शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

नियम बदलल्याने सौरऊर्जा अनुदान अडकले!

By admin | Updated: April 12, 2017 01:18 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा,

- सोपान पांढरीपांडे, नागपूरकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा, कॉलेजसारख्या सामाजिक संस्थांचा समावेश आहे. सौरऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी २०१५ साली ही अनुदान योजना सुरू केली होती. त्यानुसार घरगुती व नफा न कमविणाऱ्या शाळा, कॉलेज व गैरसरकारी सामाजिक संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प लावले तर ३० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार होते. हे प्रकल्प महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या (एमईडीए) नोंदणीकृत कंत्राटदारांकडून पूर्ण करायचे बंधन होते व केंद्राचे अनुदानही ‘एमईडीए’मार्फत मिळणार होते. या योजनेमुळे महाराष्ट्रातील हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांनी व सामाजिक संस्थांनी असे प्रकल्प उभे केले व सौरऊर्जा अनुदानाचा लाभ घेतला. मात्र केंद्राने फेब्रुवारीमध्ये अचानक नियमात बदल केला व पूर्वपरवानगी असलेले प्रकल्पच अनुदानासाठी पात्र ठरतील, असा आदेश काढला. त्यामुळे २०१५ ते फेब्रुवारी २०१७ यादरम्यान ज्यांनी आपले प्रकल्प पूर्ण केले होते, अशा प्रकल्पांचे अनुदान थांबले. या प्रकल्पांनी पूर्वपरवानगी घेतली नव्हती म्हणून ते अनुदानासाठी अचानक अपात्र ठरले आहेत. यासंबंधी सोलर थर्मल फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष एम. डी. आकोले म्हणाले, महाराष्ट्रात २०० ते २२५ लाभार्थ्यांनी एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प उभे केले, तर ५० ते ७५ लाभार्थ्यांचे प्रकल्प तीन किलो वॅटपेक्षा मोठे आहेत. एक किलोवॅटसाठी १८ हजार ३०० रुपयांचे अनुदान मिळते. पण नियम बदलल्याने हे ३०० लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता एक मेगावॅट असावी, असेही आकोले म्हणाले.अनुदान सर्वांसाठी नाही : एमईडीएयाबाबत एमईडीएचे महासंचालक नितीन गद्रे म्हणाले, महाराष्ट्राने ४ हजार मेगावॅट सौरऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे व त्यापैकी फक्त १०० मेगावॅट प्रकल्प अनुदान योजनेतून पूर्ण होतील, त्यामुळे अनुदान सर्वांसाठी नाही. तरीसुद्धा मेडाने या ३०० लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे व जो निर्णय येईल तो आम्हाला बंंधनकारक राहील, असेही गद्रे म्हणाले. लाभार्थ्यांना एमईडीने ३१ मेपर्यंत मुदत द्यावी व राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून अनुदान मिळवून द्यावे, असा पर्याय आकोले यांनी सुचविला.