शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

कृष्णेचे आतापर्यंत ९५ लाख लीटर पाणी लातुरात

By admin | Updated: April 22, 2016 04:15 IST

मिरजहून सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५० वॅगनच्या जलपरीने २५ लाख लीटर पाणी लातुरात आणले. आतापर्यंत मिरजेहून कृष्णेचे ९५ लाख लीटर पाणी लातुरात आले आहे

लातूर : मिरजहून सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५० वॅगनच्या जलपरीने २५ लाख लीटर पाणी लातुरात आणले. आतापर्यंत मिरजेहून कृष्णेचे ९५ लाख लीटर पाणी लातुरात आले आहे. जलपरीच्या ५० वॅगनची पहिली फेरी बुधवारी सकाळी झाली.गुरुवारी सकाळी या वॅगनमधील पाणी केवळ ६.३० तासांत उतरवून घेण्यात आले. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांनी जलपरी मिरजच्या दिशेने रवाना झाली. आता ५० वॅगनच्या जलपरीची दररोज १ खेप होणार असल्याचे रेल्वेसूत्रांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत १० वॅगनच्या ९ फेऱ्या झाल्या असून, ५० वॅगनच्या दोन फेऱ्या जलपरीने केल्या आहेत. ५० वॅगनच्या दोन फेऱ्यांतून ५० लाख लीटर आणि १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांतून ४५ लाख लीटर असे एकूण ९५ लाख लीटर कृष्णेचे पाणी आतापर्यंत लातूरकरांना मिळाले आहे. (वार्ताहर)मिरज : मिरजेतून ५० रेल्वे टॅँकरमधून २५ लाख लीटर पाण्याची तिसरी खेप लातूरला पाठविण्यात आली. गुरुवारी जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली. मिरज रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रापासून अडीच किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून दररोज २५ लाख लीटर पाणी भरून जलदूत एक्स्प्रेस लातूरला जात आहे. दिवसभर पाणी भरण्याचे काम पूर्ण झाल्याने रात्री जलदूत एक्स्प्रेस लातूरकडे रवाना झाली. ५० रेल्वे टॅँकर भरण्यासाठी नदीतील जॅकवेल व हैदरखान विहिरीतील पंप सुरू करण्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिरजेतून रेल्वेने केलेल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मिरजेला येणार आहेत. लातूर : ‘जलयुक्त लातूर, सर्वांसाठी पाणी’ ही संकल्पना घेऊन गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील नागझरी बंधाऱ्यावरील कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात येणार असल्याची माहिती जलयुक्त लातूर व्यवस्थापन समितीचे डॉ़ अशोक कुकडे यांनी पत्र परिषदेत दिले़जलयुक्त चळवळीच्या मदतीसाठी सर्वच स्तरांतील दानशूर लातूरकर सरसावले आहेत़ या माध्यमातून आजपर्यंत ३ कोटी ७५ लाखांचा निधी संकलित करण्यात आला असल्याचे कुकडे यांनी सांगितले.> पाण्यावरून बाचाबाची !लातूर : टँकरच्या पाणीवाटपावरून शहरातील जुना औसा रोड भागातील गणेश नगर येथे गुरुवारी नागरिक आणि नगरसेवकात बाचाबाची झाली. दारासमोरून जात असलेल टँकर थांबवून नागरिकांनी पाणी घेतल्यानंतरच हा वाद मिटला. आम्हाला पिण्यापुरते पाणी द्या त्यानंतर पुढे जा, असे म्हणत गणेश नगर येथे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास काही नागरिकांनी महापालिकेचे टँकर अडविले. नागरिकांची बाचाबाची सुरू असताना प्रभाग समितीच्या सभापती श्रीदेवी औसे यांचे पती शिवा औसे, नगरसेविका कविता वाडीकर यांचे पती, माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील, नगरसेवक अनुप मलवाडे हे टँकरजवळ आले. काही नागरिकांनी त्यांनाही जाब विचारला.जवळपास अर्धा तास गोंधळ सुरू होता. जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत टँकरला पुढे जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी टँकरला अडवून धरले. नागरिकांचा रोष पाहून नगरसेवकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर इथल्या महिलांनी प्रत्येकी दोनशे लिटरप्रमाणे बॅरल भरून घेतले. (प्रतिनिधी)पाणी वाटपात राजकारण पाणी वाटपात मनपा प्रशासन व नगरसेवक राजकारण करीत आहेत. ठराविक भागातच टँकरचे पाणी दिले जात आहे. मुख्य रस्त्यावरील नागरिकांना पाणी मिळत नाही. आठ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्यामुळेच टँकर अडवून जाब विचारला. शिवाय, पाणीही भरून घेतल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्या स्वाती जाधव यांनी सांगितले.समान पाणी वाटपाचा प्रयत्न पाणीवाटपात कसल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. सर्वच भागांत पाणी वाटप सुरू आहे. त्यामुळे यात दुजाभाव होत नाही, असे माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी सांगितले.