शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘सेनानु गुजराती’ चे सोशल इंजिनियरिंग

By admin | Updated: February 1, 2017 05:54 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचेही गुजराती समाजातील नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या

- यदु जोशी,  मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचेही गुजराती समाजातील नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली असून बव्हंशी भाजपाकडे असलेला हा मतदार आपल्याकडे वळविण्याचा मातोश्रीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षे प्रदेश पदाधिकारी राहिलेले आणि त्यांच्या गुजराती सेलचे अध्यक्ष हेमराज शहा सर्वात आधी शिवसेनेत डेरेदाखल झाले. त्यानंतर काँग्रेसच्या गुजराती सेलचे अध्यक्ष भरत धनानी यांनीही भगवा हाती घेतला. त्या पाठोपाठ भाजपाच्या गुजराती सेलचे अध्यक्ष मंगल भानुशाली यांनी शिवसेनेची वाट धरल्याने शिवसेना-गुजराती या सोशल इंजिनियरिंगची चर्चा सध्या जोरात आहे. मुंबईत मराठी मतांची कमी होत असलेल्या टक्केवारीने शिवसेनेला गुजराती टेकूची गरज भासू लागली आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी भाषकांपेक्षा गुजराती समाजाला जवळ करण्याचे धोरण म्हणूनच स्वीकारण्यात आल्याचे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजराती असताना या समाजाचे स्थानिक नेते आणि मते आपल्याकडे वळविण्याचे अवघड काम शिवसेनेने हाती घेतले आहे. ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी’ असा नारा शिवसेनेने एकेकाळी दाक्षिणात्यांविरुद्ध दिला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणारे म्हणून मोरारजी देसार्इंपासून अनेक गुजराती नेत्यांना शिवसेनेने लक्ष्य बनविले. मात्र, आज मराठी वडापावने गुजराती ढोकळ्याशी दोस्तीचा हात पुढे केला आहे. - मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या शिवसेनेने राम जेठमलानी, राजकुमार धूत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, प्रीतीश नंदी, संजय निरुपम या अमराठी व्यक्तींना राज्यसभेवर पाठविले. त्यावेळच्या जनता परिवारातील बडे नेते शांती पटेल आणि काँग्रेसचे दिग्गज नेते रजनी पटेल हे दोघेही गुजराती. त्यांना लक्ष्य करीत शिवसेनेने, ‘यांचे शांती पटेल, त्यांचे रजनी पटेल, हे मराठी मनाला कसे पटेल?’ असा सवाल शिवसेनेने केला होता. एकेकाळी मुंबईतील गुजराती समाज मराठी माणसांना ‘मुंबई तुमची तर भांडी घासा आमची’ असे हिणवायचा म्हणतात. त्याचे भरपूर भांडवल शिवसेनेने आणि गुजराती उमेदवाराच्या विरोधात इतरही पक्ष करीत असत. बोरीवली, कांदीवली, मालाड, गोरेगाव, दहीसर, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, ग्रँटरोड, चर्नीरोड, कुलाबा, घाटकोपर, मुुलुंड, माटुंगा, वडाळा या भागांमध्ये गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास १८ ते २० लाख गुजराती मतदार मुंबईत असून ५० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये तो निर्णायक ठरू शकतो.गुजराती समाजाला मुंबईचा विकास करणारा पक्ष हवा आहे. हा समाज भाजपाच्या पाठीशी त्यासाठीच उभा असल्याचे निवडणुकीच्या निकालातदेखील दिसेल. चारदोन नेते शिवसेनेत गेले असले तरी गुजराती समाज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सोबतच आहे.- योगेश सागर, भाजपाचे आमदारगुजराती समाजाने आतापर्यंत भाजपाला साथ दिली पण या समाजासाठी भाजपाने काहीही केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही अवहेलनाच झाली. या सरकारच्या नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. भाजपाने गुजराती समाजाची निराशा केली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे.- हेमराज शहा, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नेते.