शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महाराष्ट्रात नळपाणी योजनेची धीमी गती; केंद्रीय निधी खर्च करण्यात मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 05:21 IST

जलशक्ती राज्यमंत्री कटारिया यांची माहिती

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्याचा वायदा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार जोमाने प्रयत्न करीत आहे; परंतु, महाराष्ट्रात या योजनेची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात नळपाणी योजनेसाठी दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग होत नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले की, २०२४ पर्यंत घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राला २०१९-२० या वित्तीय वर्षात ८४७.९७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आले होते. त्यापैकी ३४५.२८ कोटी रुपये (४० टक्के) खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये १,८२८.९२ कोटी रुपयांपैकी ४ फेब्रुवारीपर्यंत यापैकी एक चतुर्थांश म्हणजे फक्त ४५७.२३ कोटी रुपये वापरण्यात आले.भाजपचे रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात कटारिया यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. यानुसार २०१९ पासून आतापर्यंत ३.३३ कोटी कुटुंबांंना नळपाणी जोडणी देण्यात आल्यानंतर नळपाणी जोडणीधारक ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या ६.५६ कोटी झाली अहे.३४.२५ टक्के कुटुंबाला नळाने पाणी देशभरात आजही एकूण १८.९३ कोटी कुटुंबांपैकी फक्त ३४.२५ टक्के कुटुंबांकडे नळपाणी जोडणी आहे. योजना सुरू होण्याआधी ३.२३ कोटी ग्रामीण कुटुंबांकडे नळपाणी जोडणी होती.गोव्यात प्रत्येक घरी नळाने पाणीनळपाणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाने पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गोवा आणि तेलंगणमध्ये ग्रामीण भागात घरोघरी नळाने पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण झालेले आहे.