शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

स्मार्ट मीटरचे मुंबई, पुण्यातील प्रयोग फेल! तरीही बसवतायत, वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उडताहेत खटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:22 IST

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणसह बेस्टकडून स्मार्ट मीटर बसविले जाणार असले तरी हे स्मार्ट मीटर मोफत की विकत? इथंपासून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज गळती, वीज चोरी थांबेल का, आणि विजेचे बिल खरेच कमी येईल? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती वीज ग्राहकांसह महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने महावितरणवर केली आहे. विशेषत: प्रत्येक वेळी महावितरणसह बेस्टच्या मुख्यालयात या गोष्टींसाठी येणे वीज ग्राहकांना शक्य नसल्याने फिल्डवर असणारे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात नवीन मीटरबाबतच्या प्रश्नांमुळे खटके उडत आहेत. त्यामुळे स्मार्टबाबत आता शहर आणि ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा; यावर ग्राहक आणि संघटनांनी जोर दिला आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे. महाराष्ट्रातील एकूण २ कोटी ४० लाख वीज ग्राहकांपैकी कृषी पंप धारक (ॲग्रीकल्चर) ग्राहकांना सोडून सर्व ग्राहकांकरिता ही योजना आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० ते ६०० कोटींचा भार येईल. योजनेचे काम खात्यामार्फत न करता कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. होणारा विरोध लक्षात घेता व्यवस्थापनाने काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

अनामत रक्कम परत करणार का? वर्तमान व्यवस्थेमधे वीज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून महावितरणने तीन महिन्यांच्या सरासरी बिलाइतकी अनामत घेतली आहे. ती त्यांना परत केली जाईल की, स्मार्ट मीटरच्या किमतीच्या ऐवजात ॲडजस्ट केली जाईल. अनामत रकमा या लक्षावधी रुपयांच्या परत कराव्या लागतील. त्याचा महावितरणच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होईल. वेळप्रसंगी खुल्या बाजारपेठेतून कर्ज घेऊन हे भागवावे लागेल.    - कृष्णा भोयर, सरचिटणीस,  स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

या प्रश्नांचा भडिमारn मीटरची किंमत किती, ग्राहकाकडून ती कशी वसूल केली जाईल, त्याचा एकूण आर्थिक बोजा किती? n मीटर लावल्यानंतर कार्यान्वित होण्याचा कालावधी, फॉल्टी मीटर बदलवणे, त्याची जबाबदारी, फॉल्टी मीटर कॉस्ट ग्राहकाकडून वसूल करणार की कसे?n मीटर लावल्यानंतर ग्राहक रिचार्ज न करतासुद्धा वीज वापरू शकतो. परिणामी गळती वाढेल. त्याबाबत उपाय योजना जनमित्र व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सांगावी लागेल.n पुणे शहरांत मगरपट्टासिटी व इतर काही शहरांत स्मार्ट प्रीपेड मीटर लावले होते. हा प्रयोग व प्रोजेक्ट अयशस्वी ठरला.n भांडुप झोन खारघर व इतर भागामधे स्मार्ट मीटर लावल्यानंतर चोरी, गळतीचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्मार्ट मीटर काढून पोस्टपेड मीटर लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज