शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अबतक छप्पन; हातांनी बोअर मारणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 19:26 IST

शंभर फूटहून अधिक खोलवर खोदले आड; सांगोला तालुक्यातील बलवडीच्या सुपुत्राचा दावा

ठळक मुद्देज्याने आतापर्यंत एक-दोन नाही तर तब्बल अबतक छपन्नपेक्षा जास्त बोअर हातांनी बनवल्या आहेतदत्ता शिंदे यांनी हातांनी बोअर पाडायच्या प्रयोगाला २०११ मध्ये सुरुवात केलीपिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाºया बलवडीमधील शेतकरी दत्ताच्या या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने बघू लागले आहेत

सांगोला : आपण गावोगावी मशीनने बोअर पाडताना नेहमीच पाहतो, मात्र हातांनी बोअर पाडलेले तुम्ही पाहिले आहे का ? असाच एक अवलिया आहे, ज्याने आतापर्यंत एक-दोन नाही तर तब्बल अबतक छपन्नपेक्षा जास्त बोअर हातांनी बनवल्या आहेत आणि तेही अगदी एका मापात.  हा अवलिया आहे बलवडी (ता. सांगोला) गावाचा.

सांगोल्याची ओळखच कायम दुष्काळी तालुका आणि या तालुक्यातील बलवडी गावदेखील पिढ्यान्पिढ्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले़ अशा या बलवडी गावात पिण्याच्या पाण्याची कायम भीषण टंचाई असताना बोअर पाडणेदेखील शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे. याचीच जाण असलेल्या दत्ता शिंदे यांनी हातांनी बोअर पाडायच्या प्रयोगाला २०११ मध्ये सुरुवात केली. 

पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी लहान लहान आड केले जायचे आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दत्ताने छोटे दांड्याचे फावडे आणि छोटी कुदळ याचा वापर करीत एकट्यानेच बोअर बनवायला सुरुवात केली. हा बोअर बनवितानादेखील ३ फूट एवढा अतिशय बारीक व्यास धरून त्याने खोदायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या प्रयत्नाला यश येऊ लागले आणि अतिशय कमी खर्चात शेतकºयांना हा मानवी बोअर हातांनीच करून देऊ लागला.

मदतीला पत्नी आणि एखादा मजूऱ यांच्या साहाय्याने तो हळूहळू बोअर खोल करीत जाऊ लागला आणि पाहता पाहता चक्क एकाच मापात १०० फुटांपर्यंत तो हे बोअर तयार करू लागला. जसजशी जमिनीच्या पोटात खोदाई करायला लागायची तशी प्रचंड उष्णता, कमी प्राणवायू अशा त्रासाला त्याला तोंड द्यावे लागे. पण आता गेल्या आठ वर्षात दत्ताला याची चांगलीच सवय होऊन गेली़ आज त्याच्या नावावर बलवडी गावात तब्बल ५६ बोअर तयार झाले. घूस जशी बीळ पडत जाते तसंच दत्तादेखील अगदी एका रेषेत खोलपर्यंत हे बोअर तयार करतो़ जमिनीच्या शेवटच्या स्तराला जेव्हा पाणी लागते तेव्हाच त्याच्या चेहºयावर समाधान पसरते.

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाºया बलवडीमधील शेतकरी दत्ताच्या या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने बघू लागले आहेत. आपल्या परिस्थितीमुळे जगण्यासाठी जीवावर उदार होऊन दत्ता  करीत असलेल्या या कामामुळे आज बलवडीत त्याच्या बोअरमधील पाण्यामुळे शेततळी भरू लागली आहेत़ त्यामुळे  बलवडी परिसरात डाळिंब बागासह इतर पिके जिवंत राहिली आहेत.

दत्ताने स्वत:च्या हाताखाली अजून ३ जणांना असे हातांनी बोअर पाडायला शिकवले आहे़ आता ही मंडळीदेखील परिसरात अशा पद्धतीचे बोअर खोदत आहेत. 

त्याच बोअरवर भरू लागली शेततळी- आज बलवडीतील डॉ़ अशोक कवडे यांनी दोन महिन्यांपूर्वी खोदलेल्या बोअरमधून आता आपले शेततळे भरून घ्यायला सुरुवात केली आहे. कायम दुष्काळी असलेली माझी जमीन आता बागायती होईल़ बलवडी भागात अनेक शेतकरी दत्तामुळे बागायतदार झाल्याचे ते सांगतात. मशीनने बोअर पाडल्यास शेतकºयाला सव्वा ते दीड लाख खर्च येतो, मात्र हेच काम दत्ता केवळ २५ हजारात करीत असल्याने शेतकºयांना दत्ताचे मानवी बोअर आपले वाटते.

स्वत:च्या शेतातील आड खोदून व्यवसाय करणार बंद- वडिलांच्या आजारासाठी झालेल्या खर्चाची पूर्तता करताना दत्ता शिंदे यांना हे काम शिकावे लागले. सहावी पास, स्वत:जवळ केवळ ७१ गुंठे जमीन, घरी पत्नी आणि मुले यामुळे काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी हा आड खोदण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका आडासाठी पाच ते सहा हजार रुपये मिळायचे. त्यानंतर त्यांनी आसपासच्या गावातून ५६ आड खोदले. आता स्वत:च्या शेतात शेवटचा आड खोदून हा व्यवसाय बंद करण्याचा त्यांचा मानस आहे. कारण या आडात वर खाली करताना दम लागतो आणि त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर