शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

सहा शेतकऱ्यांच्या मराठवाड्यात आत्महत्या

By admin | Updated: September 29, 2015 01:56 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यात बीड जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यातील दोन

औरंगाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यात बीड जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यातील दोन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश आहे.पैठण तालुक्यातील एकतुनी गावात रविवारी अर्जुन शंकर राजकर (३५) याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शेतात दरवर्षी कपाशी, तूर, बाजरीचे पीक घेत असत़ चार वर्षांपासून त्यांच्या शेतात काहीच पिकत नाही. घरची गरीब परिस्थिती, त्यात बँकेचे कर्ज वाढत होते. रविवारी गणेश विसर्जनाची तयारी सुरू तर राजकर यांनी आत्महत्या केली.अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील उद्धव बबनराव ढेरे (३५) या शेतकऱ्याने सोमवारी जीवनयात्रा संपविली. सकाळी ते दुध आणण्यासाठी शेतात गेले व तिथेच विषारी द्रव प्राशन केले. बदनापूर तालुक्यातील (जि. जालना) धोपटेश्वर येथील निवृत्ती ज्ञानदेव शेळके (३५) यांनी रविवारी दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना दीड एकर शेती असून खाजगी व बँकेचे कर्ज होते.तांदळवाडी (ता. बीड) येथे दादासाहेब गणपतराव सांगूळे (६५) यांनी शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तीन एकर शेती होती; परंतु त्यांनी ती विकली होती. मोलमजुरी करुन ते उदरनिर्वाह करत. दुसरी घटना चव्हाणवाडी (ता. गेवराई) येथे घडली. गिन्यानदेव रामभाऊ चव्हाण (४५) या शेतकऱ्याने सोमवारी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना एक एकर शेती आहे. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील ताराबाई मुंजाबापू महाडिक (६५) या शेतकरी महिलेने घाटापिंप्री येथे माहेरी आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक व खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांनी माहेरी येऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.