शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

चाळीतील कांद्याला येऊ लागला वास

By admin | Updated: September 25, 2016 18:26 IST

कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 25 - कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला आहे. मात्र, आता चाळीतील कांद्याला वास येऊ लागला आहे. पिंपळनेर शहरानजीकच्या ग्रामीण भागात तर तर साठवणूक केलेला कांदा सडला असून त्यातून पाणी बाहेर निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिल्लक असलेला कांदा मिळेल, त्या किंमतीत विकण्याची वेळ आली आहे. साक्री तालुक्याचे मुख्य पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेला कांदा चाळीत सडत आहे. तर जो काही शिल्लक राहिलेला कांदा आहे. त्या कांद्याला शेतकऱ्यांना फक्त १०० ते २०० रुपये क्विंटलप्रमाणे विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. साक्री तालुक्यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सध्या कांद्याचा भाव पाहिला, तर शेतकऱ्यांची जणू चेष्टाच करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने शेती करूनदेखील त्यांच्या कांद्याच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. सडलेला कांदा फेकावा लागतोय कांद्याला यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून भाव नाही. त्यामुळे पुढे चांगला भाव मिळेल? या आशेने शेतकऱ्यांनी तब्बल पाच ते सहा महिन्यांपासून कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कांदा साठवणूक करून ठेवल्यामुळे कांदा सडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यातून आता पाणी बाहेर पडत असून त्यातून वासही येत आहे. १ ते २ रुपये किलोप्रमाणे विक्री खराब कांदा चाळीत साठवून ठेवण्यापेक्षा मिळेल, त्या किंमतीत शेतकऱ्यांनी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपळनेरशहरासह लगतच्या ग्रामीण भागात कांदा चक्क १ ते २ रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. तर साक्री व धुळे शहरात कांदा ५ ते १० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. >सरकारने शेतकऱ्यांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांदा सडत चालल्यामुळे येईल, त्या किंमतीत कांद्याची विक्री आम्हांला करावी लागत आहे. - मयूर घरटे, सामोडे, शेतकरी>सरकारने कांदा निर्यात केली असती, तर शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला असता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - शशिकांत भदाणे, माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना