शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

संगणकीकृत ७/१२ नोंदीमध्ये सोलापूर टॉपवऱ़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 15:53 IST

अजित रेळेकर : ११़६८ लाख उताऱ्यांपैकी ७़७९ लाख उताऱ्यांच्या संगणकीकृत नोंदी झाल्या प्रमाणित

संगणकीकृत ७/१२ नोंदीमध्ये सोलापूर टॉपवऱ़़सोलापूर: शिवाजी सुरवसे राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्याने एकूण ११ लाख ६८ हजार ८८५ सात बारा उताऱ्यांपैकी ७ लाख ७९ हजार ५४४ उताऱ्यांच्या नोंदी संगणकीकरणाद्वारे प्रमाणित केल्या आहेत़याबाबतीत पुणे विभागातील पाच जिल्ह्यात सोलापूरचे काम प्रथम क्रमांकावर आहे हे विशेष़ राज्यातील ३५ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आहे़ गतवर्षापर्यंत ई-फेरफार करण्यासाठी इंटरनेट, संगणक तसेच सॉप्टवेअरचे अनेक अडचणी असल्यामुळे आणि त्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना हे काम करण्यास रस नसल्यामुळे आॅनलाईन सात बारा करण्यासाठी विलंब लागला़ सात बारा दुरुस्त करण्यासाठी रितसर फेरफार तहसीलदारांनी मंजूर केल्यानंतरच दुरुस्त करता येते़ जिल्ह्यात सात बारा उताऱ्यांची संख्या खूप आहे त्यामुळे पुणे विभागातील इतर जिल्ह्यांच्या सात बारा नोंदीची तुलना करता सोलापूर जिल्ह्यातील सात बारा उतारे फेरफार सह प्रमाणित करण्याचे काम खूप जास्त आहे़ ई-फेरफारसाठी राज्यातील २० तालुके निवडले गेले होते यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यात ११ लाख ६८ हजार ८८८५ सात बारा उतारे आहेत़ यातील सात लाख ७९ हजार ५४४ एवढे उतारे एडिट मॉड्युल मध्ये तयार केले असून हे काम ६७ टक्के आहे असे रेळेकर म्हणाले़ आता खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर म्हणजेच दस्त नोंदविल्यानंतर त्याचा इंडेक्स आपोआप तहसीलदारांना जातो़ त्यानुसार तलाठ्यांना तो इंडेक्स आपोआप तहसीलदारांकडून जातो आणि तलाठी नोटीस काढतो १५ दिवसानंतर मंडल अधिकारी या नोंदी प्रमाणित करतात़ काही ठिकाणी सॉप्टवेअरच्या अडचणी अजूनही आहेत त्यामुळे तलाठ्यांचे याबाबत प्रशिक्षण घेतले जाणार असल्याचे रेळेकर यांनी सांगितले़ पुणे जिल्ह्याचे काम ५८ टक्के आहे़ सातारा ५५़२७ टक्के, सांगली २३ टक्के, कोल्हापूर ६७ टक्के (कोल्हापूरचे उतारे सोलापूर पेक्षा कमी आहेत)़ राज्याचा विचार केला असता हिंगोली जिल्ह्याचे काम ९५ टक्के एवढे झाले आहे़ उस्मानाबाद (९४़१० टक्के ), वाशिम ( ९४़०२ टक्के ), गोंदिया (९३़९२), गडचिरोली (९३़९४ टक्के) या मागास जिल्ह्याने देखील जोरदार काम केले आहे़ --------------------------संगणकीकृत सात बारा उतारे नोंदविण्यात आणि ते प्रमाणित करण्यात सोलापूर जिल्ह्याचे काम पुणे विभागात सरस आहे़ ६७ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च अखेर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे काम १०० टक्के पूर्ण होईल़ तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना गावनिहाय आढावा घेऊन फेरफार नोंदी दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे़आॅनलाईन फेरफार प्रमाणिकरणाचे काम देखील ९३ टक्के आहे़ अजित रेळेकर निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर ----------------------------------तालुकानिहाय एकूण ७/१२ उतारे कंसात प्रमाणिक केलेले उतारे-अक्कलकोट-९७४०५ (५४४८२)-उत्तर सोलापूर-१३२२१३ (७२७५४)-करमाळा-८३८६० (६९८६३)-दक्षिण सोलापूर-८०४३६ (५३५५२)-पंढरपूर-१२९४०२ (६८२४५)-बार्शी-९२९९८ (६९५४२)-माढा -१०१८४१(६७०९४)-माळशिरस-१५०५५९ (८३३०८)-मोहोळ-९५३१३ (८००३४)-मंगळवेढा-७९५६७ (५६२५१)-सांगोला-१२३५९१ (१०४४२९)-एकूण-११६८८८५ (७७९५४४)