शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणावादी व्यक्तींची नक्षल्यांकडून मुस्कटदाबी

By admin | Updated: July 27, 2014 01:24 IST

गोरगरिब जनतेचे भले करण्याची भाषा वापरणारे नक्षलवादी सुशिक्षित आणि सुधारणावादी व्यक्तींची मुस्कटदाबी करीत आहे. मनाप्रमाणे ऐकत नसेल तर त्याला पोलिसांचा खबऱ्या ठरवून त्याची हत्या करतात.

गोरगरिबांची कुचंबना : धाडसी मंगला अजमेरचे कथन नागपूर : गोरगरिब जनतेचे भले करण्याची भाषा वापरणारे नक्षलवादी सुशिक्षित आणि सुधारणावादी व्यक्तींची मुस्कटदाबी करीत आहे. मनाप्रमाणे ऐकत नसेल तर त्याला पोलिसांचा खबऱ्या ठरवून त्याची हत्या करतात. गावाच्या विकासाची चर्चा करतो म्हणूनच आपल्या पतीची नक्षलवाद्यांनी हत्या केली, अशी माहिती मंगला राजू अजमेर या आदिवासी महिलेने आज पत्रकारांना दिली. नक्षल्यांप्रमाणेच विकासाचा दावा करणाऱ्या सरकारचाही फोलपणा मंगला यांनी उघड केला. जानेवारी २०१४ मध्ये नक्षलग्रस्त भागात शोधयात्रा काढणाऱ्या आणि या भागातील आदिवासी, गोरगरिब जनतेच्या व्यथा समजून घेणाऱ्या शोधयात्रेतील काही जणांनी ‘भूमकाल संघटन‘ काढले आहे. नक्षलवाद्यांचा वैचारिक विरोध करून या चळवळीचा फोलपणा उघड करण्याचा संकल्प घेणाऱ्या भूमकाल संघटनने आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. मंगला अजमेर या संघटनेच्या सदस्य आहेत. डोळ्यादेखत पती गमावणाऱ्या आणि याचवेळी नक्षल्यांना गोळ्या मारा असे आवाहन करणाऱ्या धाडसी मंगला अजमेर नक्षल्यांच्या क्रूरपणाचा परिचय सर्वांना व्हावा या उद्देशाने पत्रकारांपुढे आल्या. त्यांना अक्षय (वय १५), अजय (वय १२) आणि पवन (वय ९) अशी तीन मुले आहेत. त्या आपल्या पती आणि मुलांसोबत गडचिरोलीतील किष्टापूर गावात राहायच्या. पतीचे छोटेसे किराणा दुकान होते. ४३५ लोकसंख्येच्या या गावात येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या किराणा दुकानात यायची. पोलीसही बसायचे. गावाचा विकास झाला पाहिजे. रस्ते, लाईट आले पाहिजे. शाळा अन् आरोग्य सेवाही किष्टापुरात यावी, असे राजू अजमेरचे प्रयत्न होते. नक्षल्यांना ते नको होते. त्यामुळे ते वारंवार धमक्या द्यायचे. २६ जानेवारीला पतीच्या पुढाकाराने गावात झेंडावंदनाचा (गणराज्य दिनाचा) कार्यक्रम झाला. परिणामी नक्षलवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी (२७ जानेवारी) राजू अजमेर आणि अन्य एक अशा दोघांना गावकऱ्यांसमोर गोळ्या घालून ठार मारले. यावेळी काही नक्षल्यांनी आपल्याला पकडून ठेवले होते. ‘तुम्ही गोरगरिबांच्या हिताच्या गोष्टी करता. आम्ही गरीब आहोत, आमचे घर का उद्ध्वस्त करता‘, असा प्रश्न मंगला यांनी नक्षलवाद्यांना विचारला. यावर ‘तुलाही गोळ्या घालू का‘, असे नक्षल्यांनी विचारले. मंगलाने त्यांना शिव्याशाप देत ‘हिंमत असेल तर घाला गोळ्या‘ असे म्हणत आव्हान दिले. नक्षल्यांनी तिला सोडून देत गावातून पळ काढला. या घटनेमुळे अजमेर कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. वृध्द सासू-सासरे बाजूला सहा किलोमीटर अंतरावर राहायला आहे. कर्ता मुलगा गेल्यामुळे जगायचे कसे, असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. धाडसी मंगलाने त्या गावात छोटेसे किराणा दुकान सुरू केले. मुलांचे शिक्षण आणि त्यांच्यासकट सासू-सासऱ्यांच्या उदरभरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी धाडसी मंगला प्रयत्न करते. गावातील आशा कार्यकर्ती म्हणूनही सेवा देते. यावेळी भूमकाल संघटनेचे सहसंयोजक अरविंद सोहनी यांनीही नक्षल्यांचा फोलपणा उघड केला. संघटनेचे अध्यक्ष श्याम पांढरीपांडे, संयोजक दत्ता शिर्के, रश्मी पारस्कर तसेच मंगला यांचे नातेवाईक पुनाराम चव्हाण उपस्थित होते. त्यांनीही गडचिरोलीतील भयाण वास्तवावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)