शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
8
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
9
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
10
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
11
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
12
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
13
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
14
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
15
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
16
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
17
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
18
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
19
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
20
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

चाळीतील कांद्याला येऊ लागला वास

By admin | Updated: September 25, 2016 18:26 IST

कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 25 - कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला आहे. मात्र, आता चाळीतील कांद्याला वास येऊ लागला आहे. पिंपळनेर शहरानजीकच्या ग्रामीण भागात तर तर साठवणूक केलेला कांदा सडला असून त्यातून पाणी बाहेर निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिल्लक असलेला कांदा मिळेल, त्या किंमतीत विकण्याची वेळ आली आहे. साक्री तालुक्याचे मुख्य पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेला कांदा चाळीत सडत आहे. तर जो काही शिल्लक राहिलेला कांदा आहे. त्या कांद्याला शेतकऱ्यांना फक्त १०० ते २०० रुपये क्विंटलप्रमाणे विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. साक्री तालुक्यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सध्या कांद्याचा भाव पाहिला, तर शेतकऱ्यांची जणू चेष्टाच करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने शेती करूनदेखील त्यांच्या कांद्याच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. सडलेला कांदा फेकावा लागतोय कांद्याला यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून भाव नाही. त्यामुळे पुढे चांगला भाव मिळेल? या आशेने शेतकऱ्यांनी तब्बल पाच ते सहा महिन्यांपासून कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कांदा साठवणूक करून ठेवल्यामुळे कांदा सडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यातून आता पाणी बाहेर पडत असून त्यातून वासही येत आहे. १ ते २ रुपये किलोप्रमाणे विक्री खराब कांदा चाळीत साठवून ठेवण्यापेक्षा मिळेल, त्या किंमतीत शेतकऱ्यांनी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपळनेरशहरासह लगतच्या ग्रामीण भागात कांदा चक्क १ ते २ रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. तर साक्री व धुळे शहरात कांदा ५ ते १० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. >सरकारने शेतकऱ्यांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांदा सडत चालल्यामुळे येईल, त्या किंमतीत कांद्याची विक्री आम्हांला करावी लागत आहे. - मयूर घरटे, सामोडे, शेतकरी>सरकारने कांदा निर्यात केली असती, तर शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला असता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - शशिकांत भदाणे, माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना