शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीत नोकरीची हमी नसल्याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

By admin | Updated: July 13, 2017 13:17 IST

तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवले.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 13 - तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीकृष्ण गुरुप्रसाद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आंध्रप्रदेशच्या क्रृष्णा जिल्ह्याचा निवासी आहे. हा तरुण  विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये रहात होता. 
 
त्याने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. पुणे पोलिसांना त्याच्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची हमी देता येत नाही. आयटीमध्ये नोकरी सुरक्षित नसनू, मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत आहे असे त्याने चिठ्ठीत लिहीले होते. गोपीकृष्णच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे. 
 
आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जयसिंगकर म्हणाले की, पीटनी बोवस् या कंपनीत गोपीकृष्ण 9 जुलैपासून रुजू झाला होता. कंपनीने त्याच्या रहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. बुधवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास त्याने सहाव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली. 
 
आणखी वाचा 
 
गोपीकृष्ण जमिनीवर कोसळल्यानंतर हॉटेलमधल्या दोन सुरक्षारक्षकांनी त्या  दिशेने धाव घेतली आणि हॉटेलच्या  मॅनेजरला तरुणाने आत्महत्या केल्याची  माहिती दिली. हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गोपीकृष्णला मृत घोषित केले. 
 
आम्हाला मृत तरुणाच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची कुठलीही सुरक्षितता नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते असे लिहीले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. पुण्यात येण्याआधी गोपीकृष्णने दिल्ली, हैदराबाद या शहरातही नोकरी केली होती. पोलीस कंपनीतील सहकारी आणि कुटुंबियांशी चर्चा करुन अधिक माहिती गोळा करत आहेत. 
 
पुण्यात आयटी क्षेत्रात आज अनेक मोठया कंपन्या असून, मोठया प्रमाणावर युवा वर्ग तिथे नोकरी करतो. आयटी क्षेत्रात नोक-यांची कपात होण्याची शक्यता असल्याने काही जणांच्या मनात आपली नोकरी राहिल कि, नाही याबद्दल धाकधूक आहे. त्यातून आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.