शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

स्मार्ट मीटरचे मुंबई, पुण्यातील प्रयोग फेल! तरीही बसवतायत, वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उडताहेत खटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:22 IST

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणसह बेस्टकडून स्मार्ट मीटर बसविले जाणार असले तरी हे स्मार्ट मीटर मोफत की विकत? इथंपासून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज गळती, वीज चोरी थांबेल का, आणि विजेचे बिल खरेच कमी येईल? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती वीज ग्राहकांसह महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने महावितरणवर केली आहे. विशेषत: प्रत्येक वेळी महावितरणसह बेस्टच्या मुख्यालयात या गोष्टींसाठी येणे वीज ग्राहकांना शक्य नसल्याने फिल्डवर असणारे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात नवीन मीटरबाबतच्या प्रश्नांमुळे खटके उडत आहेत. त्यामुळे स्मार्टबाबत आता शहर आणि ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा; यावर ग्राहक आणि संघटनांनी जोर दिला आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे. महाराष्ट्रातील एकूण २ कोटी ४० लाख वीज ग्राहकांपैकी कृषी पंप धारक (ॲग्रीकल्चर) ग्राहकांना सोडून सर्व ग्राहकांकरिता ही योजना आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० ते ६०० कोटींचा भार येईल. योजनेचे काम खात्यामार्फत न करता कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. होणारा विरोध लक्षात घेता व्यवस्थापनाने काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

अनामत रक्कम परत करणार का? वर्तमान व्यवस्थेमधे वीज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून महावितरणने तीन महिन्यांच्या सरासरी बिलाइतकी अनामत घेतली आहे. ती त्यांना परत केली जाईल की, स्मार्ट मीटरच्या किमतीच्या ऐवजात ॲडजस्ट केली जाईल. अनामत रकमा या लक्षावधी रुपयांच्या परत कराव्या लागतील. त्याचा महावितरणच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होईल. वेळप्रसंगी खुल्या बाजारपेठेतून कर्ज घेऊन हे भागवावे लागेल.    - कृष्णा भोयर, सरचिटणीस,  स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

या प्रश्नांचा भडिमारn मीटरची किंमत किती, ग्राहकाकडून ती कशी वसूल केली जाईल, त्याचा एकूण आर्थिक बोजा किती? n मीटर लावल्यानंतर कार्यान्वित होण्याचा कालावधी, फॉल्टी मीटर बदलवणे, त्याची जबाबदारी, फॉल्टी मीटर कॉस्ट ग्राहकाकडून वसूल करणार की कसे?n मीटर लावल्यानंतर ग्राहक रिचार्ज न करतासुद्धा वीज वापरू शकतो. परिणामी गळती वाढेल. त्याबाबत उपाय योजना जनमित्र व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सांगावी लागेल.n पुणे शहरांत मगरपट्टासिटी व इतर काही शहरांत स्मार्ट प्रीपेड मीटर लावले होते. हा प्रयोग व प्रोजेक्ट अयशस्वी ठरला.n भांडुप झोन खारघर व इतर भागामधे स्मार्ट मीटर लावल्यानंतर चोरी, गळतीचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्मार्ट मीटर काढून पोस्टपेड मीटर लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज