शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट मीटरचे मुंबई, पुण्यातील प्रयोग फेल! तरीही बसवतायत, वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उडताहेत खटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:22 IST

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणसह बेस्टकडून स्मार्ट मीटर बसविले जाणार असले तरी हे स्मार्ट मीटर मोफत की विकत? इथंपासून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज गळती, वीज चोरी थांबेल का, आणि विजेचे बिल खरेच कमी येईल? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती वीज ग्राहकांसह महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने महावितरणवर केली आहे. विशेषत: प्रत्येक वेळी महावितरणसह बेस्टच्या मुख्यालयात या गोष्टींसाठी येणे वीज ग्राहकांना शक्य नसल्याने फिल्डवर असणारे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात नवीन मीटरबाबतच्या प्रश्नांमुळे खटके उडत आहेत. त्यामुळे स्मार्टबाबत आता शहर आणि ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा; यावर ग्राहक आणि संघटनांनी जोर दिला आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे. महाराष्ट्रातील एकूण २ कोटी ४० लाख वीज ग्राहकांपैकी कृषी पंप धारक (ॲग्रीकल्चर) ग्राहकांना सोडून सर्व ग्राहकांकरिता ही योजना आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० ते ६०० कोटींचा भार येईल. योजनेचे काम खात्यामार्फत न करता कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. होणारा विरोध लक्षात घेता व्यवस्थापनाने काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

अनामत रक्कम परत करणार का? वर्तमान व्यवस्थेमधे वीज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून महावितरणने तीन महिन्यांच्या सरासरी बिलाइतकी अनामत घेतली आहे. ती त्यांना परत केली जाईल की, स्मार्ट मीटरच्या किमतीच्या ऐवजात ॲडजस्ट केली जाईल. अनामत रकमा या लक्षावधी रुपयांच्या परत कराव्या लागतील. त्याचा महावितरणच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होईल. वेळप्रसंगी खुल्या बाजारपेठेतून कर्ज घेऊन हे भागवावे लागेल.    - कृष्णा भोयर, सरचिटणीस,  स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

या प्रश्नांचा भडिमारn मीटरची किंमत किती, ग्राहकाकडून ती कशी वसूल केली जाईल, त्याचा एकूण आर्थिक बोजा किती? n मीटर लावल्यानंतर कार्यान्वित होण्याचा कालावधी, फॉल्टी मीटर बदलवणे, त्याची जबाबदारी, फॉल्टी मीटर कॉस्ट ग्राहकाकडून वसूल करणार की कसे?n मीटर लावल्यानंतर ग्राहक रिचार्ज न करतासुद्धा वीज वापरू शकतो. परिणामी गळती वाढेल. त्याबाबत उपाय योजना जनमित्र व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सांगावी लागेल.n पुणे शहरांत मगरपट्टासिटी व इतर काही शहरांत स्मार्ट प्रीपेड मीटर लावले होते. हा प्रयोग व प्रोजेक्ट अयशस्वी ठरला.n भांडुप झोन खारघर व इतर भागामधे स्मार्ट मीटर लावल्यानंतर चोरी, गळतीचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्मार्ट मीटर काढून पोस्टपेड मीटर लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज