शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...तर घटस्फोट घ्या!

By admin | Updated: February 10, 2017 01:51 IST

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी लढाईतील सर्व कावे-बारकावे आणि आयुधांचा लीलया वापर करून, विरोधकांना नामोहरम करण्याची संधी सोडली जात नाही. गुजरातेतील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली भेट हा अशाच गनिमीकाव्याचा प्रकार म्हणता येईल. अन्यथा, एरव्ही गुजरातींच्या नावे बोटे मोडणाऱ्यांना या गुजराती पोऱ्याबद्दल ‘हार्दिक’ प्रेम उचंबळून येण्याचे काही कारण नाही.शिवसेनेचा पूर्वेतिहास जसा मराठी माणसांसाठी लढण्याचा आहे, तसाच तो तडजोडींचा देखील आहे. मागे वळून पाहिले, तर शिवसेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध पुकारलेले आंदोलन आठवते. तसे १९७८ सालात बाळासाहेबांनी द्रमुकचे नेते करुणानिधी यांची मुंबईत घेतलेली भेटही आठवते. कडव्या मुस्लिमांच्या विरोधात केलेली गर्जना आठवते, तशी १९७९ सालात कडव्या मुस्लीम लीगच्या बनातवाला यांच्यासोबत केलेली युतीही आठवते. पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंच्या विरोधात घेतलेली भूमिका आठवते आणि जावेद मियाँदाद याचा ‘मातोश्री’वर झालेला पाहुणचारदेखील आठवतो. एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा आठवते, तशी त्याच कंपनीच्या रिबेका मार्क यांनी ‘मातोश्री’वर झाडलेली पायधूळदेखील आठवते. मायकेल जाक्सन, गुलाम अलीही आठवतात... तात्पर्य, आडात एक आणि पोहऱ्यात दुसरे!गुजराती समाज आणि शिवसेना यांचं तर विळ्या-भोपळ्याचं नातं! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून शिवसेना या समाजाला कायम पाण्यात पाहत आली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, अशी हाळी देत सेनेने गुजराती समाज आणि तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले. हे भांडण पुढे सीमाप्रश्नाच्या लढ्यापर्यंत कायम राहिले. १९६९ सालात उपपंतप्रधान पदावर असलेले मोरारजी मुंबई दौऱ्यावर आले असता, त्यांची गाडी अडविण्यावरून झालेला राडा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मोरारजींबद्दल शिवसेनेला असलेला राग मुंबई आणि मराठी माणसांसाठी होता, हे खरेच, पण पुढे तो समाजावरही काढण्यात येऊ लागला. अगदी कालपरवापर्यंत ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ असा वाद निर्माण करून गुजराती बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. गुजरातींच्या विरोधात शिवसेनेने कधी काळी ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ अशी हाक दिली होती. मुंबई महाराष्ट्रातच राहिली, पण मराठी टक्का कमी झाला. ज्या परप्रांतीयांच्या विरोधात सेना लढत राहिली, आज त्यांचाच टक्का वाढत गेल्याने खम्मण ढोकळा खाऊन लुंगीने तोंड पुसण्याची पाळी सेनेवर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही स्वाभिमानी मावळ्यांची सेना होती. तिथे जातपात नव्हती. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच संघटना उभी राहिली. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ‘घाटी-कोकणी, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर हे सारे भेद गाडून टाकून महाराष्ट्रासाठी म्हणून एक व्हा!’ आज ते हयात असते तर त्यांनी जातीपातींचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा ‘मातोश्री’वरून कडेलोटच केला असता. उद्धव म्हणतात, फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ’ आजच्यापेक्षा योग्य वेळ आणखी कोणती? या सत्तेत मन रमत नसेल, वागणं पटत नसेल, तर कसली वाट पाहता? सरळ घटस्फोट घेऊन मोकळे व्हा! - नंदकिशोर पाटील