शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बचतीसाठी ‘अंघोळीची गोळी’

By admin | Updated: April 28, 2016 00:57 IST

राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुणेकरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे़

पुणे : राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुणेकरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे़ जर, ४० लाख पुणेकरांनी आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तर तब्बल ४ कोटी लिटर पाणी वाचविता येईल़ या व अशा अनेक पाणीबचतीचे उपाय लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न तरुणांचा एक गट ‘अंघोळीची गोळी’ या उपक्रमातून करीत आहे़ अंघोळीसाठी प्रत्येक जण २० लिटर पाणी वापरतो़ आठवड्यातून एक दिवस अंघोळ न करता केवळ हात, पाय, तोंड धुतले, तर त्यासाठी १० लिटर पाणी लागेल़ प्रत्येक जण १० लिटर पाणी वाचवू शकेल़ अशा प्रकारे ४० लाख पुणेकर किमान ४ कोटी लिटर पाणी वाचवू शकतील़ या शिवाय छोट्या छोट्या उपायातून मोठ्या प्रमाणावर पाणीबचत करता येऊ शकते़ या उपक्रमाचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, की पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे तत्कालीन महापौर दत्तात्रय धनकवडे हे सांगत असल्याची बातमी टीव्हीवर पाहत होते. त्या वेळी सहजपणे मीही उद्यापासून एक दिवसाआड अंघोळ करणार, असे म्हटले़ त्यातूनच पाणीबचत कशी करता येईल, याचा विचार करण्यास सुरुवात केली़ काही डॉक्टर मित्रांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तरी वैद्यकीयदृष्ट्या फरक पडत नाही़ हात, पाय, तोंड स्वच्छ धुतले, तरी चालू शकते़ विद्यापीठात एम़ ए़ (तत्त्वज्ञान)ला माझ्याबरोबर शिकत असलेल्या मित्रांची या उपक्रमाला साथ मिळाली़ सोशल मीडियामार्फत आम्ही हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत़ वाचविलेले हे पाणी आपण येणाऱ्या काळातील पाणीटंचाई कमी करण्यास साहाय्यभूत ठरू शकते़पाणीटंचाईचे गांभीर्य विचारात घेऊन सर्वांनीच पाणीबचतीचा उपक्रम राबविल्यास, तसेच काटकसर केल्यास आणखी काही महिने पाणी पुरवून वापरता येईल.