शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 08:48 IST

अशोक पेंडसे वीजतज्ज्ञ महावितरणसोबतच अदानी, टाटा आणि टोरंट यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणचा परवाना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे ...

अशोक पेंडसेवीजतज्ज्ञ

महावितरणसोबतच अदानी, टाटा आणि टोरंट यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणचा परवाना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे. यावर सुनावणी होऊन निकाल कालांतराने अपेक्षित असला तरी खासगी कंपन्यांना महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज वितरण परवाना देण्यात येऊ नये म्हणून रान उठले आहे. जर खासगी वीज वितरण कंपन्या महावितरण या सरकारी कंपनीच्या कार्यक्षेत्रात उतरल्या तर विजेचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील. त्यामुळे ग्राहकांना स्पर्धा वाढल्याने स्वस्त दराने वीज मिळण्याची दारं उघडी होतील. मात्र महावितरणपेक्षा दर्जेदार वीज देणे खासगी कंपन्यांसमोर आव्हान असेल.

अदानीने ठाणे आणि नवी मुंबई, टोरंटने ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि टाटा पॉवरने ठाणे, पुणे, नाशिक व संभाजी नगरमध्ये तर महावितरणने मुंबईमध्ये वीज वितरणचा परवाना मागितला आहे. इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये एकापेक्षा जास्त वीज कंपन्यांना वीज वितरण परवाना देण्याची मुभा आहे. मुंबईत टाटा आणि अदानी या दोन खासगी कंपन्या विजेचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे ग्राहक टाटा किंवा अदानी या वितरण कंपनीकडून वीज घेऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये वेस्ट बंगाल इलेक्ट्रिसिटी बोर्ड, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि इंडिया पॉवर अशा तीन कंपन्यांकडे एका विशिष्ट भौगोलिक भागासाठी वीज वितरणचा परवाना आहे. म्हणजेच वीज क्षेत्रात खासगी कंपन्या नव्याने उतरत आहेत किंवा नव्याने स्पर्धा सुरू झाली आहे, असे नाही. 

मुंबईमध्ये ही स्पर्धा तेरा ते चौदा वर्षे आहे. स्पर्धा सुरू होते तेव्हा काही फरक प्रामुख्याने मांडणे अभिप्रेत आहे. पहिले म्हणजे विजेचा दर होय. कारण कोणत्याही कंपन्याचे वीजदर प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा कमी नसतील तर त्या कंपनीकडे ग्राहक जाणार नाहीत. वीजदर कमी असताना वीज ग्राहकांना एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे जाता येते. कारण विजेचे दर प्रत्येक वर्षी बदलत असतात. दुसरे म्हणजे विजेचे जाळे. विजेचे जाळे एका कंपनीचे असले तरी ते जाळे वापरून दुसऱ्या कंपनीला विजेचा पुरवठा करता येतो. यात विजेचे जाळे वापराबद्दल संबंधित कंपनीला रक्कम अदा करावी लागते. तिसरे म्हणजे वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीने प्रतिस्पर्धी कंपनीचे विजेचे जाळे वापरले आणि ते सक्षम नसेल तर २४ तास वीज पुरवठा होईल का ? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. चौथे म्हणजे वीज ग्राहकांना मिळणारी सेवा. कारण नव्याने येणाऱ्या खासगी कंपनीला प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा उत्तम दर्जाची सेवा ग्राहकांना द्यावी लागेल आणि येथेच कस लागेल.

वितरणाच्या जाळ्याचा भार ग्राहकांवर ! नव्या कंपनीला प्रतिस्पर्धी कंपनीचे विजेचे जाळे वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. क्रॉस सबसिडी सरचार्ज, ॲडिशनल सरचार्ज संबंधित कंपनीला द्यावे लागेल. सरतेशेवटी वीज कंपनी ग्राहकांच्या खिशातून वरील तीन घटक आणि सोबत विजेची किंमत अशा चार घटकांची एकत्र बेरीज करत पैसे वसूल करेल. हे सगळे करताना खासगी कंपनीसमोर वीज ग्राहकांना स्वस्त वीज आणि उत्तम सेवा देण्याचे आव्हान असणार आहे. तर महावितरणला जेव्हा मुंबईत वीज पुरवठा करण्याचा परवाना मिळेल तेव्हा महावितरणला प्रतिस्पर्धी कंपनीला या घटकांचे पैसे द्यावे लागतील आणि हे पैसे सरतेशेवटी ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत.

दरवाढीवर येणार बंधनेथोडक्यात यामुळे राज्यातील विजेचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील. दुसरे म्हणजे एकापेक्षा अधिक कंपन्या स्पर्धेत असल्याने विजेच्या दरवाढीवर बंधन येईल. कारण विजेचे दर जास्त झाले तर ग्राहक प्रतिस्पर्धी कंपनीकडे वळण्याची शक्यता असते. दरम्यान, खासगी कंपन्यांनी राज्यात विजेचा पुरवठा करताना महावितरणचे विजेचे जाळे वापरायचे नाही, असे ठरविले तरी ते शक्य नाही. कारण विजेचे जाळे उभे करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. थोडक्यात खासगी वीज कंपन्यांना राज्यात विजेचा पुरवठा करताना विजेचे दर कमी ठेवावे लागतील. दर्जेदार सेवा द्यावी लागेल. मात्र खासगी कंपन्यांना राज्यात २४ तास वीज देता येईल का ? या प्रश्नाचे उत्तर आता देता येणार नाही.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र