शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
3
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
4
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
5
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
6
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
7
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
8
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
9
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
10
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
11
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
12
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
13
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
14
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
15
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
16
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
17
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
18
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
19
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
20
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!

...तर घटस्फोट घ्या!

By admin | Updated: February 10, 2017 01:51 IST

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी लढाईतील सर्व कावे-बारकावे आणि आयुधांचा लीलया वापर करून, विरोधकांना नामोहरम करण्याची संधी सोडली जात नाही. गुजरातेतील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली भेट हा अशाच गनिमीकाव्याचा प्रकार म्हणता येईल. अन्यथा, एरव्ही गुजरातींच्या नावे बोटे मोडणाऱ्यांना या गुजराती पोऱ्याबद्दल ‘हार्दिक’ प्रेम उचंबळून येण्याचे काही कारण नाही.शिवसेनेचा पूर्वेतिहास जसा मराठी माणसांसाठी लढण्याचा आहे, तसाच तो तडजोडींचा देखील आहे. मागे वळून पाहिले, तर शिवसेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध पुकारलेले आंदोलन आठवते. तसे १९७८ सालात बाळासाहेबांनी द्रमुकचे नेते करुणानिधी यांची मुंबईत घेतलेली भेटही आठवते. कडव्या मुस्लिमांच्या विरोधात केलेली गर्जना आठवते, तशी १९७९ सालात कडव्या मुस्लीम लीगच्या बनातवाला यांच्यासोबत केलेली युतीही आठवते. पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंच्या विरोधात घेतलेली भूमिका आठवते आणि जावेद मियाँदाद याचा ‘मातोश्री’वर झालेला पाहुणचारदेखील आठवतो. एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा आठवते, तशी त्याच कंपनीच्या रिबेका मार्क यांनी ‘मातोश्री’वर झाडलेली पायधूळदेखील आठवते. मायकेल जाक्सन, गुलाम अलीही आठवतात... तात्पर्य, आडात एक आणि पोहऱ्यात दुसरे!गुजराती समाज आणि शिवसेना यांचं तर विळ्या-भोपळ्याचं नातं! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून शिवसेना या समाजाला कायम पाण्यात पाहत आली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, अशी हाळी देत सेनेने गुजराती समाज आणि तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले. हे भांडण पुढे सीमाप्रश्नाच्या लढ्यापर्यंत कायम राहिले. १९६९ सालात उपपंतप्रधान पदावर असलेले मोरारजी मुंबई दौऱ्यावर आले असता, त्यांची गाडी अडविण्यावरून झालेला राडा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मोरारजींबद्दल शिवसेनेला असलेला राग मुंबई आणि मराठी माणसांसाठी होता, हे खरेच, पण पुढे तो समाजावरही काढण्यात येऊ लागला. अगदी कालपरवापर्यंत ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ असा वाद निर्माण करून गुजराती बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. गुजरातींच्या विरोधात शिवसेनेने कधी काळी ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ अशी हाक दिली होती. मुंबई महाराष्ट्रातच राहिली, पण मराठी टक्का कमी झाला. ज्या परप्रांतीयांच्या विरोधात सेना लढत राहिली, आज त्यांचाच टक्का वाढत गेल्याने खम्मण ढोकळा खाऊन लुंगीने तोंड पुसण्याची पाळी सेनेवर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही स्वाभिमानी मावळ्यांची सेना होती. तिथे जातपात नव्हती. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच संघटना उभी राहिली. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ‘घाटी-कोकणी, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर हे सारे भेद गाडून टाकून महाराष्ट्रासाठी म्हणून एक व्हा!’ आज ते हयात असते तर त्यांनी जातीपातींचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा ‘मातोश्री’वरून कडेलोटच केला असता. उद्धव म्हणतात, फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ’ आजच्यापेक्षा योग्य वेळ आणखी कोणती? या सत्तेत मन रमत नसेल, वागणं पटत नसेल, तर कसली वाट पाहता? सरळ घटस्फोट घेऊन मोकळे व्हा! - नंदकिशोर पाटील