शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

सायबर हल्ल्याच्या रडारवर स्मार्ट सिटी

By admin | Updated: July 1, 2017 07:45 IST

जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जेएनपीटीमधील सायबर हल्ल्यानंतर नवी मुंबईमधील माहिती तंत्रज्ञानासह सर्वच उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. ओनाक्रायच्या व्हायरसपासून वाचण्यासाठीची उपाययोजना सुरू असताना आता पेंट्या व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. भविष्यातही नवी मुंबई, पनवेल परिसरातील माहिती तंत्रज्ञान, अर्थविषयक कंपन्या व मोठ्या उद्योगांसमोर सायबर हल्ल्यापासून बचाव करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनीही या गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून नवी मुंबईची जगभर ओळख आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, ओएनजीसी व अनेक महत्त्वाचे उद्योग या परिसरामध्ये आहेत. डीएकेसी, पटनीसह शेकडो आयटी कंपन्याही नवी मुंबईमध्ये आहेत. एकेकाळी केमिकल झोन म्हणून ओळख असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला आयटी सेक्टरचा दर्जा प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्वच वित्तीय संस्थांची कार्यालये या परिसरामध्ये आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या पनवेल, नवी मुंबईमधील वाढत्या औद्योगिक साम्राज्यासमोर आता सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. २७ जूनला जेएनपीटीच्या गेटवे टर्मिनल कंपनीवर सायबर हल्ला झाला. जीटीआय कंपनीच्या माध्यमातून रोज ५ ते ६ हजार कंटेनर हाताळले जातात. २००४पासून उत्तमपणे काम करत असलेल्या या कंपनीमधील सर्व २७० संगणक व लॅपटॉपमध्ये पेंट्या व्हायरस शिरला असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे. हॅकरने कंपनीकडे एक संगणकामधील व्हायरस काढण्यासाठी ३०० डॉलरची खंडणी मागितली असून याविषयी गुन्हा दाखल झाला आहे. देशात यापूर्वी झालेल्या सायबर हल्ल्याच्या वेळी ओनाक्राय या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विंगने या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याविषयीचे माहितीपत्रक तयार केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यांनाही याविषयी माहिती देण्यात आली होती. ओनाक्रायचा धोका संपलेला नसताना आता पेंट्याने धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने राज्याच्या सायबर विंगकडे याविषयी काय खबरदारी घेण्यात यावी? याविषयी विचारणा केली आहे. भविष्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील सर्वच उद्योग समूह, वित्तीय संस्था व आयटीचा वापर असणाऱ्या सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वैयक्तिक व कार्यालयातील संगणक हाताळतानाही योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हॅकर मागतात खंडणीअनोळखी मेल किंवा लिंक उघडल्यामुळे व्हायरस संगणक व लॅपटॉपमध्ये प्रवेश करतो व काही क्षणात कंपनीमधील सर्व संगणक यंत्रणा ठप्प होते. सर्व संगणकीय यंत्रणाच ठप्प होऊन जाते. एखाद्या कंपनीमध्ये सायबर हल्ला केल्यानंतर संगणक व लॅपटॉप सुरू करताना एक मॅसेज दिसू लागतो. तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक केला असून, तुम्हाला तुमचा डाटा हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शनला क्लिक करून ठरावीक रक्कम नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली जाते. जेएनपीटीमधील जीटीआयची संगणकप्रणाली हॅक केल्यानंतर प्रत्येक संगणकामधील व्हायरस दूर करण्यासाठी प्रत्येकी ३०० डॉलरची खंडणी मागण्यात आली आहे.