शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

By admin | Updated: May 15, 2016 21:03 IST

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे. २५ पैकी बहुतांश धरणातील साठा हा वजा झाला असून, यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, घोड, नाझरे व उजनीचा समावेश आहे.   कुकडी : अनेक वर्षांत प्रथमच नीचांकी साठानारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघे २.०३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक वर्षांमध्ये प्रथमच डिंभे धरणात फक्त ४१ दलघफू तर  माणिकडोह ० टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. जर मॉन्सून सक्रिय न झाल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होणार असून, त्याचा फटका पुणे, नगर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांना बसणार आहे.कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत हे तालुके अवलंबून आहेत. गेल्या महिन्यात पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांकरिता २.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. ते आवर्तन बंद करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांचे नियोजन राहील. हे पाणी पिण्यासाठी राहील तसेच या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी सांगितले. नीरा देवघर, भाटघर धरणे आटलीभोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात फक्त ४ टक्के, तर भाटघर धरणात ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील विद्युतनिर्मितीसाठी व पाईपलाईनची देखभाल व दुरुस्तीसाठी धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.  मागील चार महिन्यांपासून भाटघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर सध्या ३३५ क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. धरण ९ टक्क्यांवर आले आहे. पुढील दोन-तीन दिवस पाणी बंद केले जाणार आहे. चासकमान झपाट्याने खाली...चासकमान : धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरूर व खेड तालुक्यांसाठी १४ दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. धरणातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.  सध्या धरणात पाणीपातळी ६३२.२३ दलघमी, एकूण साठा ४८.१७ दलघमी, उपयुक्त साठा २०.९८ दलघमी असून, ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालव्याला सोडलेल्या आवर्तनामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे.आसखेड : भामा-आसखेड धरणात २२.१४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या दोन दिवसांत पाच मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला आहे.                    पाण्याची पातळी ६५६.१० मीटर असून, एकूण साठा ६१.५९७ दलघमी  व  उपयुक्त साठा  ४८.०७५ दलघमी तर वर्षभरात एकूण १००५ मिलिमीटर पाऊस धरण परिसरात झाला.घोड खोरेधरण          पाणीसाठा(%)पिंपळगाव        -७३.८७माणिकडोह        -0.१५येडगाव             १७.९८वडज        ६.५२डिंभे       0.३३घोड       - १0.३२विसापूर        ९.९२भीमाखोरेधरण          पाणीसाठा(%)कळमोडी       २0.७९चासकमान       ९.७८भामा आसखेड      २२.४४वडिवळे       ३५.९७अंद्रा      ५८.७६मुळा-मुठा खोरेधरण          पाणीसाठा(%)पवना        २१.५८कासारसाई      २९.0२मुळशी         १२.२३टेमघर       ४.१८वरसगाव      ५.१२पानशेत      १८.१८खडकवासला    ६४.७४नीरा खोरेधरण          पाणीसाठा(%)गुंजवणी     ८.५८नीरा देवघर     ३.९८भाटघर        ९.२९वीर      ५.७१नाझरे      - १३.९५उजनी    - ४८.0१