शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मराठवाड्यातील सहा मंडळात ‘परती’ ची अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:44 IST

मराठवाड्यातील सहा मंडळांमध्ये परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मंडळात ६७ मि.मी, हिंगोलीतील वसमत मंडळात ७२ मि.मी., नांदेड जिल्ह्यातील मुदेखडमध्ये ७० मि.मी. तर कंधार तालुक्यातील पेठवडज मंडळात ७२ मि.मी.आणि मुक्रमाबाद मंडळात ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकुठे दमदार तर कुठे रिमझिममराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे.अपेक्षित पावसाच्या ८४ टक्के पाऊस यंदा मराठवाड्यात झाल्याचा हवामान खात्याचा दावा

औरंगाबाद, दि. १० : मराठवाड्यातील सहा मंडळांमध्ये परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मंडळात ६७ मि.मी, हिंगोलीतील वसमत मंडळात ७२ मि.मी., नांदेड जिल्ह्यातील मुदेखडमध्ये ७० मि.मी. तर कंधार तालुक्यातील पेठवडज मंडळात ७२ मि.मी.आणि मुक्रमाबाद मंडळात ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यातील अंधोरी मंडळात ६६ मि.मी पाऊस झाला. 

विभागाचे एकूण पर्जन्यमान ७७९ मि.मी. इतकी आहे. सरासरीच्या तुलनेत ६२३ मि.मी. इतका पाऊस झाल्याचे विभागीय प्रशासनाने कळविले आहे. अपेक्षित पावसाच्या ८४ टक्के पाऊस यंदा मराठवाड्यात झाल्याचा दावा हवामान खात्याच्या विश्लेषणानुसार विभागीय प्रशासनाने केला आहे. ९० टक्के पर्जन्यमानाच्या पुढे जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे सरकले आहेत. तर औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड हे जिल्हे ६५ ते ८१ टक्क्यांच्या आत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सोयगांव, खुलताबाद, कन्नड तालुक्यांत आजपर्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील भोकर, उमरी, लोहा, किनवट, माहूर, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. बीडमधील परळी तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीतील कळमनुरी, वसमत तर परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, पालम, गंगाखेड, पाथरी तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. 

३२ तालुक्यांत पावसाची अपेक्षामराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे. या तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावणे अपेक्षित आहे. औरंगाबोदतील ५, जालन्यातील ४, परभणीतील ४, हिंगोलीतील ३, नांदेडमधील ५, बीडमधील ५, लातूरमधील ४, तर उस्मानाबादमधील २ तालुक्यांत दमदार पावसाची अपेक्षा आहे.