शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘सेनानु गुजराती’ चे सोशल इंजिनियरिंग

By admin | Updated: February 1, 2017 05:54 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचेही गुजराती समाजातील नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या

- यदु जोशी,  मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचेही गुजराती समाजातील नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली असून बव्हंशी भाजपाकडे असलेला हा मतदार आपल्याकडे वळविण्याचा मातोश्रीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षे प्रदेश पदाधिकारी राहिलेले आणि त्यांच्या गुजराती सेलचे अध्यक्ष हेमराज शहा सर्वात आधी शिवसेनेत डेरेदाखल झाले. त्यानंतर काँग्रेसच्या गुजराती सेलचे अध्यक्ष भरत धनानी यांनीही भगवा हाती घेतला. त्या पाठोपाठ भाजपाच्या गुजराती सेलचे अध्यक्ष मंगल भानुशाली यांनी शिवसेनेची वाट धरल्याने शिवसेना-गुजराती या सोशल इंजिनियरिंगची चर्चा सध्या जोरात आहे. मुंबईत मराठी मतांची कमी होत असलेल्या टक्केवारीने शिवसेनेला गुजराती टेकूची गरज भासू लागली आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी भाषकांपेक्षा गुजराती समाजाला जवळ करण्याचे धोरण म्हणूनच स्वीकारण्यात आल्याचे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजराती असताना या समाजाचे स्थानिक नेते आणि मते आपल्याकडे वळविण्याचे अवघड काम शिवसेनेने हाती घेतले आहे. ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी’ असा नारा शिवसेनेने एकेकाळी दाक्षिणात्यांविरुद्ध दिला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणारे म्हणून मोरारजी देसार्इंपासून अनेक गुजराती नेत्यांना शिवसेनेने लक्ष्य बनविले. मात्र, आज मराठी वडापावने गुजराती ढोकळ्याशी दोस्तीचा हात पुढे केला आहे. - मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या शिवसेनेने राम जेठमलानी, राजकुमार धूत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, प्रीतीश नंदी, संजय निरुपम या अमराठी व्यक्तींना राज्यसभेवर पाठविले. त्यावेळच्या जनता परिवारातील बडे नेते शांती पटेल आणि काँग्रेसचे दिग्गज नेते रजनी पटेल हे दोघेही गुजराती. त्यांना लक्ष्य करीत शिवसेनेने, ‘यांचे शांती पटेल, त्यांचे रजनी पटेल, हे मराठी मनाला कसे पटेल?’ असा सवाल शिवसेनेने केला होता. एकेकाळी मुंबईतील गुजराती समाज मराठी माणसांना ‘मुंबई तुमची तर भांडी घासा आमची’ असे हिणवायचा म्हणतात. त्याचे भरपूर भांडवल शिवसेनेने आणि गुजराती उमेदवाराच्या विरोधात इतरही पक्ष करीत असत. बोरीवली, कांदीवली, मालाड, गोरेगाव, दहीसर, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, ग्रँटरोड, चर्नीरोड, कुलाबा, घाटकोपर, मुुलुंड, माटुंगा, वडाळा या भागांमध्ये गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास १८ ते २० लाख गुजराती मतदार मुंबईत असून ५० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये तो निर्णायक ठरू शकतो.गुजराती समाजाला मुंबईचा विकास करणारा पक्ष हवा आहे. हा समाज भाजपाच्या पाठीशी त्यासाठीच उभा असल्याचे निवडणुकीच्या निकालातदेखील दिसेल. चारदोन नेते शिवसेनेत गेले असले तरी गुजराती समाज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सोबतच आहे.- योगेश सागर, भाजपाचे आमदारगुजराती समाजाने आतापर्यंत भाजपाला साथ दिली पण या समाजासाठी भाजपाने काहीही केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही अवहेलनाच झाली. या सरकारच्या नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. भाजपाने गुजराती समाजाची निराशा केली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे.- हेमराज शहा, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नेते.