शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

...तर घटस्फोट घ्या!

By admin | Updated: February 10, 2017 01:51 IST

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी लढाईतील सर्व कावे-बारकावे आणि आयुधांचा लीलया वापर करून, विरोधकांना नामोहरम करण्याची संधी सोडली जात नाही. गुजरातेतील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली भेट हा अशाच गनिमीकाव्याचा प्रकार म्हणता येईल. अन्यथा, एरव्ही गुजरातींच्या नावे बोटे मोडणाऱ्यांना या गुजराती पोऱ्याबद्दल ‘हार्दिक’ प्रेम उचंबळून येण्याचे काही कारण नाही.शिवसेनेचा पूर्वेतिहास जसा मराठी माणसांसाठी लढण्याचा आहे, तसाच तो तडजोडींचा देखील आहे. मागे वळून पाहिले, तर शिवसेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध पुकारलेले आंदोलन आठवते. तसे १९७८ सालात बाळासाहेबांनी द्रमुकचे नेते करुणानिधी यांची मुंबईत घेतलेली भेटही आठवते. कडव्या मुस्लिमांच्या विरोधात केलेली गर्जना आठवते, तशी १९७९ सालात कडव्या मुस्लीम लीगच्या बनातवाला यांच्यासोबत केलेली युतीही आठवते. पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंच्या विरोधात घेतलेली भूमिका आठवते आणि जावेद मियाँदाद याचा ‘मातोश्री’वर झालेला पाहुणचारदेखील आठवतो. एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा आठवते, तशी त्याच कंपनीच्या रिबेका मार्क यांनी ‘मातोश्री’वर झाडलेली पायधूळदेखील आठवते. मायकेल जाक्सन, गुलाम अलीही आठवतात... तात्पर्य, आडात एक आणि पोहऱ्यात दुसरे!गुजराती समाज आणि शिवसेना यांचं तर विळ्या-भोपळ्याचं नातं! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून शिवसेना या समाजाला कायम पाण्यात पाहत आली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, अशी हाळी देत सेनेने गुजराती समाज आणि तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले. हे भांडण पुढे सीमाप्रश्नाच्या लढ्यापर्यंत कायम राहिले. १९६९ सालात उपपंतप्रधान पदावर असलेले मोरारजी मुंबई दौऱ्यावर आले असता, त्यांची गाडी अडविण्यावरून झालेला राडा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मोरारजींबद्दल शिवसेनेला असलेला राग मुंबई आणि मराठी माणसांसाठी होता, हे खरेच, पण पुढे तो समाजावरही काढण्यात येऊ लागला. अगदी कालपरवापर्यंत ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ असा वाद निर्माण करून गुजराती बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. गुजरातींच्या विरोधात शिवसेनेने कधी काळी ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ अशी हाक दिली होती. मुंबई महाराष्ट्रातच राहिली, पण मराठी टक्का कमी झाला. ज्या परप्रांतीयांच्या विरोधात सेना लढत राहिली, आज त्यांचाच टक्का वाढत गेल्याने खम्मण ढोकळा खाऊन लुंगीने तोंड पुसण्याची पाळी सेनेवर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही स्वाभिमानी मावळ्यांची सेना होती. तिथे जातपात नव्हती. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच संघटना उभी राहिली. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ‘घाटी-कोकणी, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर हे सारे भेद गाडून टाकून महाराष्ट्रासाठी म्हणून एक व्हा!’ आज ते हयात असते तर त्यांनी जातीपातींचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा ‘मातोश्री’वरून कडेलोटच केला असता. उद्धव म्हणतात, फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ’ आजच्यापेक्षा योग्य वेळ आणखी कोणती? या सत्तेत मन रमत नसेल, वागणं पटत नसेल, तर कसली वाट पाहता? सरळ घटस्फोट घेऊन मोकळे व्हा! - नंदकिशोर पाटील