शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आयटीत नोकरीची हमी नसल्याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

By admin | Updated: July 13, 2017 13:17 IST

तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवले.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 13 - तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीकृष्ण गुरुप्रसाद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आंध्रप्रदेशच्या क्रृष्णा जिल्ह्याचा निवासी आहे. हा तरुण  विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये रहात होता. 
 
त्याने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. पुणे पोलिसांना त्याच्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची हमी देता येत नाही. आयटीमध्ये नोकरी सुरक्षित नसनू, मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत आहे असे त्याने चिठ्ठीत लिहीले होते. गोपीकृष्णच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे. 
 
आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जयसिंगकर म्हणाले की, पीटनी बोवस् या कंपनीत गोपीकृष्ण 9 जुलैपासून रुजू झाला होता. कंपनीने त्याच्या रहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. बुधवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास त्याने सहाव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली. 
 
आणखी वाचा 
 
गोपीकृष्ण जमिनीवर कोसळल्यानंतर हॉटेलमधल्या दोन सुरक्षारक्षकांनी त्या  दिशेने धाव घेतली आणि हॉटेलच्या  मॅनेजरला तरुणाने आत्महत्या केल्याची  माहिती दिली. हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गोपीकृष्णला मृत घोषित केले. 
 
आम्हाला मृत तरुणाच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची कुठलीही सुरक्षितता नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते असे लिहीले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. पुण्यात येण्याआधी गोपीकृष्णने दिल्ली, हैदराबाद या शहरातही नोकरी केली होती. पोलीस कंपनीतील सहकारी आणि कुटुंबियांशी चर्चा करुन अधिक माहिती गोळा करत आहेत. 
 
पुण्यात आयटी क्षेत्रात आज अनेक मोठया कंपन्या असून, मोठया प्रमाणावर युवा वर्ग तिथे नोकरी करतो. आयटी क्षेत्रात नोक-यांची कपात होण्याची शक्यता असल्याने काही जणांच्या मनात आपली नोकरी राहिल कि, नाही याबद्दल धाकधूक आहे. त्यातून आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.