शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महाराष्ट्रात नळपाणी योजनेची धीमी गती; केंद्रीय निधी खर्च करण्यात मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 05:21 IST

जलशक्ती राज्यमंत्री कटारिया यांची माहिती

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्याचा वायदा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार जोमाने प्रयत्न करीत आहे; परंतु, महाराष्ट्रात या योजनेची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात नळपाणी योजनेसाठी दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग होत नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले की, २०२४ पर्यंत घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राला २०१९-२० या वित्तीय वर्षात ८४७.९७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आले होते. त्यापैकी ३४५.२८ कोटी रुपये (४० टक्के) खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये १,८२८.९२ कोटी रुपयांपैकी ४ फेब्रुवारीपर्यंत यापैकी एक चतुर्थांश म्हणजे फक्त ४५७.२३ कोटी रुपये वापरण्यात आले.भाजपचे रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात कटारिया यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. यानुसार २०१९ पासून आतापर्यंत ३.३३ कोटी कुटुंबांंना नळपाणी जोडणी देण्यात आल्यानंतर नळपाणी जोडणीधारक ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या ६.५६ कोटी झाली अहे.३४.२५ टक्के कुटुंबाला नळाने पाणी देशभरात आजही एकूण १८.९३ कोटी कुटुंबांपैकी फक्त ३४.२५ टक्के कुटुंबांकडे नळपाणी जोडणी आहे. योजना सुरू होण्याआधी ३.२३ कोटी ग्रामीण कुटुंबांकडे नळपाणी जोडणी होती.गोव्यात प्रत्येक घरी नळाने पाणीनळपाणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाने पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गोवा आणि तेलंगणमध्ये ग्रामीण भागात घरोघरी नळाने पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण झालेले आहे.