शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

रोजगारयुक्त महाराष्ट्रासाठी ‘कौशल्य विकास’ कटिबद्ध

By admin | Updated: July 16, 2017 03:06 IST

राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार आशिष देशमुख विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता आयुक्त ई. रवींद्रन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री निलंगेकर-पाटील म्हणाले की, भारत हा एकमेव देश असेल, जो प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवकांना कुशल प्रशिक्षण देण्यावर आम्ही भर देत आहोत. कामगार व कौशल्य विकास यांचा मेळ घालून अधिकाधिक खासगी उद्योजकांनी राज्य शासनाबरोबर काम करावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.‘मेक इन इंडिया’नंतर कौशल्य विकास विभागाचे ६२ सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी ५८ करार कार्यन्वित झाले आहेत. ‘महामैत्री’ या पोर्टलद्वारे विविध क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युवकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना विद्यावेतन आयटीआयचे आधुनिकीकरण, विविध उद्योगांमध्ये आवश्यक असणारे अभ्यासक्रमाबाबत कौशल्य विकास विभाग काम करीत असून, हे काम उत्तम असल्याची पावती पॅरिस येथे मिळालेल्या पुरस्काराने सिद्ध झाले आहे. पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या ग्लोबल स्कील समीटमध्ये राज्याला उत्कृष्ट आयटीआयसाठी पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १०० हून अधिक शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आज महाराष्ट्रात आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, यावरून आयटीआयची गरज अबाधित असल्याचेही निलंगेकर-पाटील यांनी सांगितले. आगामी काळात भारतसुद्धा चीन, युरोपप्रमाणे कौशल्य विकासात अग्रेसर राहिल. पाठ्यपुस्तकाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण विद्यार्थ्यांना हवे, म्हणून अप्रेंटिसशिप कायद्यात बदल करण्यात आला असून, याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले. या वेळी राज्यातील निवडक १२ औद्योगिक आस्थापनांना, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते याच निधीचे वाटप करण्यात आले.