शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चाळीतील कांद्याला येऊ लागला वास

By admin | Updated: September 25, 2016 18:26 IST

कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 25 - कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला आहे. मात्र, आता चाळीतील कांद्याला वास येऊ लागला आहे. पिंपळनेर शहरानजीकच्या ग्रामीण भागात तर तर साठवणूक केलेला कांदा सडला असून त्यातून पाणी बाहेर निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिल्लक असलेला कांदा मिळेल, त्या किंमतीत विकण्याची वेळ आली आहे. साक्री तालुक्याचे मुख्य पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेला कांदा चाळीत सडत आहे. तर जो काही शिल्लक राहिलेला कांदा आहे. त्या कांद्याला शेतकऱ्यांना फक्त १०० ते २०० रुपये क्विंटलप्रमाणे विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. साक्री तालुक्यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सध्या कांद्याचा भाव पाहिला, तर शेतकऱ्यांची जणू चेष्टाच करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने शेती करूनदेखील त्यांच्या कांद्याच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. सडलेला कांदा फेकावा लागतोय कांद्याला यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून भाव नाही. त्यामुळे पुढे चांगला भाव मिळेल? या आशेने शेतकऱ्यांनी तब्बल पाच ते सहा महिन्यांपासून कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कांदा साठवणूक करून ठेवल्यामुळे कांदा सडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यातून आता पाणी बाहेर पडत असून त्यातून वासही येत आहे. १ ते २ रुपये किलोप्रमाणे विक्री खराब कांदा चाळीत साठवून ठेवण्यापेक्षा मिळेल, त्या किंमतीत शेतकऱ्यांनी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपळनेरशहरासह लगतच्या ग्रामीण भागात कांदा चक्क १ ते २ रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. तर साक्री व धुळे शहरात कांदा ५ ते १० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. >सरकारने शेतकऱ्यांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांदा सडत चालल्यामुळे येईल, त्या किंमतीत कांद्याची विक्री आम्हांला करावी लागत आहे. - मयूर घरटे, सामोडे, शेतकरी>सरकारने कांदा निर्यात केली असती, तर शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला असता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - शशिकांत भदाणे, माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना