शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

महाराष्ट्रात नळपाणी योजनेची धीमी गती; केंद्रीय निधी खर्च करण्यात मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 05:21 IST

जलशक्ती राज्यमंत्री कटारिया यांची माहिती

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्याचा वायदा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार जोमाने प्रयत्न करीत आहे; परंतु, महाराष्ट्रात या योजनेची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात नळपाणी योजनेसाठी दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग होत नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले की, २०२४ पर्यंत घरोघर नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राला २०१९-२० या वित्तीय वर्षात ८४७.९७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आले होते. त्यापैकी ३४५.२८ कोटी रुपये (४० टक्के) खर्च करण्यात आले. २०२१-२२ मध्ये १,८२८.९२ कोटी रुपयांपैकी ४ फेब्रुवारीपर्यंत यापैकी एक चतुर्थांश म्हणजे फक्त ४५७.२३ कोटी रुपये वापरण्यात आले.भाजपचे रामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात कटारिया यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. यानुसार २०१९ पासून आतापर्यंत ३.३३ कोटी कुटुंबांंना नळपाणी जोडणी देण्यात आल्यानंतर नळपाणी जोडणीधारक ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या ६.५६ कोटी झाली अहे.३४.२५ टक्के कुटुंबाला नळाने पाणी देशभरात आजही एकूण १८.९३ कोटी कुटुंबांपैकी फक्त ३४.२५ टक्के कुटुंबांकडे नळपाणी जोडणी आहे. योजना सुरू होण्याआधी ३.२३ कोटी ग्रामीण कुटुंबांकडे नळपाणी जोडणी होती.गोव्यात प्रत्येक घरी नळाने पाणीनळपाणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला २०२४ पर्यंत नळाने पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गोवा आणि तेलंगणमध्ये ग्रामीण भागात घरोघरी नळाने पाणी पोहोचविण्याचे काम पूर्ण झालेले आहे.