शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

नियम बदलल्याने सौरऊर्जा अनुदान अडकले!

By admin | Updated: April 12, 2017 01:18 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा,

- सोपान पांढरीपांडे, नागपूरकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा, कॉलेजसारख्या सामाजिक संस्थांचा समावेश आहे. सौरऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी २०१५ साली ही अनुदान योजना सुरू केली होती. त्यानुसार घरगुती व नफा न कमविणाऱ्या शाळा, कॉलेज व गैरसरकारी सामाजिक संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प लावले तर ३० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार होते. हे प्रकल्प महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या (एमईडीए) नोंदणीकृत कंत्राटदारांकडून पूर्ण करायचे बंधन होते व केंद्राचे अनुदानही ‘एमईडीए’मार्फत मिळणार होते. या योजनेमुळे महाराष्ट्रातील हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांनी व सामाजिक संस्थांनी असे प्रकल्प उभे केले व सौरऊर्जा अनुदानाचा लाभ घेतला. मात्र केंद्राने फेब्रुवारीमध्ये अचानक नियमात बदल केला व पूर्वपरवानगी असलेले प्रकल्पच अनुदानासाठी पात्र ठरतील, असा आदेश काढला. त्यामुळे २०१५ ते फेब्रुवारी २०१७ यादरम्यान ज्यांनी आपले प्रकल्प पूर्ण केले होते, अशा प्रकल्पांचे अनुदान थांबले. या प्रकल्पांनी पूर्वपरवानगी घेतली नव्हती म्हणून ते अनुदानासाठी अचानक अपात्र ठरले आहेत. यासंबंधी सोलर थर्मल फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष एम. डी. आकोले म्हणाले, महाराष्ट्रात २०० ते २२५ लाभार्थ्यांनी एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प उभे केले, तर ५० ते ७५ लाभार्थ्यांचे प्रकल्प तीन किलो वॅटपेक्षा मोठे आहेत. एक किलोवॅटसाठी १८ हजार ३०० रुपयांचे अनुदान मिळते. पण नियम बदलल्याने हे ३०० लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता एक मेगावॅट असावी, असेही आकोले म्हणाले.अनुदान सर्वांसाठी नाही : एमईडीएयाबाबत एमईडीएचे महासंचालक नितीन गद्रे म्हणाले, महाराष्ट्राने ४ हजार मेगावॅट सौरऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे व त्यापैकी फक्त १०० मेगावॅट प्रकल्प अनुदान योजनेतून पूर्ण होतील, त्यामुळे अनुदान सर्वांसाठी नाही. तरीसुद्धा मेडाने या ३०० लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे व जो निर्णय येईल तो आम्हाला बंंधनकारक राहील, असेही गद्रे म्हणाले. लाभार्थ्यांना एमईडीने ३१ मेपर्यंत मुदत द्यावी व राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून अनुदान मिळवून द्यावे, असा पर्याय आकोले यांनी सुचविला.