शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

कृष्णेचे आतापर्यंत ९५ लाख लीटर पाणी लातुरात

By admin | Updated: April 22, 2016 04:15 IST

मिरजहून सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५० वॅगनच्या जलपरीने २५ लाख लीटर पाणी लातुरात आणले. आतापर्यंत मिरजेहून कृष्णेचे ९५ लाख लीटर पाणी लातुरात आले आहे

लातूर : मिरजहून सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५० वॅगनच्या जलपरीने २५ लाख लीटर पाणी लातुरात आणले. आतापर्यंत मिरजेहून कृष्णेचे ९५ लाख लीटर पाणी लातुरात आले आहे. जलपरीच्या ५० वॅगनची पहिली फेरी बुधवारी सकाळी झाली.गुरुवारी सकाळी या वॅगनमधील पाणी केवळ ६.३० तासांत उतरवून घेण्यात आले. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांनी जलपरी मिरजच्या दिशेने रवाना झाली. आता ५० वॅगनच्या जलपरीची दररोज १ खेप होणार असल्याचे रेल्वेसूत्रांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत १० वॅगनच्या ९ फेऱ्या झाल्या असून, ५० वॅगनच्या दोन फेऱ्या जलपरीने केल्या आहेत. ५० वॅगनच्या दोन फेऱ्यांतून ५० लाख लीटर आणि १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांतून ४५ लाख लीटर असे एकूण ९५ लाख लीटर कृष्णेचे पाणी आतापर्यंत लातूरकरांना मिळाले आहे. (वार्ताहर)मिरज : मिरजेतून ५० रेल्वे टॅँकरमधून २५ लाख लीटर पाण्याची तिसरी खेप लातूरला पाठविण्यात आली. गुरुवारी जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली. मिरज रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रापासून अडीच किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून दररोज २५ लाख लीटर पाणी भरून जलदूत एक्स्प्रेस लातूरला जात आहे. दिवसभर पाणी भरण्याचे काम पूर्ण झाल्याने रात्री जलदूत एक्स्प्रेस लातूरकडे रवाना झाली. ५० रेल्वे टॅँकर भरण्यासाठी नदीतील जॅकवेल व हैदरखान विहिरीतील पंप सुरू करण्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिरजेतून रेल्वेने केलेल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मिरजेला येणार आहेत. लातूर : ‘जलयुक्त लातूर, सर्वांसाठी पाणी’ ही संकल्पना घेऊन गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील नागझरी बंधाऱ्यावरील कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात येणार असल्याची माहिती जलयुक्त लातूर व्यवस्थापन समितीचे डॉ़ अशोक कुकडे यांनी पत्र परिषदेत दिले़जलयुक्त चळवळीच्या मदतीसाठी सर्वच स्तरांतील दानशूर लातूरकर सरसावले आहेत़ या माध्यमातून आजपर्यंत ३ कोटी ७५ लाखांचा निधी संकलित करण्यात आला असल्याचे कुकडे यांनी सांगितले.> पाण्यावरून बाचाबाची !लातूर : टँकरच्या पाणीवाटपावरून शहरातील जुना औसा रोड भागातील गणेश नगर येथे गुरुवारी नागरिक आणि नगरसेवकात बाचाबाची झाली. दारासमोरून जात असलेल टँकर थांबवून नागरिकांनी पाणी घेतल्यानंतरच हा वाद मिटला. आम्हाला पिण्यापुरते पाणी द्या त्यानंतर पुढे जा, असे म्हणत गणेश नगर येथे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास काही नागरिकांनी महापालिकेचे टँकर अडविले. नागरिकांची बाचाबाची सुरू असताना प्रभाग समितीच्या सभापती श्रीदेवी औसे यांचे पती शिवा औसे, नगरसेविका कविता वाडीकर यांचे पती, माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील, नगरसेवक अनुप मलवाडे हे टँकरजवळ आले. काही नागरिकांनी त्यांनाही जाब विचारला.जवळपास अर्धा तास गोंधळ सुरू होता. जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत टँकरला पुढे जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी टँकरला अडवून धरले. नागरिकांचा रोष पाहून नगरसेवकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर इथल्या महिलांनी प्रत्येकी दोनशे लिटरप्रमाणे बॅरल भरून घेतले. (प्रतिनिधी)पाणी वाटपात राजकारण पाणी वाटपात मनपा प्रशासन व नगरसेवक राजकारण करीत आहेत. ठराविक भागातच टँकरचे पाणी दिले जात आहे. मुख्य रस्त्यावरील नागरिकांना पाणी मिळत नाही. आठ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्यामुळेच टँकर अडवून जाब विचारला. शिवाय, पाणीही भरून घेतल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्या स्वाती जाधव यांनी सांगितले.समान पाणी वाटपाचा प्रयत्न पाणीवाटपात कसल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. सर्वच भागांत पाणी वाटप सुरू आहे. त्यामुळे यात दुजाभाव होत नाही, असे माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी सांगितले.