शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

सोशल मीडिया हा समविचारी लोकांमधील संपर्कसेतू

By admin | Updated: November 25, 2015 03:54 IST

सोशल मीडियाच्या साधनांनी धार्मिक कट्टरवाद पसरविण्यास, त्यासाठी लोकांची भरती करण्यास आणि दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या समविचारी लोकांमध्ये संपर्कसेतू निर्माण करण्यास सुलभता होत आहे

मुंबई : सोशल मीडियाच्या साधनांनी धार्मिक कट्टरवाद पसरविण्यास, त्यासाठी लोकांची भरती करण्यास आणि दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या समविचारी लोकांमध्ये संपर्कसेतू निर्माण करण्यास सुलभता होत आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूर रिचर्ड वर्मा यांनी येथे व्यक्त केले.इंडिया फाउंडेशन, अमेरिकेचा मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि अटलांटिक कौन्सिलने येथे आयोजित केलेल्या महानगरांच्या सुरक्षेवरील परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांची ही परिषद मंगळवारी संपली. वर्मा म्हणाले की, लोकांच्या छोट्या समूहांना आणि अगदी व्यक्तींनाही प्राणघातक शस्त्रे व लष्करी दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होते ज्यामुळे ते शहरांच्या कामकाजावर आघात करू शकतात. रहिवाशांच्या नित्याची गरज म्हणून महानगरांमध्ये दळणवळण आणि वाहतुकीची कार्यक्षम व्यवस्था असतेच. त्याचाच वापर करून या दहशतवादी शक्ती कोणालाही सुगावा लागू न देता आपल्या कामासाठी लोकांची भरती करणे आणि त्यांची साखळी तयार करण्याचे काम तुलनेने सुलभपणे करू शकतात.समाजात विविध कारणांनी आधीपासून असलेल्या असंतोषामुळे या शक्तींना सुपीक पार्श्वभूमी मिळते, असे सांगून अमेरिकी राजदूतांनी असे सावध केले की, महानगरे जसजशी आणखी वाढत जातील तसतसा नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत सरकारांवर वाढता दबाव देत जाईल व याची पूर्तता झाली नाही, तर असंतोष वाढण्याची शक्यता आहे.याच परिषदेत बोलताना राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) चंद्रा अय्यंगार यांनी मुंबईत २००८मध्ये झालेल्या हल्ल्यांसाठी (२६/११) गुप्तचर व्यवस्थेचे अपयश हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले व दहशतवादाला जागतिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याला रोखले गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.‘महानगरांच्या सुरक्षेसंदर्भात प्रसारमाध्यमांची भूमिका’ या सत्रात मान्यवर पत्रकारांनी संघर्ष आणि दहशतवादी घटनांचे वार्तांकन कसे करायचे याचे प्रशिक्षण पत्रकारांना दिले गेले पाहिजे, असे म्हटले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे वरिष्ठ सदस्य व माजी पत्रकार नितीन गोखले म्हणाले की, ‘‘दहशतवादी हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये संदेश हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि तेही विश्वसनीय व त्वरित आले पाहिजेत.’’इंडियन एक्स्प्रेसचे सुशांत सिंह यांनी सरकारने अगदी नियोजनाच्या पायरीपासून प्रसारमाध्यमांना सहभागी करून घेतले पाहिजे. प्रमाण कारवाई पद्धती कार्यरत असली पाहिजे आणि अनेक घटकांना हवी असलेली माहिती वा संदेश देण्याचे एकच केंद्र असले पाहिजे, असे सांगितले. दंगली, युद्ध आणि दहशतवादी हल्ल्यांचे वार्तांकन हे विशेष क्षेत्रांचे काम समजले पाहिजे व अशा घटनांची जबाबदारी जो कोणी उपलब्ध असेल अशा पत्रकाराकडे दिली जायला नको. अशा घटनांच्या वार्तांकनासाठी संस्थेने पत्रकारांना प्रशिक्षण द्यायला हवे, असेही सुशांत सिंह यांनी सांगितले.‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या रणनीतिक व राजकीय व्यवहारांच्या संपादक सुहासिनी हैदर यांनी रासायनिक व जैविक युद्धांचे वार्तांकन कसे करावे यासाठी प्रसारमाध्यमांनी तयार असले पाहिजे, असे म्हटले. (विशेष प्रतिनिधी)शर्मा यांच्याच प्रश्नाला उत्तर देताना सुशांत सिंह म्हणाले की, ‘आमच्या हातात जर भारताच्या अण्वस्त्रांची गुपिते असतील, तर त्यांना जाहीर न करणे आम्ही देशाच्या हिताचे समजले पाहिजे, एवढी संवेदनशीलता आमच्यामध्ये आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरणाची सोडवणूक करण्यात ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे माहिती असूनही प्रसारमाध्यमांनी त्याचा वार्तांकनात उल्लेख येऊ दिला नव्हता.’ अधिकाऱ्यांनी माहितीसह पुढे आले पाहिजे, म्हणजे त्यातून काल्पनिक गोष्टींच्या वार्तांकनाऐवजी वस्तुस्थिती समोर येईल, असे सुशांत सिंह म्हणाले.