शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील लहान-मोठी २५ धरणं रिकामी

By admin | Updated: May 15, 2016 21:03 IST

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यात लहान-मोठी २५ धरणं असून, ती रिकामी होत आहेत. मे अखेरपर्यंत साठा कसाबसा पुरेल अशी परिस्थिती असून, जूनमध्ये जर पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाई अधिक गंभीर होणार आहे. २५ पैकी बहुतांश धरणातील साठा हा वजा झाला असून, यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, घोड, नाझरे व उजनीचा समावेश आहे.   कुकडी : अनेक वर्षांत प्रथमच नीचांकी साठानारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघे २.०३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक वर्षांमध्ये प्रथमच डिंभे धरणात फक्त ४१ दलघफू तर  माणिकडोह ० टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. जर मॉन्सून सक्रिय न झाल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होणार असून, त्याचा फटका पुणे, नगर जिल्ह्यांतील सहा तालुक्यांना बसणार आहे.कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या ५ धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत हे तालुके अवलंबून आहेत. गेल्या महिन्यात पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांकरिता २.३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. ते आवर्तन बंद करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांचे नियोजन राहील. हे पाणी पिण्यासाठी राहील तसेच या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी सांगितले. नीरा देवघर, भाटघर धरणे आटलीभोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात फक्त ४ टक्के, तर भाटघर धरणात ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणातील विद्युतनिर्मितीसाठी व पाईपलाईनची देखभाल व दुरुस्तीसाठी धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.  मागील चार महिन्यांपासून भाटघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर सध्या ३३५ क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. धरण ९ टक्क्यांवर आले आहे. पुढील दोन-तीन दिवस पाणी बंद केले जाणार आहे. चासकमान झपाट्याने खाली...चासकमान : धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिरूर व खेड तालुक्यांसाठी १४ दिवसांचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. धरणातील जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.  सध्या धरणात पाणीपातळी ६३२.२३ दलघमी, एकूण साठा ४८.१७ दलघमी, उपयुक्त साठा २०.९८ दलघमी असून, ९.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कालव्याला सोडलेल्या आवर्तनामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे.आसखेड : भामा-आसखेड धरणात २२.१४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या दोन दिवसांत पाच मिलिमीटर पाऊस धरणक्षेत्रात पडला आहे.                    पाण्याची पातळी ६५६.१० मीटर असून, एकूण साठा ६१.५९७ दलघमी  व  उपयुक्त साठा  ४८.०७५ दलघमी तर वर्षभरात एकूण १००५ मिलिमीटर पाऊस धरण परिसरात झाला.घोड खोरेधरण          पाणीसाठा(%)पिंपळगाव        -७३.८७माणिकडोह        -0.१५येडगाव             १७.९८वडज        ६.५२डिंभे       0.३३घोड       - १0.३२विसापूर        ९.९२भीमाखोरेधरण          पाणीसाठा(%)कळमोडी       २0.७९चासकमान       ९.७८भामा आसखेड      २२.४४वडिवळे       ३५.९७अंद्रा      ५८.७६मुळा-मुठा खोरेधरण          पाणीसाठा(%)पवना        २१.५८कासारसाई      २९.0२मुळशी         १२.२३टेमघर       ४.१८वरसगाव      ५.१२पानशेत      १८.१८खडकवासला    ६४.७४नीरा खोरेधरण          पाणीसाठा(%)गुंजवणी     ८.५८नीरा देवघर     ३.९८भाटघर        ९.२९वीर      ५.७१नाझरे      - १३.९५उजनी    - ४८.0१