शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

सायबर हल्ल्याच्या रडारवर स्मार्ट सिटी

By admin | Updated: July 1, 2017 07:45 IST

जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. ओनाक्रायच्या व्हायरसपासून वाचण्यासाठीची उपाययोजना सुरू असताना आता पेंट्या व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. भविष्यातही नवी मुंबई, पनवेल परिसरातील माहिती तंत्रज्ञान, अर्थविषयक कंपन्या व मोठ्या उद्योगांसमोर सायबर हल्ल्यापासून बचाव करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनीही या गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून नवी मुंबईची जगभर ओळख आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, ओएनजीसी व अनेक महत्त्वाचे उद्योग या परिसरामध्ये आहेत. डीएकेसी, पटनीसह शेकडो आयटी कंपन्याही नवी मुंबईमध्ये आहेत. एकेकाळी केमिकल झोन म्हणून ओळख असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला आयटी सेक्टरचा दर्जा प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्वच वित्तीय संस्थांची कार्यालये या परिसरामध्ये आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या पनवेल, नवी मुंबईमधील वाढत्या औद्योगिक साम्राज्यासमोर आता सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. २७ जूनला जेएनपीटीच्या गेटवे टर्मिनल कंपनीवर सायबर हल्ला झाला. जीटीआय कंपनीच्या माध्यमातून रोज ५ ते ६ हजार कंटेनर हाताळले जातात. २००४पासून उत्तमपणे काम करत असलेल्या या कंपनीमधील सर्व २७० संगणक व लॅपटॉपमध्ये पेंट्या व्हायरस शिरला असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे. हॅकरने कंपनीकडे एक संगणकामधील व्हायरस काढण्यासाठी ३०० डॉलरची खंडणी मागितली असून याविषयी गुन्हा दाखल झाला आहे. देशात यापूर्वी झालेल्या सायबर हल्ल्याच्या वेळी ओनाक्राय या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विंगने या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याविषयीचे माहितीपत्रक तयार केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यांनाही याविषयी माहिती देण्यात आली होती. ओनाक्रायचा धोका संपलेला नसताना आता पेंट्याने धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने राज्याच्या सायबर विंगकडे याविषयी काय खबरदारी घेण्यात यावी? याविषयी विचारणा केली आहे. भविष्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील सर्वच उद्योग समूह, वित्तीय संस्था व आयटीचा वापर असणाऱ्या सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वैयक्तिक व कार्यालयातील संगणक हाताळतानाही योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हॅकर मागतात खंडणीअनोळखी मेल किंवा लिंक उघडल्यामुळे व्हायरस संगणक व लॅपटॉपमध्ये प्रवेश करतो व काही क्षणात कंपनीमधील सर्व संगणक यंत्रणा ठप्प होते. सर्व संगणकीय यंत्रणाच ठप्प होऊन जाते. एखाद्या कंपनीमध्ये सायबर हल्ला केल्यानंतर संगणक व लॅपटॉप सुरू करताना एक मॅसेज दिसू लागतो. तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक केला असून, तुम्हाला तुमचा डाटा हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शनला क्लिक करून ठरावीक रक्कम नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली जाते. जेएनपीटीमधील जीटीआयची संगणकप्रणाली हॅक केल्यानंतर प्रत्येक संगणकामधील व्हायरस दूर करण्यासाठी प्रत्येकी ३०० डॉलरची खंडणी मागण्यात आली आहे.