शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:44 IST

मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़

नांदेड/परभणी : केंद आणि राज्यातील भाजपा सरकार विकासाचा अजेंडा राबवित असताना काही रिकामटेकडी मंडळी समाजात जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचेही नाव न घेता केली.लोहा येथे गुरुवारी तीन राष्ट्रीय महामार्गांचा भूमीपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, सरकार विकास कामे करत असताना काही मंडळी जातीयवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न करत आहेत़ मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़ मराठवाड्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती़ मात्र त्याकाळात मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही़ लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे गडकरी म्हणाले.तेव्हा तुम्ही काय केले?परभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला़ त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अरे नालायकांनो, १५ वर्षांत तुम्ही नीट वागला असतात तर या शेतकºयांची अशी अवस्था झाली असती का? ही कोणामुळे अवस्था झाली, याचं एकदातरी उत्तर तुम्ही दिले पाहिजे़ आम्हाला प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गोंधळपरभणी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या महिलांनी शेतकºयांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला़ फडणवीस यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे या मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावत येत होत्या़ पाठोपाठ स्वाभिमानीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले याही मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावल्या़ काही अंतरावरच त्यांनाही पोलिसांनी रोखले़ शेतकरी स्वत: सरण रचून आत्महत्या करीत आहेत, तुम्ही मात्र इकडे उद्घाटन करीत फिरत आहात, अशा शब्दांत या महिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यावर सभा संपल्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेऊ, मला अशा घटनांची सवय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र तरीही आंदोलक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी