शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

आयटीत नोकरीची हमी नसल्याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

By admin | Updated: July 13, 2017 13:17 IST

तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवले.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 13 - तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीकृष्ण गुरुप्रसाद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आंध्रप्रदेशच्या क्रृष्णा जिल्ह्याचा निवासी आहे. हा तरुण  विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये रहात होता. 
 
त्याने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. पुणे पोलिसांना त्याच्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची हमी देता येत नाही. आयटीमध्ये नोकरी सुरक्षित नसनू, मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत आहे असे त्याने चिठ्ठीत लिहीले होते. गोपीकृष्णच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे. 
 
आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जयसिंगकर म्हणाले की, पीटनी बोवस् या कंपनीत गोपीकृष्ण 9 जुलैपासून रुजू झाला होता. कंपनीने त्याच्या रहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. बुधवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास त्याने सहाव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली. 
 
आणखी वाचा 
 
गोपीकृष्ण जमिनीवर कोसळल्यानंतर हॉटेलमधल्या दोन सुरक्षारक्षकांनी त्या  दिशेने धाव घेतली आणि हॉटेलच्या  मॅनेजरला तरुणाने आत्महत्या केल्याची  माहिती दिली. हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गोपीकृष्णला मृत घोषित केले. 
 
आम्हाला मृत तरुणाच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची कुठलीही सुरक्षितता नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते असे लिहीले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. पुण्यात येण्याआधी गोपीकृष्णने दिल्ली, हैदराबाद या शहरातही नोकरी केली होती. पोलीस कंपनीतील सहकारी आणि कुटुंबियांशी चर्चा करुन अधिक माहिती गोळा करत आहेत. 
 
पुण्यात आयटी क्षेत्रात आज अनेक मोठया कंपन्या असून, मोठया प्रमाणावर युवा वर्ग तिथे नोकरी करतो. आयटी क्षेत्रात नोक-यांची कपात होण्याची शक्यता असल्याने काही जणांच्या मनात आपली नोकरी राहिल कि, नाही याबद्दल धाकधूक आहे. त्यातून आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.