचौधरी यांचे वडील हनुमंतराव चौधरी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक होते. लढ्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. लढ्याचे स्वरूप वेगळे असले तरी, विश्वंभर चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रात परिवर्तनाचा लढा सुरू ठेवला आहे. लोकांचे प्रबोधन, लोकचळवळ, लेखन अशा विविध माध्यमातून त्यांचा लढा सुरू आहे.