शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

आभाळ फाटलंय, पण शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 27, 2017 18:57 IST

असलेली वित्तीय तूट, आता कर्जमाफी यामुळे राज्य सरकारसाठी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र आम्ही हे फाटलेले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा  बोजा पडणार आहे. आधीच असलेली वित्तीय तूट, आता कर्जमाफी यामुळे राज्य सरकारसाठी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे.  मात्र आम्ही हे फाटलेले आभाळ शिवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. शेतकरी संपामध्ये केंद्रस्थानी असलेल्या पुणतांब्यातील संपात सहभाग घेणाऱ्या 40 गावांतील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. 
सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले. "आम्हाला कर्जमाफी करायचीच होती. त्यामुळेच ही कर्जमाफी झाली आहे. जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नसती तर सरकारने वेगवेगळी कारणे पुढे करून कर्जमाफी नाकारली असती." राज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असे केले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. 
 आर्थिक स्थिती बघता 15 हजार कोटी रुपयांपलीकडे कर्जमाफी देण्यात येऊ नये, अशी सूचना वित्तविभागाने केली होती. मात्र सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच समृद्धी महामार्गाल विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.