शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 07:27 IST

मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. ०२ : मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या वाटेवर असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे़

जिल्ह्यात पुष्य व उत्तरा नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र पाणी-पाणी झाले असताना हस्त नक्षत्रातही संततधार सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पाऊस पडला असून, सततच्या पावसाने खरीप पिकांना धोका तर ज्वारीच्या पेरणीला विलंब होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पाऊस समाधानकारक पडला आहे. १९ ते २९ जुलै दरम्यान जिल्ह्याचा जवळपास सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला होता. त्याअगोदर व नंतर काही भागातच पाऊस पडला. त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सगळीकडे पाऊस पडला. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दीड महिना पाऊस नसल्याने खरिपाची काही पिके गेली होती तर उत्तराच्या संततधार पावसाने आलेली काही पिके पाण्यात गेली. खरिपाची तूर अन्य काही वाचलेली पिके चांगली असली तरी हस्त नक्षत्राच्या पावसाने राहतील की नाही हे सांगता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग दोन्ही बाजूने संकटात सापडला आहे.जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊससोलापूर जिल्ह्यात एकूण पावसाळ्यात ५३७७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ४३६३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४५६ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेर एकूण ४४५६ मि.मी. तर सरासरी ४०५ मि.मी. पाऊस पडला. याची टक्केवारी ८१.१५ इतकी येते. उत्तर तालुक्यात ९०.५५ टक्के, दक्षिण तालुक्यात ८८.९६ टक्के, बार्शीत ८२.७३ टक्के, अक्कलकोटमध्ये ७०.६२ टक्के, मोहोळ तालुक्यात ५५.९३ टक्के, माढा तालुक्यात ९२.३३ टक्के, करमाळ्यात ७२.३७ टक्के, पंढरपूर तालुक्यात ६७.९९ टक्के, सांगोला तालुक्यात १०९.९२ टक्के, माळशिरसमध्ये १०९.३० टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ६५.४९ टक्के पावसाची नोंद झाली.